शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

राज्य सरकार विदर्भ व मराठवाड्याचा विकास निधी पळवत आहे : देवेंद्र फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 21:49 IST

Devendra Fadnavis राज्य सरकारकडून विदर्भ व मराठवाड्याचा विकास निधी पळवणे सुरू झाले आहे. वैधानिक विकास मंडळ बंद करून त्यांनी आणखी निधी पळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. ही मंडळे बंद करून शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे.

ठळक मुद्देशासनाकडून मोगलाईसारखेच निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारकडून विदर्भ व मराठवाड्याचा विकास निधी पळवणे सुरू झाले आहे. वैधानिक विकास मंडळ बंद करून त्यांनी आणखी निधी पळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. ही मंडळे बंद करून शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

महाविकास आघाडी शासनाकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने जनतेच्या हितावर प्रहार करण्यात येत आहे. ‘लॉकडॉऊन’नंतर जनतेच्या मागे सरकारने उभे राहण्याची गरज होती. मात्र सरकारने जनतेच्या वीज जोडण्या कापण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते मोठमोठे मेळावे घेत आहेत. मात्र कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजनावर निर्बंध लावण्यात आले. शासनाकडून अक्षरश: मोगलाईप्रमाणेच निर्णय घेण्यात येत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात एक अहवाल न्यायालयात आहे त्यावर अजून निर्णय यायचा आहे. आता यावर बोलणे योग्य होणार न्यायालयाचा निर्णय आल्यावर आम्ही भूमिका मांडू, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे नेते जनतेला मूर्ख समजतात का?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनतेशी निगडित मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी आमची तयारी आहे. वीज बिलाचा मुद्दा तर फारच मोठा आहे. वीज बिल माफीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सत्ता पक्षात राहून विरोधी पक्षाची मजा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पक्षाचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी ठामपणे भूमिका घ्यावी. महाविकास आघाडीचे नेते जनतेला मूर्ख समजतात का, असा सवाल फडणवीस यांनी केला.

राज्यपालांवर टीका करणाऱ्यांनी नियम वाचावेत

विधानसभेच्या अध्यक्षपदावरून राज्यपालांनी सरकारला पत्र लिहिले व त्यावरुन नवा वाद सुरू झाला. ज्यांनी विधानसभेचे नियम वाचले नाही तेच राज्यपालांवर टीका करणारे भाष्य करत आहेत, असा चिमटा फडणवीस यांनी काढला. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्र शासनाने त्यांचे कर ‘ट्विट’ करावे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMediaमाध्यमे