शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नागपुरातील रामदासपेठेच्या क्रीम कॉर्नरमध्ये मिळतेय शिळे अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 19:01 IST

शहरातील हेल्थ झोन म्हणविणाऱ्या रामदासपेठ परिसरात एका हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. झाडीपट्टीतील प्रख्यात कलावंत सदानंद बोरकर यांच्याबाबतीत रामदासपेठेतील क्रीम कॉर्नर या रेस्टॉरेंटमध्ये अशी घटना घडली आहे. त्यांनी रेस्टॉरेंटमध्ये वाढलेले अन्न हे शिळे असल्याची तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी रेस्टॉरेंटच्या मालकालाही तक्रार केल्यानंतरही, त्यांच्याकडून थंड प्रतिक्रिया मिळाली आहे.

ठळक मुद्देग्राहकांची तक्रार : मालकाला सांगूनही प्रतिक्रिया थंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील हेल्थ झोन म्हणविणाऱ्या रामदासपेठ परिसरात एका हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. झाडीपट्टीतील प्रख्यात कलावंत सदानंद बोरकर यांच्याबाबतीत रामदासपेठेतील क्रीम कॉर्नर या रेस्टॉरेंटमध्ये अशी घटना घडली आहे. त्यांनी रेस्टॉरेंटमध्ये वाढलेले अन्न हे शिळे असल्याची तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी रेस्टॉरेंटच्या मालकालाही तक्रार केल्यानंतरही, त्यांच्याकडून थंड प्रतिक्रिया मिळाली आहे.शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सदानंद बोरकर हे त्यांच्या आईवडिलांना घेऊन रामदासपेठेतील एका रुग्णालयात नियमित तपासणीसाठी आले होते. तपासणीचा रिपोर्ट यायला उशीर असल्याने ते जेवण करायला शेजारीच असलेल्या क्रीम कॉर्नर रेस्टॉरेंटमध्ये गेले. त्यांनी साधं जेवण मागितले. जेवणाच्या थाळीत असलेली मटरची भाजी शिळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भाजीची चव आंबट असून वास येत असल्याने त्यांनी वेटरला सांगितले. दुसरी भाजी देतो म्हणून तो कामाला लागला. त्याच्या देहबोलीवरून भाजी खराब असल्याचे त्यालाही माहिती होते. कसेतरी दोन घास पोटात गेल्यावर बोरकर यांना मळमळ व्हायला लागली. ते सरळ मालकाकडे गेले आणि तक्रार केली. त्याने सरळ दुसºया भाजीचा पर्याय ठेवला परंतु कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर बोरकर यांनी बिल मागितले. वेटरने पूर्ण बिल आणून ठेवले. बिल चुकते करायला मालकाकडे गेल्यावर त्याने प्रत्येकाच्या थाळीतील एका भाजीचे चार्जेस कमी करून बिल घेतले. परंतु साधी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली नाही.रामदासपेठ परिसरात शेकडो रुग्णालय आहे. बाहेरगावाहून अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक येथे येतात. पर्याय नसल्याने हॉटेलमध्ये जेवण करतात. हे हॉटेलवाले नेहमीच असे शिळे अन्न खायला घालत असतील, याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेरगावच्या लोकांना माहिती नसल्याने ते तक्रार करीत नाही. त्यामुळे हॉटेलमालकाची मनमानी वाढली आहे. हॉटेलमालक असे प्रकार करून आरोग्याशी खेळ करीत असल्याचा आरोप बोरकर यांनी केला आहे.यासंदर्भात क्रीम कॉर्नर या हॉटेलमध्ये संपर्क साधला असता, तेथील हिरालाल या व्यक्तीने सांगितले की, आमच्या हॉटेलमध्ये बोरकर जेवण करीत असताना, अनेक ग्राहक जेवण करीत होते, मात्र त्यांनी तक्रार केली नाही. असे असले तरी, बोरकर यांच्या तक्रारीमुळे आम्ही त्यांचे बिल कमी केले. माफीसुद्धा मागितली, असे असले तरी यापुढे आम्ही असा प्रकार होणार नाही, याची दक्षता घेऊ.

टॅग्स :nagpurनागपूरfood poisoningअन्नातून विषबाधा