शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भावपूर्ण सादरीकरणाने रंगलेली ‘श्रीकृष्ण गीतांजली’

By admin | Updated: August 14, 2014 01:24 IST

भगवान श्रीकृष्ण म्हणजे भारतीयांचे आवडते दैवत. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान आणि जीवनाचा अर्थ कळतो तो श्रीकृष्णचरित्रातून. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची मोहिनी कायम भाविकांना पडते.

स्वरतरंग म्युझिक अकॅडमी : भक्तिरसात रसिक झाले चिंबनागपूर : भगवान श्रीकृष्ण म्हणजे भारतीयांचे आवडते दैवत. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान आणि जीवनाचा अर्थ कळतो तो श्रीकृष्णचरित्रातून. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची मोहिनी कायम भाविकांना पडते. त्यामुळे भगवान कृष्णाची जन्माष्टमीही भाविक मोठ्या भक्तिभावाने साजरी करतात. जन्माष्टमी लवकरच येणार आहे. यानिमित्ताने भगवान कृष्णाच्या चरित्राचे गायन करणाऱ्या ‘श्रीकृष्ण गीतांजली’ हा कार्यक्रम आज सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला. स्वरतरंग संगीत अकादमीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे संचालक निरंजन बोबडे यांची होती. ही श्रीकृष्ण गीतांजली चंद्रशेखर वराडपांडे उपाख्य कमलासूत यांनी रचली आहे. विशेषत: या गीतांजलीचा हा पाचवा नागपुरातील कार्यक्रम असूनही रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. भगवान श्रीकृष्णाच्या गीतांचे सुरेल सादरीकरण आणि ज्या प्रसंगावर गीत आधारित आहे तो प्रसंग एलसीडी स्क्रीनद्वारे प्रदर्शित करण्यात येत असल्याने रसिकांना या कार्यक्रमाचा अधिक आनंद घेता आला. आपण साक्षात द्वारकेत कृष्णाच्या राज्यात असल्याचाच भास यावेळी निर्माण करण्यात सारेच कलावंत यशस्वी ठरले. त्यात राजेश अमीन यांनी रंगमंचाची सुबक सजावट केल्याने वातावरणनिर्मिती साधली गेली. किशोर गलांडे आणि स्नेहल खंडकर यांचे विवेचनात्मक भाष्य गीतांचा परिणाम वाढविणारे होते. निरंजनने ‘कथा ही निर्मल भक्तीची...’ या गीताने प्रारंभ केला आणि त्यानंतर सारेच श्रोते कृष्णभक्तीत तल्लीन झाले. गायत्री गायकवाड आणि मंजिरी वैद्य यांनी ‘कृष्ण जन्मला ग सखे...’ हे गीत सादर करून कृष्णजन्माच्या आनंदात रसिकांना भिजविले. त्यानंतर श्रेया खराबे हिने ‘मोहक हे रूप तुझे...’ तर रघुनाथ बोबडे यांनी ‘जाहला कंसाचा संहार...’ आणि श्रीनिधी घटाटेने ‘रुक्मिणी महाराणी जाहली...’ हे गीत तयारीने सादर केले. याप्रसंगी ‘करू या गोवर्धन पूजन..., रसरंगी श्रीरंग रंगला..., अक्रूरा नेशी कुठे घनश्याम..., कलंक स्यमंतका..., सुदामा येई द्वारकापुरी..., दुष्ट तो कालयवन संपला..., वाचावी अब्रू यदुनाथा..., कृष्णा सांगितली गीता...’ आदी गीते सादर करण्यात आली. ‘ओम नमो भगवते वासुदेवा...’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमात भानुदास कुळकर्णी, पंकज यादव, श्रीकांत सूर्यवंशी, अक्षय आचार्य, सुभाष वानखेडे, सुमंत बोबडे, अरविंद उपाध्ये यांनी विविध वाद्यांवर साथसंगत केली. ध्वनी स्वप्नील उके यांचा तर व्हिडिओ संयोजन जावेद शेख यांचे होते. (प्रतिनिधी)