शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील १५ हजार फेरीवाल्यांपुढे उदरनिर्वाहाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 23:37 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊ न सुरू आहे. कामकाज व व्यवसाय ठप्प असल्याने हातावर पोट असणाऱ्यापुढे गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देदीड महिन्यापासून व्यवसाय ठप्प : साहित्य पुरवणाऱ्या लघु उद्योजकांवरही संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊ न सुरू आहे. कामकाज व व्यवसाय ठप्प असल्याने हातावर पोट असणाऱ्यापुढे गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. नागपूर शहरातील १५ हजार फेरीवाले व त्यांना साहित्य पुरविणारी लघु उद्योजक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठा, चौक व रस्त्यांच्या कडेला व्यवसाय करून फेरीवाले आपला उदरनिर्वाह करतात. यात सीताबर्डी, महाल, मध्यवर्ती बसस्थानक, इतवारी, मस्कासाथ, शहीद चौक, गांधीबाग, दहीबाजार, खामला, सदर, आशीर्वादनगर, दिघोरी, जिल्हा मुख्यालय, जरीपटका मार्केट, गोकूळपेठ, रामनगर, सेमिनरी हिल्स, एमआयडीसी, सक्करदरा यासह शहराच्या विविध भागात १२ ते १५ हजार फेरीवाले व्यवसाय करतात. ते लघु उद्योजक (गारमेंट) यांच्याकडून माल घेतला आणि विक्री करतात. फेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने कपडे व अन्य साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कुटुंंबांवरही असेच आर्थिक संकट आले आहे. व्यवसायासाठी जमा असलेल्या पुंजीतून कसाबसा दीड महिना काढला. परंतु जवळ होते ते संपले, आता करायचे काय? असा प्रश्न फेरीवाले व गारमेंट व्यवसायिकांना पडला आहे. २१ मार्च पासून राज्य सरकारने व त्यानंतर २५ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊ न लागू केले. त्यानंतर देशात पुन्हा ३ मेपर्यंत लॉकडाऊ न वाढविण्यात आले आहे. नागपूर शहरात जवळपास १५ हजार फेरीवाले असून त्यांना साहित्य पुरवणारे तीन ते चार हजार कुटुंबे लघु युनिट चालवून मालाचा पुरवठा करतात. व्यवसाय ठप्प असल्याने १८ हजार कु टुंबांपुढे आर्थिक संकट उभे ठाकल्याची माहिती फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. फेरीवाले व त्यांना माल पुरविणाऱ्यांची दररोज ४ ते ५ कोटींची उलाढाल होते. हातावरची कमाई असल्याने उदरनिर्वाहाचे हेच त्यांचे साधन आहे. या व्यावसायिकांंना वेळीच मदत मिळाली नाही तर ते गंभीर संकटातून बाहेर पडणार नाहीत.गारमेंट व्यवसाय सावरण्याला सहा महिने लागतीलफेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने गारमेंट व्यवसायही ठप्प आहे. अनेकांना कर्जाचे हप्ते फेडण्याची चिंता लागली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही यातून सावरण्यासाठी गारमेंट व्यवसायाला किमान सहा महिने लागतील, अशी माहिती गारमेंट व्यावसायिकांनी दिली.संघटनेकडून प्रत्येकी दोन हजारांची मदतव्यवसाय दीड महिन्यापासून ठप्प असल्याने फेरवाल्यांपुढे उदरनिर्वाहाची गंभीर समस्या उभी ठाकली आहे. याचा विचार करता नागपूर फेरीवाला संघटेच्या माध्यमातून फेरीवाल्यांना प्रत्येकी दोन हजारांची आर्थिक मदत केली जात असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रज्जाक कुरैशी यांनी दिली. यासाठी संघटनेचे पदाधिकारी गोपी अंभोरे, शेख शाहिद, संदीप साहू, राजू मिश्रा, कालू मिश्रा आदींनी पुढाकार घेतला आहे. आर्थिक संकटातील फेरीवाल्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कुरैशी यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर