शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आध्यात्मिक; स्पर्धा स्वत:शीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:44 IST

दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यापेक्षा जेव्हा आपण एकमेकांशी सहकार्य करतो तेव्हाच आपल्या सगळ्यांचा सर्वांगीण विकास होतो.

ठळक मुद्देएकमेकां साह्य करुं, अवघे धरू सुपंथ

प्रा. डॉ. संदीप ताटेवार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:आमच्या मित्रमंडळीने सहलीला जाण्यासाठी दोन बसेस ठरविल्या होत्या. एक बस समोर होती. आमची बस मागे होती. प्रवास सुखदपणे सुरु झाला. आमच्या बसमधील लोक छान गाण्याच्या भेंड्या खेळत होते. काही लोक गप्पागोष्टीत रंगले होते. प्रत्येकजण आनंदात होते. तितक्यात आमच्यापैकी एकजण म्हणाला की, आपली बस त्यांच्या बस समोर गेली पाहिजे. सर्वांनी माना डोकावल्या. आमची बस खूप वेगाने पळायला लागली. आता बसमधील लोकांनी गाणे म्हणायचे व छान गप्पागोष्टी करायच्या सोडून आपली बस व पुढची बस यामधील अंतरावर लक्ष केंद्रीत केले. थोड्याच वेळात सुरळीतपणे चालू असलेल्या आमच्या बसमध्ये अति गतीमुळे कंप जाणवू लागले त्यामुळे प्रवाशांना धक्के बसू लागले. जशी जशी दोन्हीही बस मधील अंतर कमी जास्त होऊ लागले तसे तसे बसमधील प्रवाशांच्या चेहऱ्यांवर तणाव जाणवू लागला. आता दोन्हीही बसमध्ये स्पर्धा निर्माण झाली होती. चांगला आनंदात चालू असलेला प्रवासाचे रुपांतर काहीही कारण नसतांना तणावात झाले होते.आपल्या आयुष्याचं असंच असतं. आपला चांगला सुखात चालू असलेला आयुष्याचा प्रवास आपण दुसऱ्यांशी अनावश्यक स्पर्धा करून दु:खात रुपांतरित करीत असतो. खरंतर, स्पर्धा आपण आपल्या स्वत:शीच करायला पाहिजे. पहिले मी कसा होतो व आता कसा आहे? माझ्यामध्ये पहिले किती दुर्गुण होते, आता किती राहिले आहेत? माझ्या मनामध्ये कोणत्या चुकीच्या मान्यता होत्या व त्या घालविण्यासाठी मला किती वेगाने प्रयत्न करावे लागतील, याबाबत स्वत:शी स्पर्धा करायला पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्यांशी स्पर्धा करीत नाही तेव्हा आपलं मन शांत असते. आपली कल्पकता वाढते, सकारात्मकता वाढते, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. एक स्वछ, निर्मळ व सुंदर जीवन आपण जगू शकतो. स्पर्धेमुळे इर्षा, असूया, क्रोध, मत्सर, अहंकार हे दुर्गुण वाढीस लागतात. आज समाजात प्रत्येकजण एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात. स्पर्धा जिंकण्यासाठी एकमेकांना मागे ओढत व तुडवत पुढे जाण्याचा सर्वजण प्रयत्न करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यापेक्षा जेव्हा आपण एकमेकांशी सहकार्य करतो तेव्हाच आपल्या सगळ्यांचा सर्वांगीण विकास होतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात,एकमेकां साह्य करुं, अवघे धरू सुपंथ************************

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकsant tukaramसंत तुकाराम