शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

राष्ट्रगिताकरिता उभे राहणे केव्हाही योग्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 21:45 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर: चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत जन -गण- मन सुरू झाल्यानंतर देशभक्तीचे दर्शन घडविण्यासाठी उभे राहणे आवश्यक नाही, ही सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी अत्यंत चुकीची असून राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभे राहणे केव्हाही योग्यच असल्याचे मत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.राज्यात आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख यांनी मंत्री म्हणून पुढाकार ...

ठळक मुद्देमाजी मंत्री अनिल देशमुख यांचे मत

आॅनलाईन लोकमतनागपूर: चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत जन -गण- मन सुरू झाल्यानंतर देशभक्तीचे दर्शन घडविण्यासाठी उभे राहणे आवश्यक नाही, ही सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी अत्यंत चुकीची असून राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभे राहणे केव्हाही योग्यच असल्याचे मत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.राज्यात आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख यांनी मंत्री म्हणून पुढाकार घेऊन प्रत्येक नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत ठेवण्यासाठी व भारताच्या राष्ट्रगीताचा सन्मान वाढविण्याच्या दृष्टिकोनातून नागपूर येथील सिनेमागृहातून २६ जानेवारी २००४ पासुन राष्ट्रगीत सुरू करण्याचा शुभारंभ केला होता. तेव्हापासुन संपूर्ण राज्यात प्रत्येक चित्रपटगृहात हा नियम काटेकोरपणे पाळला जात होता. चित्रपट पाहायला येणारे प्रेक्षकसुध्दा आनंदाने व देशप्रेमाच्या भावनेने राष्ट्रगीत जन -गण- मन सुरू झाल्यानंतर सन्मानासाठी उभे राहत होते. यात सर्व समुदायाचे आबालवृध्द नागरिक, तरुण, तरुणी व बालगोपालांचा समावेश होता.असे असताना सुध्दा सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहात राष्ट्रगीत जन-गण- मन सुरू झाल्यानंतर देशभक्तीचे दर्शन घडविण्यासाठी उभे राहणे आवश्यक नसल्याची टिप्पणी करणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Indiaभारत