शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

घोडेबाजार थांबविण्यासाठी राज्याने कायदा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 20:26 IST

पारदर्शकता रहावी व घोडेबाजार थांबावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदा करावा, अशी सूचना आम्ही करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देअशोक चव्हाण, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधान परिषदेची निवडणूक किंवा विश्वासदर्शक ठरावासंबंधीच्या मतदानाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता असते. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेत गुप्त पद्धतीने मतदान घेऊ नये, असे आदेश दिल्यामुळे महाराष्ट्रात विश्वासदर्शक ठरावादरम्यान महाविकास आघाडीचे सरकार जिंकू शकले. अशा प्रकारच्या मतदानादरम्यान पारदर्शकता रहावी व घोडेबाजार थांबावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदा करावा, अशी सूचना आम्ही करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली. अशोक चव्हाण यांच्यासह राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्यांवर वरिष्ठ संपादकांशी संवाद साधला. 

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच राज्यात घोडेबाजार होऊ शकला नाही. सर्वोच्च न्यायालयामुळे विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान पारदर्शकता आली. सरकार कुणाचेही असो, विधानसभेच्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मतदान हे गुप्त पद्धतीने घेऊ नये. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला वाव मिळतो. त्यामुळेच खुल्या पद्धतीने मतदान घेतले जावे, असेही यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.आघाडी सरकारच्या काळात कृषिमंत्री असताना शेततळे योजना ही विदर्भासाठी तयार करण्यात आली होती. पण त्याची व्यापक पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही. त्याचा फायदा इतर विभागांनाच जास्त झाला, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या व त्यांना नफा मिळावा यासाठी शेतीतील विविध प्रयोग राबविण्याची आवश्यकता आहे. सोबतच योग्य दिशेने जागृतीदेखील झाली पाहिजे. नागपुरात एखाद्याला पुष्पगुच्छ देत असताना त्यातील फुले बाहेरून आणावी लागत असतील तर ते विदर्भाच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. हे एक उदाहरण झाले. पण लहान लहान गोष्टींतून जास्त रोजगार कसे वाढतील याचे नियोजन झाले पाहिजे. असे झाले तरच विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. आमचे सरकार त्यादृष्टीने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नागपुरातील अधिवेशनात आमदारांची मैत्रीनागपुरातील हिवाळी अधिवेशन हे अनेक प्रकारे फायद्याचे ठरते. येथे राजकीय चर्चा, विदर्भाचे मुद्यांवर मंथन तर होतेच. शिवाय आमदारांनादेखील बरेच काही शिकायला मिळते. या अधिवेशनात आमदार विविध मुद्यांवर एकमेकांशी सखोल चर्चा करु शकतात. यामुळे त्यांच्या सलोखा वाढतो व मैत्री होते. भविष्यात नागपुरात होणाऱ्याअधिवेशनाचा कालावधी निश्चितपणाने वाढविण्यात येईल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

टॅग्स :LokmatलोकमतBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshok Chavanअशोक चव्हाणChagan Bhujbalछगन भुजबळVijay Dardaविजय दर्डा