शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

नागपुरात विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या जीवनात ‘अंकुर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:48 IST

विधिसंघर्षग्रस्त बालकांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात घडलेल्या घटनांची आठवण वारंवार त्यांच्या मनात घोळत असते व त्यातून नैराश्य, मानसिक अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांना कोणत्यातरी कामात गुंतवून त्यांच्या मनातून नकारात्मक विचार काढावे, या उद्देशाने बाल न्याय मंडळातर्फे शासकीय मुलांचे निरीक्षण गृह येथे ‘अंकुर प्रोजेक्ट’ राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिसंघर्षग्रस्त बालकांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात घडलेल्या घटनांची आठवण वारंवार त्यांच्या मनात घोळत असते व त्यातून नैराश्य, मानसिक अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांना कोणत्यातरी कामात गुंतवून त्यांच्या मनातून नकारात्मक विचार काढावे, या उद्देशाने बाल न्याय मंडळातर्फे शासकीय मुलांचे निरीक्षण गृह येथे ‘अंकुर प्रोजेक्ट’ राबविण्यात येत आहे.विधिसंघर्षग्रस्त मुलांना ‘जे पेराल ते उगवेल’ या म्हणीचा अर्थ समजावा, त्यांच्यात स्वयंशिस्त लागावी व समाजहिताचे विचार मनात निर्माण व्हावे, हे ध्येय ठेवून बाल न्याय मंडळाने बाल निरीक्षण गृहात २१ जुलै २०२० पासून ‘अंकुर प्रोजेक्ट’ला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पात बालकांना विविध भाज्यांची व झाडांची लागवड व उगवण करण्यात प्रोत्साहित करण्यात येत आहे. तसेच मशरूम लागवड व मशागतदेखील निरीक्षण गृहात एका खोलीमध्ये येथील मुले उत्तमरीत्या करीत आहेत. या उपक्रमात मुलांनी वाफे तयार करून त्यामध्ये पालक, मेथी, टमाटर, मिरची, अद्रक या सारख्या भाज्यांची लागवड केली आहे. त्यांच्यात स्वयंशिस्त व काळजी या दोन गोष्टींची बीजे रुजावीत यासाठी त्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात असून त्यात मुलांनी दाखविलेली आवड प्रशंसनीय आहे. रोपट्यांची व झाडांची देखरेख त्यांच्यातील जबाबदारीची जाणीव करून देणारी ठरली आहे.हा प्रकल्प बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी शर्वरी महेश जोशी यांच्या मार्गदर्शनात सुरू असून अंकुर प्रकल्पासाठी निरीक्षण गृहाच्या अधीक्षिका नम्रता चौधरी मुलांना प्रोत्साहन देत आहेत. या उपक्रमातील विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनास योग्य दिशा मिळावी हा बाल न्याय मंडळाचा उद्देश आहे. यापूर्वी एका प्रकरणात बाल न्याय मंडळाने सेवाकार्य तसेच बागकाम करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय यापूवीर्ही बाल न्याय मंडळाने विधिसंघर्षग्रस्त बालकांसाठी घेतलेले निर्णय मार्गदर्शक ठरले होते हे विशेष.मुलांचे होते समुपदेशनकोविड-१९ च्या काळातही बाल न्याय मंडळाचे काम अविरत सुरू असून दररोज प्रकरणांचा निपटारा केला जात आहे. विविध प्रकरणात न्यायदंडाधिकारी शर्वरी महेश जोशी व दामोदर यादवराव जोगी समुपदेशनाद्वारे मुलांना शिक्षण, पुनर्वसन व त्यांच्या भावी आयुष्याबाबत समजावून सांगितले जाते. विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या मनात समाजाप्रती कर्तव्याची जाणीव व्हावी हा हेतू आहे.

टॅग्स :nagpurनागपूर