शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील रामदासपेठेच्या क्रीम कॉर्नरमध्ये मिळतेय शिळे अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 19:01 IST

शहरातील हेल्थ झोन म्हणविणाऱ्या रामदासपेठ परिसरात एका हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. झाडीपट्टीतील प्रख्यात कलावंत सदानंद बोरकर यांच्याबाबतीत रामदासपेठेतील क्रीम कॉर्नर या रेस्टॉरेंटमध्ये अशी घटना घडली आहे. त्यांनी रेस्टॉरेंटमध्ये वाढलेले अन्न हे शिळे असल्याची तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी रेस्टॉरेंटच्या मालकालाही तक्रार केल्यानंतरही, त्यांच्याकडून थंड प्रतिक्रिया मिळाली आहे.

ठळक मुद्देग्राहकांची तक्रार : मालकाला सांगूनही प्रतिक्रिया थंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील हेल्थ झोन म्हणविणाऱ्या रामदासपेठ परिसरात एका हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. झाडीपट्टीतील प्रख्यात कलावंत सदानंद बोरकर यांच्याबाबतीत रामदासपेठेतील क्रीम कॉर्नर या रेस्टॉरेंटमध्ये अशी घटना घडली आहे. त्यांनी रेस्टॉरेंटमध्ये वाढलेले अन्न हे शिळे असल्याची तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी रेस्टॉरेंटच्या मालकालाही तक्रार केल्यानंतरही, त्यांच्याकडून थंड प्रतिक्रिया मिळाली आहे.शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सदानंद बोरकर हे त्यांच्या आईवडिलांना घेऊन रामदासपेठेतील एका रुग्णालयात नियमित तपासणीसाठी आले होते. तपासणीचा रिपोर्ट यायला उशीर असल्याने ते जेवण करायला शेजारीच असलेल्या क्रीम कॉर्नर रेस्टॉरेंटमध्ये गेले. त्यांनी साधं जेवण मागितले. जेवणाच्या थाळीत असलेली मटरची भाजी शिळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भाजीची चव आंबट असून वास येत असल्याने त्यांनी वेटरला सांगितले. दुसरी भाजी देतो म्हणून तो कामाला लागला. त्याच्या देहबोलीवरून भाजी खराब असल्याचे त्यालाही माहिती होते. कसेतरी दोन घास पोटात गेल्यावर बोरकर यांना मळमळ व्हायला लागली. ते सरळ मालकाकडे गेले आणि तक्रार केली. त्याने सरळ दुसºया भाजीचा पर्याय ठेवला परंतु कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर बोरकर यांनी बिल मागितले. वेटरने पूर्ण बिल आणून ठेवले. बिल चुकते करायला मालकाकडे गेल्यावर त्याने प्रत्येकाच्या थाळीतील एका भाजीचे चार्जेस कमी करून बिल घेतले. परंतु साधी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली नाही.रामदासपेठ परिसरात शेकडो रुग्णालय आहे. बाहेरगावाहून अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक येथे येतात. पर्याय नसल्याने हॉटेलमध्ये जेवण करतात. हे हॉटेलवाले नेहमीच असे शिळे अन्न खायला घालत असतील, याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेरगावच्या लोकांना माहिती नसल्याने ते तक्रार करीत नाही. त्यामुळे हॉटेलमालकाची मनमानी वाढली आहे. हॉटेलमालक असे प्रकार करून आरोग्याशी खेळ करीत असल्याचा आरोप बोरकर यांनी केला आहे.यासंदर्भात क्रीम कॉर्नर या हॉटेलमध्ये संपर्क साधला असता, तेथील हिरालाल या व्यक्तीने सांगितले की, आमच्या हॉटेलमध्ये बोरकर जेवण करीत असताना, अनेक ग्राहक जेवण करीत होते, मात्र त्यांनी तक्रार केली नाही. असे असले तरी, बोरकर यांच्या तक्रारीमुळे आम्ही त्यांचे बिल कमी केले. माफीसुद्धा मागितली, असे असले तरी यापुढे आम्ही असा प्रकार होणार नाही, याची दक्षता घेऊ.

टॅग्स :nagpurनागपूरfood poisoningअन्नातून विषबाधा