शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

नागपुरातील १५ हजार फेरीवाल्यांपुढे उदरनिर्वाहाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 23:37 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊ न सुरू आहे. कामकाज व व्यवसाय ठप्प असल्याने हातावर पोट असणाऱ्यापुढे गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देदीड महिन्यापासून व्यवसाय ठप्प : साहित्य पुरवणाऱ्या लघु उद्योजकांवरही संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊ न सुरू आहे. कामकाज व व्यवसाय ठप्प असल्याने हातावर पोट असणाऱ्यापुढे गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. नागपूर शहरातील १५ हजार फेरीवाले व त्यांना साहित्य पुरविणारी लघु उद्योजक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठा, चौक व रस्त्यांच्या कडेला व्यवसाय करून फेरीवाले आपला उदरनिर्वाह करतात. यात सीताबर्डी, महाल, मध्यवर्ती बसस्थानक, इतवारी, मस्कासाथ, शहीद चौक, गांधीबाग, दहीबाजार, खामला, सदर, आशीर्वादनगर, दिघोरी, जिल्हा मुख्यालय, जरीपटका मार्केट, गोकूळपेठ, रामनगर, सेमिनरी हिल्स, एमआयडीसी, सक्करदरा यासह शहराच्या विविध भागात १२ ते १५ हजार फेरीवाले व्यवसाय करतात. ते लघु उद्योजक (गारमेंट) यांच्याकडून माल घेतला आणि विक्री करतात. फेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने कपडे व अन्य साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कुटुंंबांवरही असेच आर्थिक संकट आले आहे. व्यवसायासाठी जमा असलेल्या पुंजीतून कसाबसा दीड महिना काढला. परंतु जवळ होते ते संपले, आता करायचे काय? असा प्रश्न फेरीवाले व गारमेंट व्यवसायिकांना पडला आहे. २१ मार्च पासून राज्य सरकारने व त्यानंतर २५ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊ न लागू केले. त्यानंतर देशात पुन्हा ३ मेपर्यंत लॉकडाऊ न वाढविण्यात आले आहे. नागपूर शहरात जवळपास १५ हजार फेरीवाले असून त्यांना साहित्य पुरवणारे तीन ते चार हजार कुटुंबे लघु युनिट चालवून मालाचा पुरवठा करतात. व्यवसाय ठप्प असल्याने १८ हजार कु टुंबांपुढे आर्थिक संकट उभे ठाकल्याची माहिती फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. फेरीवाले व त्यांना माल पुरविणाऱ्यांची दररोज ४ ते ५ कोटींची उलाढाल होते. हातावरची कमाई असल्याने उदरनिर्वाहाचे हेच त्यांचे साधन आहे. या व्यावसायिकांंना वेळीच मदत मिळाली नाही तर ते गंभीर संकटातून बाहेर पडणार नाहीत.गारमेंट व्यवसाय सावरण्याला सहा महिने लागतीलफेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने गारमेंट व्यवसायही ठप्प आहे. अनेकांना कर्जाचे हप्ते फेडण्याची चिंता लागली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही यातून सावरण्यासाठी गारमेंट व्यवसायाला किमान सहा महिने लागतील, अशी माहिती गारमेंट व्यावसायिकांनी दिली.संघटनेकडून प्रत्येकी दोन हजारांची मदतव्यवसाय दीड महिन्यापासून ठप्प असल्याने फेरवाल्यांपुढे उदरनिर्वाहाची गंभीर समस्या उभी ठाकली आहे. याचा विचार करता नागपूर फेरीवाला संघटेच्या माध्यमातून फेरीवाल्यांना प्रत्येकी दोन हजारांची आर्थिक मदत केली जात असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रज्जाक कुरैशी यांनी दिली. यासाठी संघटनेचे पदाधिकारी गोपी अंभोरे, शेख शाहिद, संदीप साहू, राजू मिश्रा, कालू मिश्रा आदींनी पुढाकार घेतला आहे. आर्थिक संकटातील फेरीवाल्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कुरैशी यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर