शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

ग्रामपंचायतींच्या अधिकारावर राज्य सरकारचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलाची जबाबदारी ग्रामपंचायतींवर टाकली आहे. राज्य सरकारचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलाची जबाबदारी ग्रामपंचायतींवर टाकली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे ग्रामपंचायतींच्या अधिकारांवर हल्ला असून, भाजपचा याला तीव्र आक्षेप आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले की, ग्रामविकास व ऊर्जा विभागाने हिटलरशाही निर्णय घेतला आहे. स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठ्याच्या वीज बिलाचा भार जिल्हा परिषद उचलते. परंतु राज्य सरकारने हा भार आता ग्रामपंचायतींवर टाकला आहे. यामुळे राज्यातील २७ हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायतींना झटका बसला आहे. त्यांच्यावर जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे बिल आहे. बिल न भरल्यास सरपंच व सचिवांना अयोग्य ठरविण्याची तरतूदसुद्धा केली आहे. या माध्यमातून सरकार ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाकडून मिळालेला निधी हडपण्याचा प्रयत्न करीत आहे. यावेळी सरपंच प्रांजली वाघ यांनी या निर्णयाविरुद्ध सरपंच आंदोलनाच्या तयारीत असून, ते तुरुंगात जायलाही तयार असल्याचे सांगितले.

- ठिय्या आंदोलन

या निर्णयाविरुद्ध आ. समीर मेघे व आ. टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपने महावितरणच्या काटोल रोड येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केले. राज्य सरकारच्या आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी अनिल निदान, सदानंद निमकर, मोहन माकडे, प्रांजली वाघ, मंगला कारेमोरे, आतिश उमरे, चंदू हेवट, प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते.