शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

२२७ कामगारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 21:12 IST

मोहता इंडस्ट्रीने प्रोसेस डिपार्टमेंट बंद केल्याने येथील २२७ कामगार बेरोजगार झाले आहेत. हा विभाग कंत्राटी पद्धतीने चालविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय मिल मजूदर संघ मोर्चाने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोहता इंडस्ट्रीने प्रोसेस डिपार्टमेंट बंद केल्याने येथील २२७ कामगार बेरोजगार झाले आहेत. हा विभाग कंत्राटी पद्धतीने चालविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे शासनाने हा विभाग बंद करण्याची परवानगी देऊ नये, या मागणीला घेऊन राष्ट्रीय मिल मजूदर संघाच्यावतीने (इंटक) सोमवारी विधिमंडळावर मोर्चा काढून जोरदार नारेबाजी केली.या मोर्चात सहभागी झालेले प्रवीण चौधरी म्हणाले, या कंपनीमध्ये ६५० कामगार आहेत. कंपनीचा प्रोसेस विभाग बंद पाडल्याने २२७ कामगार बेरोजगार झाले आहेत. या कामगारांचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त आहे. यामुळे इतरत्र त्यांना नोकरी मिळणे कठीण आहे. यामुळे शासनाने यात लक्ष घालून कामगारांचे हक्क मिळवून देणे आवश्यक आहे. कापड खात्यातील २४९ कामगारांच्या प्रश्नावर मजदूर संघ व व्यवस्थापनाने बसून योग्य तोडगा काढावा, असे निर्देशही शासनाने द्यावे, असेही ते म्हणाले.नेतृत्वमोर्चाेच नेतृत्व माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, आफताब खान यांनी केले. शिष्टमंडळात तिमांडे, खान यांच्यासह प्रवीण चौधरी, उज्ज्वला भगत, रुपाली धोटे आदींचा सहभाग होता.मागण्या

  • २२७ बेरोजगार कामगारांचा प्रश्न शासनाने सोडवावा.
  • अप्पर कामगार आयुक्तांनी कंपनीला विभाग बंद करण्याची परवानगी देऊ नये
  • कामगारांना कायदेशीर हक्क शासनाने मिळवून द्यावे

२६ एकर जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटवा 

भंडारा जिल्ह्यातील ग्रा. पं. राजेगाव हद्दीतील चिखली-हमेशा येथील २६ एकर सरकारी जागेवर गेल्या ३७ वर्षांपासून गडेगाव (भंडारा) येथील अशोक लेलँड कंपनी लि.ने अतिक्रमण केले आहे. कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविण्यात आला आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी व अतिक्रमण तातडीने हटवावे, या मागणीसाठी राजेगाव (एमआयडीसी) ग्रामवासीयांनी विधिमंडळावर मोर्चा काढून लक्ष वेधले. मोर्चाचे नेतृत्व अचल मेश्राम, कुंजन शेंडे, शशी भोयर, अनिता शेंडे, शालिक गभाने, देवराव वासनिक आदींनी केले.

टॅग्स :Morchaमोर्चाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन