शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात होणार राहणीमान सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 11:30 IST

नागरी क्षेत्रात नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचविण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने राहणीमान सर्वेक्षण (इज ऑफ लिव्हींग इंडेक्स) सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे१ ते २९ फेब्रुवारीपर्यंत प्रक्रियानागरिकांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरी क्षेत्रात नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचविण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने राहणीमान सर्वेक्षण (इज ऑफ लिव्हींग इंडेक्स) सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे व नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी केले आहे.नागपूर शहरात १ ते २९ फेब्रुवारी २०२० दरम्यान सर्वेक्षण सुरू राहील. या सर्वेक्षणासाठी तीन निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये राहण्यास योग्य शहर,महापालिकेचे कामकाज, शहराचे हवामान याबाबत नागरिकांची मते जाणून घेऊन सहभागी शहराचा क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात देशातील ११४ शहरे सहभागी होत आहेत.महाराष्ट्रातील १२ शहरे सर्वेक्षणात सहभागी होत आहेत. आपल्या शहराला त्यामध्ये अव्वल मानांकन प्राप्त व्हावे, याकरिता नागरिकांनी सहभागी होणे आवश्यक आहे. नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता यांची पडताळणी करणे हे या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट केंद्र्र शासनाने निश्चित केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रशासनाचे कामकाज आणि त्याची अंमलबजावणी याबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे हे प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक आहे. राहणीमान सर्वेक्षणाव्दारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे प्रशासनास, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधाबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे शक्य होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविण्याची गरज आहे.

लिंक/क्यूआर कोडव्दारे सहभाग नोंदवासहा महिन्यापेक्षा जास्त काळ नागपूर शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने राहणीमान सर्वेक्षण २०१९ चा क्यूआर कोड स्कॅन करुन या सर्वेक्षणात सहभाग घ्यावा. सर्वप्रथम eol2019.org/citizenfeedback या संके त स्थळावर जाऊन किं वा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रथम प्रथम महाराष्ट्र राज्य व त्यानंतर नागपूर शहर निवडावे. त्यानंतर नागरिकांनी आपले मत नोंदवावे असे रामनाथ सोनवणे यांनी केले आहे.

टॅग्स :Governmentसरकार