शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

राज्य शासनाचा अध्यादेश : खाद्यान्नात भेसळीसाठी आजीवन कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 19:47 IST

खाद्यान्नात भेसळ आणि भेसळयुक्त खाद्यान्न विक्री करताना दोषी आढळल्यास आजीवन कारावासाची तरतूद राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशात केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देव्यापारी संघटनांमध्ये भितीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खाद्यान्नात भेसळ आणि भेसळयुक्त खाद्यान्न विक्री करताना दोषी आढळल्यास आजीवन कारावासाची तरतूद राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशात केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.अनेकदा कोणताही कायदा तयार करताना वा लागू करताना आणि त्याची अंमलबजावणी करताना संबंधित संघटनांशी चर्चा करण्यात येते. पण अध्यादेश काढताना राज्य शासनाने कुणाशीही चर्चा केलेली नाही. दूधात भेसळीच्या गंभीर घटनानंतर राज्य शासनाने अध्यादेश काढण्याची माहिती आहे.नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे सचिव शिव प्रताप सिंह लोकमतशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच-अ दि. २० नोव्हेंबर २०१८ नुसार इंडियन पिनल कोड १९७३ च्या सेक्शन २७२ व २७३ मध्ये संशोधन केले आहे. याशिवाय देशात खाद्य सुरक्षा अधिनियम-२००६, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावात अन्य विकसित देशांच्या खाद्य कायद्यावर आधारित आहे. हा कायदा भारतात आयातीत करण्यात आला आहे. त्यामध्ये देशाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक परिस्थिती विचारात घेण्यात आलेली नाही. हा कायदा देशाची आधारभूत संरचना आणि सुविधेविना लागू करण्यात आला आहे.केवळ महाराष्ट्रात कायदासिंह म्हणाले, खाद्य भेसळ प्रतिबंधक कायदा देशात खाद्य पदार्थांचे सायन्स बेस्ड स्टॅण्डर्ड लागू करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. परंतु वास्तविकता अशी आहे की, हा कायदा ५ आॅगस्ट २०११ पासून लागू केल्यापासून त्याअंतर्गत सायन्स बेस्ड स्टॅण्डर्ड तयार करण्यात आलेले नाही. धान्य, डाळ, फळे, अधिकांश किराणा वस्तू आदी कृषी आधारित वस्तू असल्यामुळे अनेकदा नैसर्गिक कारणांमुळे पदार्थांचे नमूने फेल होतात. या नैसर्गिक कारणांसाठी व्यापाऱ्यांना जबाबदार ठरविले जाते. हा माल शेतकरी वा एपीएमसीतून खरेदी केला जातो. व्यापाऱ्यांची यात कोणतीही चूक नसतानाही खाद्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत निर्धारित परिमाणांवर जर त्यांच्यातर्फे विकलेल्या मालाचे नमूने नैसर्गिक कारणांमुळे फेल होत असेल तर व्यापाऱ्यांना दोषी ठरवून आजीवन कारावासाची तरतूद करणे न्यायसंगत नाही.खाद्य सुरक्षा अधिनियम हा केंद्र सरकारचा कायद आहे. पण त्यावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपविली आहे. या कायद्यांतर्गत आजीवन कारावासाची तरतूद संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्रात लागू करणे चुकीचे आहे. व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता लागू करण्यात आलेला कायद्याचा व्यापाऱ्यांचा विरोध असून त्यामुळे व्यवसायावर परिणाम होणार आहे.असोसिएशनचे अध्यक्ष भंवरलाल जैन यांनी व्यापाऱ्यांना भयमुक्त करण्यासाठी या संशोधनावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. राज्य शासनाने कायदा शिथिल न केल्यास व्यापारी राज्यव्यापी आंदोलन करतील, अशा इशारा जैन यांनी दिला आहे. अधिकारी कायद्याची भिती दाखवून व्यापाऱ्यांचे शोषण करतील आणि इन्सपेक्टर राज वाढेल, शिवाय व्यवसायावर विपरित परिणाम होण्याची भिती आहे.या संदर्भात असोसिशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व ग्राहक सुरक्षा मंत्री गिरीश बापट यांना निवेदन देऊन कायद्यावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :foodअन्नState Governmentराज्य सरकार