शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

भावपूर्ण सादरीकरणाने रंगलेली ‘श्रीकृष्ण गीतांजली’

By admin | Updated: August 14, 2014 01:24 IST

भगवान श्रीकृष्ण म्हणजे भारतीयांचे आवडते दैवत. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान आणि जीवनाचा अर्थ कळतो तो श्रीकृष्णचरित्रातून. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची मोहिनी कायम भाविकांना पडते.

स्वरतरंग म्युझिक अकॅडमी : भक्तिरसात रसिक झाले चिंबनागपूर : भगवान श्रीकृष्ण म्हणजे भारतीयांचे आवडते दैवत. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान आणि जीवनाचा अर्थ कळतो तो श्रीकृष्णचरित्रातून. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची मोहिनी कायम भाविकांना पडते. त्यामुळे भगवान कृष्णाची जन्माष्टमीही भाविक मोठ्या भक्तिभावाने साजरी करतात. जन्माष्टमी लवकरच येणार आहे. यानिमित्ताने भगवान कृष्णाच्या चरित्राचे गायन करणाऱ्या ‘श्रीकृष्ण गीतांजली’ हा कार्यक्रम आज सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला. स्वरतरंग संगीत अकादमीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे संचालक निरंजन बोबडे यांची होती. ही श्रीकृष्ण गीतांजली चंद्रशेखर वराडपांडे उपाख्य कमलासूत यांनी रचली आहे. विशेषत: या गीतांजलीचा हा पाचवा नागपुरातील कार्यक्रम असूनही रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. भगवान श्रीकृष्णाच्या गीतांचे सुरेल सादरीकरण आणि ज्या प्रसंगावर गीत आधारित आहे तो प्रसंग एलसीडी स्क्रीनद्वारे प्रदर्शित करण्यात येत असल्याने रसिकांना या कार्यक्रमाचा अधिक आनंद घेता आला. आपण साक्षात द्वारकेत कृष्णाच्या राज्यात असल्याचाच भास यावेळी निर्माण करण्यात सारेच कलावंत यशस्वी ठरले. त्यात राजेश अमीन यांनी रंगमंचाची सुबक सजावट केल्याने वातावरणनिर्मिती साधली गेली. किशोर गलांडे आणि स्नेहल खंडकर यांचे विवेचनात्मक भाष्य गीतांचा परिणाम वाढविणारे होते. निरंजनने ‘कथा ही निर्मल भक्तीची...’ या गीताने प्रारंभ केला आणि त्यानंतर सारेच श्रोते कृष्णभक्तीत तल्लीन झाले. गायत्री गायकवाड आणि मंजिरी वैद्य यांनी ‘कृष्ण जन्मला ग सखे...’ हे गीत सादर करून कृष्णजन्माच्या आनंदात रसिकांना भिजविले. त्यानंतर श्रेया खराबे हिने ‘मोहक हे रूप तुझे...’ तर रघुनाथ बोबडे यांनी ‘जाहला कंसाचा संहार...’ आणि श्रीनिधी घटाटेने ‘रुक्मिणी महाराणी जाहली...’ हे गीत तयारीने सादर केले. याप्रसंगी ‘करू या गोवर्धन पूजन..., रसरंगी श्रीरंग रंगला..., अक्रूरा नेशी कुठे घनश्याम..., कलंक स्यमंतका..., सुदामा येई द्वारकापुरी..., दुष्ट तो कालयवन संपला..., वाचावी अब्रू यदुनाथा..., कृष्णा सांगितली गीता...’ आदी गीते सादर करण्यात आली. ‘ओम नमो भगवते वासुदेवा...’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमात भानुदास कुळकर्णी, पंकज यादव, श्रीकांत सूर्यवंशी, अक्षय आचार्य, सुभाष वानखेडे, सुमंत बोबडे, अरविंद उपाध्ये यांनी विविध वाद्यांवर साथसंगत केली. ध्वनी स्वप्नील उके यांचा तर व्हिडिओ संयोजन जावेद शेख यांचे होते. (प्रतिनिधी)