शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एक आठवड्यात बोखाराची पाणीपुरवठा योजना सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:10 IST

कोराडी : तीन वर्षांपासून रखडलेली व प्रारंभ होण्यापूर्वीच बंद पडलेली बोखारा येथील मुख्यमंत्री पेयजल-२ मधील पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन ...

कोराडी : तीन वर्षांपासून रखडलेली व प्रारंभ होण्यापूर्वीच बंद पडलेली बोखारा येथील मुख्यमंत्री पेयजल-२ मधील पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १८ फेब्रुवारीपासून सुरू करावी अन्यथा मजीप्रा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा आ. समीर मेघे आणि ग्रामस्थांनी दिला आहे. बोखारा पाणीपुरवठा योजनेसंदर्भात ग्रामपंचायतचे पदाधिकारी, मजीप्राचे अधिकारी व आमदार समीर मेघे यांची बैठक झाली. ही योजना तीन वर्षांपूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही मजीप्राची कामे संपलेली नाहीत. मध्यंतरीच्या काळात या योजनेची टेस्टिंग सुरू असताना दोन ते तीन महिने पाणी वापरण्यात आले. या योजनेला नागपूर महानगरपालिकेच्या वतीने पाणी विकत देण्यात येते. या पाण्याचे व या ठिकाणी असलेल्या वीजपुरवठ्याचे १५ लाख थकीत असल्याने ही योजना टेस्टिंगनंतर लगेच बंद पडली. ग्रामपंचायत व मजीप्रामध्ये पैसे भरण्यावरून मतभेद आहेत. यावर तोडगा निघावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ग्रामपंचायतने थकीत असलेली राशी १७ फेब्रुवारीपर्यंत भरावी. योजनेची राहिलेली कामे आठवडाभरात मजीप्राने पूर्ण करावी. १८ फेब्रुवारीपासून बोखारावासीयांना पाणी द्यावे असा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सरपंच अनिता पंडित, मजीप्राचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी एन. एस. निमजे, बोखारा येथील बाबा नागपूरकर, बाबा पंडित, विलास भालेराव, बापू देशमुख, पी. एस. महाडिक, ज्ञानेश्वर डोक, डॉ. सुमित घोंगडे, जावेद शेख सुलेमानी, गोपाल चव्हाण, सुप्रिया आवळे, जितेंद्र पिंपळे, मंगेश सावरकर, सुखदेव भोंडे, पद्मिनी कोठेवाड, विद्या चालसे आदी उपस्थित होते.

विशेष बैठकीचे आयोजन करून तोडगा काढू

या योजनेची दहा लाखाची थकीत राशी ग्रामपंचायतला भरावयाची आहे. यावरून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत. पैसे कुठून भरायचे यावरही एकमत झालेले नाही. अशा स्थितीत ग्रामपंचायतची विशेष बैठक बोलावून ही रक्कम भरण्यासंदर्भात सकारात्मक तोडगा तोडगा काढू, असे सरपंच अनिता पंडित यांनी सांगितले.