शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

नागपुरातील १५ हजार फेरीवाल्यांपुढे उदरनिर्वाहाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 23:37 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊ न सुरू आहे. कामकाज व व्यवसाय ठप्प असल्याने हातावर पोट असणाऱ्यापुढे गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देदीड महिन्यापासून व्यवसाय ठप्प : साहित्य पुरवणाऱ्या लघु उद्योजकांवरही संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊ न सुरू आहे. कामकाज व व्यवसाय ठप्प असल्याने हातावर पोट असणाऱ्यापुढे गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. नागपूर शहरातील १५ हजार फेरीवाले व त्यांना साहित्य पुरविणारी लघु उद्योजक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठा, चौक व रस्त्यांच्या कडेला व्यवसाय करून फेरीवाले आपला उदरनिर्वाह करतात. यात सीताबर्डी, महाल, मध्यवर्ती बसस्थानक, इतवारी, मस्कासाथ, शहीद चौक, गांधीबाग, दहीबाजार, खामला, सदर, आशीर्वादनगर, दिघोरी, जिल्हा मुख्यालय, जरीपटका मार्केट, गोकूळपेठ, रामनगर, सेमिनरी हिल्स, एमआयडीसी, सक्करदरा यासह शहराच्या विविध भागात १२ ते १५ हजार फेरीवाले व्यवसाय करतात. ते लघु उद्योजक (गारमेंट) यांच्याकडून माल घेतला आणि विक्री करतात. फेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने कपडे व अन्य साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कुटुंंबांवरही असेच आर्थिक संकट आले आहे. व्यवसायासाठी जमा असलेल्या पुंजीतून कसाबसा दीड महिना काढला. परंतु जवळ होते ते संपले, आता करायचे काय? असा प्रश्न फेरीवाले व गारमेंट व्यवसायिकांना पडला आहे. २१ मार्च पासून राज्य सरकारने व त्यानंतर २५ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊ न लागू केले. त्यानंतर देशात पुन्हा ३ मेपर्यंत लॉकडाऊ न वाढविण्यात आले आहे. नागपूर शहरात जवळपास १५ हजार फेरीवाले असून त्यांना साहित्य पुरवणारे तीन ते चार हजार कुटुंबे लघु युनिट चालवून मालाचा पुरवठा करतात. व्यवसाय ठप्प असल्याने १८ हजार कु टुंबांपुढे आर्थिक संकट उभे ठाकल्याची माहिती फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. फेरीवाले व त्यांना माल पुरविणाऱ्यांची दररोज ४ ते ५ कोटींची उलाढाल होते. हातावरची कमाई असल्याने उदरनिर्वाहाचे हेच त्यांचे साधन आहे. या व्यावसायिकांंना वेळीच मदत मिळाली नाही तर ते गंभीर संकटातून बाहेर पडणार नाहीत.गारमेंट व्यवसाय सावरण्याला सहा महिने लागतीलफेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने गारमेंट व्यवसायही ठप्प आहे. अनेकांना कर्जाचे हप्ते फेडण्याची चिंता लागली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही यातून सावरण्यासाठी गारमेंट व्यवसायाला किमान सहा महिने लागतील, अशी माहिती गारमेंट व्यावसायिकांनी दिली.संघटनेकडून प्रत्येकी दोन हजारांची मदतव्यवसाय दीड महिन्यापासून ठप्प असल्याने फेरवाल्यांपुढे उदरनिर्वाहाची गंभीर समस्या उभी ठाकली आहे. याचा विचार करता नागपूर फेरीवाला संघटेच्या माध्यमातून फेरीवाल्यांना प्रत्येकी दोन हजारांची आर्थिक मदत केली जात असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रज्जाक कुरैशी यांनी दिली. यासाठी संघटनेचे पदाधिकारी गोपी अंभोरे, शेख शाहिद, संदीप साहू, राजू मिश्रा, कालू मिश्रा आदींनी पुढाकार घेतला आहे. आर्थिक संकटातील फेरीवाल्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कुरैशी यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर