शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शेगावातील मातंगवाडीमध्ये योजनेनुसार विकासकामे सुरू करा; संत गजानन महाराज संस्थानला हायकोर्टाचे आदेश

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: September 28, 2022 18:30 IST

विकास कामांमध्ये कोणी अडथळा आणू नये याकरिता बुलडाणा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी संस्थानला योग्य सहकार्य करावे, असेही न्यायालयाने सांगितले.

नागपूर : देशविदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र शेगाव येथील मातंगवाडी परिसरामध्ये वादग्रस्त जमीन वगळून इतर जमिनीवर मंजूर आराखड्यानुसार विकास कामे सुरू करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संत गजानन महाराज संस्थानला दिला.

विकास कामे सहा महिन्यात पूर्ण करा. विकास कामांमध्ये कोणी अडथळा आणू नये याकरिता बुलडाणा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी संस्थानला योग्य सहकार्य करावे, असेही न्यायालयाने सांगितले. या परिसरातील १५ हजार चौरस फूट जमिनीच्या संपादनाविरुद्ध दहा जनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या जमिनीसंदर्भात येत्या १२ ऑक्टोबरपर्यंत यथास्थिती ठेवण्याचा आदेश आहे. त्यामुळे विकास कामे करताना ही जमीन वगळायची आहे. न्यायालयाने आता ही याचिका शेगाव विकासाच्या याचिकेसोबत जोडून घेतली आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ॲड. फिरदौस मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून तर, संस्थानतर्फे ॲड. अरुण पाटील यांनी कामकाज पाहिले.

मुख्याधिकाऱ्यांची प्रशंसा 

खळवाडी व मातंगवाडी येथील अतिक्रमण गेल्या अनेक महिन्यांपासून हटवले गेले नव्हते. त्यामुळे दोन्ही जमिनीचा ताबा संस्थानला मिळाला नव्हता. परिणामी, गेल्या तारखेला न्यायालयाने दोन आठवड्यात अतिक्रमन हटविण्याचा आदेश नगर परिषदेला दिला होता, तसेच आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास मुख्याधिकाऱ्यांनी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करावे, असे नमूद केले होते. दरम्यान, मुख्याधिकारी जयश्री बोराडे यांनी तातडीने अतिक्रमण हटविले. त्याकरिता, न्यायालयाने त्यांची प्रशंसा केली.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिरShegaonशेगाव