शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

...तर केंद्राने स्वीकारलेली ‘पाळेकर शेती’ राज्यातही राबवू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 05:50 IST

सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती असे नाव जाहीर होणार असून यावर्षी पहिल्या टप्प्यात देशातील ६०० विकास खंडात हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती खुद्द पाळेकर यांनी दिली.

नागपूर : ‘झिरो बजेट’ला लवकरच सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती असे नाव जाहीर होणार असून यावर्षी पहिल्या टप्प्यात देशातील ६०० विकास खंडात हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती खुद्द पाळेकर यांनी दिली. महाराष्टÑाच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास राज्यातही हा प्रयोग राबविण्याची तयारी त्यांनी दर्शविली.अर्थमंत्र्यांनी घोषित केलेली झिरो बजेट शेती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून नैसर्गिक शेतीचाच प्रयोग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी पहिल्या टप्प्यात १० टक्के म्हणजे ६०० विकास खंडावर हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यंत्रणा उभी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.नुकतेच कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पाळेकरांना चर्चेसाठी बोलाविले होते. परंतु हे तंत्र केवळ कृषी खात्याशी संबंधित नाही तर पर्यावरण, सिंचनासह राज्याच्या इतरही खात्याला लाभदायक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन सर्व खात्यांची एकत्रित बैठक घेतल्यास आपण चर्चा करू आणि हा प्रयोग राज्यात राबवू, अशी हमी कृषिमंत्र्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पाळेकर यांनी केले आहे.