शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कोरोनाच्या उपाययोजनावर १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 11:45 IST

ग्रामविकास विभागाने तर ग्रा.पं.ला दिल्या जाणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपाययोजनांवर खर्च करा असे आदेश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ग्रामविकास विभागाने तर ग्रा.पं.ला दिल्या जाणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपाययोजनांवर खर्च करा असे आदेश दिले आहेत. पण निधी कसा आणि कुठे खर्च करावा, यावर कुठलेच मार्गदर्शन नसल्याने सरपंच, ग्रामसेवक संभ्रमात आहेत.केंद्र सरकारकडून १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रा.पं.च्या खात्यावर वळता करण्यात येतो. तो कुठल्या कामांवर खर्च करायचा यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिली जाते. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १४ व्या वित्त आयोगाच्या निधीपैकी २५ टक्के निधी हा ग्रा.पं.ना मानव विकास निर्देशांक वृद्धी संबंधित कामासाठी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाकडून सीईओंना निर्देश देण्यात आले आहेत. पंचायत विभागाच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे. १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यासाठी ग्रामसभेद्वारे मान्यता घ्यावी लागते. परंतु सद्यस्थितीत ग्रामसभा घेणे शक्य नाही. त्यामुळे कोरोनाविषयी प्रतिबंधात्मक व इतर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायंतींनी त्यांच्या स्तरावर तालुका तांत्रिक समितीची मंजुरी घेऊन सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले आहेत.जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शासनाचे आदेश ग्रामपंचायतींना पाठविले. पण निधी क सा खर्च करावा, याची मार्गदर्शक सूचना दिली नाही. ग्रा.पं.चे सरपंच व ग्रामसेवकांच्या मते, १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा कसा खर्च करावा, याचे मार्गदर्शन केंद्र सरकार करते. ग्रा.पं.ला निधी मिळाल्यानंतर २०२०-२१ च्या खर्चाचे नियोजनदेखील झाले आहे. शिवाय ५० हजारावर निधी खर्च करण्यासाठी टेंडर करावे लागते. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना करताना नेमके काय करावे, यासंदर्भात कुठलेही मार्गदर्शन नाही. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून एलईडी खरदी प्रकरणात झालेल्या घोटाळ्यामुळे ग्रामसेवक व सरपंच मार्गदर्शन नसल्याने हात काढत आहे. ५० हजारावर निधी खर्च करण्यासाठी टेंडर काढावे लागतात. परंतु ई-टेंडरिंंग बंद आहे. तांत्रिक मार्गदर्शन नसल्याने काय फवारावे, कुठल्या उपायोजना कराव्या, नियम तोडून केल्यास आॅडिटमध्ये कुणी ऐकून घेत नाही, त्यामुळे ग्रामसेवक पुढाकार घेत नाहीत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस