शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

घोडेबाजार थांबविण्यासाठी राज्याने कायदा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 20:26 IST

पारदर्शकता रहावी व घोडेबाजार थांबावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदा करावा, अशी सूचना आम्ही करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देअशोक चव्हाण, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधान परिषदेची निवडणूक किंवा विश्वासदर्शक ठरावासंबंधीच्या मतदानाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता असते. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेत गुप्त पद्धतीने मतदान घेऊ नये, असे आदेश दिल्यामुळे महाराष्ट्रात विश्वासदर्शक ठरावादरम्यान महाविकास आघाडीचे सरकार जिंकू शकले. अशा प्रकारच्या मतदानादरम्यान पारदर्शकता रहावी व घोडेबाजार थांबावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदा करावा, अशी सूचना आम्ही करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली. अशोक चव्हाण यांच्यासह राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्यांवर वरिष्ठ संपादकांशी संवाद साधला. 

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच राज्यात घोडेबाजार होऊ शकला नाही. सर्वोच्च न्यायालयामुळे विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान पारदर्शकता आली. सरकार कुणाचेही असो, विधानसभेच्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मतदान हे गुप्त पद्धतीने घेऊ नये. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला वाव मिळतो. त्यामुळेच खुल्या पद्धतीने मतदान घेतले जावे, असेही यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.आघाडी सरकारच्या काळात कृषिमंत्री असताना शेततळे योजना ही विदर्भासाठी तयार करण्यात आली होती. पण त्याची व्यापक पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही. त्याचा फायदा इतर विभागांनाच जास्त झाला, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या व त्यांना नफा मिळावा यासाठी शेतीतील विविध प्रयोग राबविण्याची आवश्यकता आहे. सोबतच योग्य दिशेने जागृतीदेखील झाली पाहिजे. नागपुरात एखाद्याला पुष्पगुच्छ देत असताना त्यातील फुले बाहेरून आणावी लागत असतील तर ते विदर्भाच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. हे एक उदाहरण झाले. पण लहान लहान गोष्टींतून जास्त रोजगार कसे वाढतील याचे नियोजन झाले पाहिजे. असे झाले तरच विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. आमचे सरकार त्यादृष्टीने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नागपुरातील अधिवेशनात आमदारांची मैत्रीनागपुरातील हिवाळी अधिवेशन हे अनेक प्रकारे फायद्याचे ठरते. येथे राजकीय चर्चा, विदर्भाचे मुद्यांवर मंथन तर होतेच. शिवाय आमदारांनादेखील बरेच काही शिकायला मिळते. या अधिवेशनात आमदार विविध मुद्यांवर एकमेकांशी सखोल चर्चा करु शकतात. यामुळे त्यांच्या सलोखा वाढतो व मैत्री होते. भविष्यात नागपुरात होणाऱ्याअधिवेशनाचा कालावधी निश्चितपणाने वाढविण्यात येईल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

टॅग्स :LokmatलोकमतBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshok Chavanअशोक चव्हाणChagan Bhujbalछगन भुजबळVijay Dardaविजय दर्डा