शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या जीवनात ‘अंकुर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:48 IST

विधिसंघर्षग्रस्त बालकांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात घडलेल्या घटनांची आठवण वारंवार त्यांच्या मनात घोळत असते व त्यातून नैराश्य, मानसिक अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांना कोणत्यातरी कामात गुंतवून त्यांच्या मनातून नकारात्मक विचार काढावे, या उद्देशाने बाल न्याय मंडळातर्फे शासकीय मुलांचे निरीक्षण गृह येथे ‘अंकुर प्रोजेक्ट’ राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिसंघर्षग्रस्त बालकांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात घडलेल्या घटनांची आठवण वारंवार त्यांच्या मनात घोळत असते व त्यातून नैराश्य, मानसिक अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांना कोणत्यातरी कामात गुंतवून त्यांच्या मनातून नकारात्मक विचार काढावे, या उद्देशाने बाल न्याय मंडळातर्फे शासकीय मुलांचे निरीक्षण गृह येथे ‘अंकुर प्रोजेक्ट’ राबविण्यात येत आहे.विधिसंघर्षग्रस्त मुलांना ‘जे पेराल ते उगवेल’ या म्हणीचा अर्थ समजावा, त्यांच्यात स्वयंशिस्त लागावी व समाजहिताचे विचार मनात निर्माण व्हावे, हे ध्येय ठेवून बाल न्याय मंडळाने बाल निरीक्षण गृहात २१ जुलै २०२० पासून ‘अंकुर प्रोजेक्ट’ला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पात बालकांना विविध भाज्यांची व झाडांची लागवड व उगवण करण्यात प्रोत्साहित करण्यात येत आहे. तसेच मशरूम लागवड व मशागतदेखील निरीक्षण गृहात एका खोलीमध्ये येथील मुले उत्तमरीत्या करीत आहेत. या उपक्रमात मुलांनी वाफे तयार करून त्यामध्ये पालक, मेथी, टमाटर, मिरची, अद्रक या सारख्या भाज्यांची लागवड केली आहे. त्यांच्यात स्वयंशिस्त व काळजी या दोन गोष्टींची बीजे रुजावीत यासाठी त्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात असून त्यात मुलांनी दाखविलेली आवड प्रशंसनीय आहे. रोपट्यांची व झाडांची देखरेख त्यांच्यातील जबाबदारीची जाणीव करून देणारी ठरली आहे.हा प्रकल्प बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी शर्वरी महेश जोशी यांच्या मार्गदर्शनात सुरू असून अंकुर प्रकल्पासाठी निरीक्षण गृहाच्या अधीक्षिका नम्रता चौधरी मुलांना प्रोत्साहन देत आहेत. या उपक्रमातील विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनास योग्य दिशा मिळावी हा बाल न्याय मंडळाचा उद्देश आहे. यापूर्वी एका प्रकरणात बाल न्याय मंडळाने सेवाकार्य तसेच बागकाम करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय यापूवीर्ही बाल न्याय मंडळाने विधिसंघर्षग्रस्त बालकांसाठी घेतलेले निर्णय मार्गदर्शक ठरले होते हे विशेष.मुलांचे होते समुपदेशनकोविड-१९ च्या काळातही बाल न्याय मंडळाचे काम अविरत सुरू असून दररोज प्रकरणांचा निपटारा केला जात आहे. विविध प्रकरणात न्यायदंडाधिकारी शर्वरी महेश जोशी व दामोदर यादवराव जोगी समुपदेशनाद्वारे मुलांना शिक्षण, पुनर्वसन व त्यांच्या भावी आयुष्याबाबत समजावून सांगितले जाते. विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या मनात समाजाप्रती कर्तव्याची जाणीव व्हावी हा हेतू आहे.

टॅग्स :nagpurनागपूर