शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोनाच्या उपाययोजनावर १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 11:45 IST

ग्रामविकास विभागाने तर ग्रा.पं.ला दिल्या जाणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपाययोजनांवर खर्च करा असे आदेश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ग्रामविकास विभागाने तर ग्रा.पं.ला दिल्या जाणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपाययोजनांवर खर्च करा असे आदेश दिले आहेत. पण निधी कसा आणि कुठे खर्च करावा, यावर कुठलेच मार्गदर्शन नसल्याने सरपंच, ग्रामसेवक संभ्रमात आहेत.केंद्र सरकारकडून १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रा.पं.च्या खात्यावर वळता करण्यात येतो. तो कुठल्या कामांवर खर्च करायचा यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिली जाते. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १४ व्या वित्त आयोगाच्या निधीपैकी २५ टक्के निधी हा ग्रा.पं.ना मानव विकास निर्देशांक वृद्धी संबंधित कामासाठी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाकडून सीईओंना निर्देश देण्यात आले आहेत. पंचायत विभागाच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे. १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यासाठी ग्रामसभेद्वारे मान्यता घ्यावी लागते. परंतु सद्यस्थितीत ग्रामसभा घेणे शक्य नाही. त्यामुळे कोरोनाविषयी प्रतिबंधात्मक व इतर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायंतींनी त्यांच्या स्तरावर तालुका तांत्रिक समितीची मंजुरी घेऊन सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले आहेत.जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शासनाचे आदेश ग्रामपंचायतींना पाठविले. पण निधी क सा खर्च करावा, याची मार्गदर्शक सूचना दिली नाही. ग्रा.पं.चे सरपंच व ग्रामसेवकांच्या मते, १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा कसा खर्च करावा, याचे मार्गदर्शन केंद्र सरकार करते. ग्रा.पं.ला निधी मिळाल्यानंतर २०२०-२१ च्या खर्चाचे नियोजनदेखील झाले आहे. शिवाय ५० हजारावर निधी खर्च करण्यासाठी टेंडर करावे लागते. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना करताना नेमके काय करावे, यासंदर्भात कुठलेही मार्गदर्शन नाही. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून एलईडी खरदी प्रकरणात झालेल्या घोटाळ्यामुळे ग्रामसेवक व सरपंच मार्गदर्शन नसल्याने हात काढत आहे. ५० हजारावर निधी खर्च करण्यासाठी टेंडर काढावे लागतात. परंतु ई-टेंडरिंंग बंद आहे. तांत्रिक मार्गदर्शन नसल्याने काय फवारावे, कुठल्या उपायोजना कराव्या, नियम तोडून केल्यास आॅडिटमध्ये कुणी ऐकून घेत नाही, त्यामुळे ग्रामसेवक पुढाकार घेत नाहीत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस