शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

‘बुद्धिस्ट सर्किट’च्या कामाचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 21:42 IST

तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना मानणारे अनुयायी जगभरात असून सर्वांना भारताबद्दल विशेष प्रेम आहे. देशातील व विदेशातील पर्यटकांना सहजतेने बौद्ध स्थळांना सहजपणे भेटी देता याव्यात व ‘कनेक्टिव्हिटी’ वाढावी यासाठी ‘बुद्धिस्ट सर्किट’ व ‘धर्मयात्रा सर्किट’ची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर यासारख्या महत्त्वाच्या स्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी महामार्ग बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात विशेष पुढाकार घेतला आहे. हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण व्हावे, यासाठी ते स्वत: याकडे लक्ष देत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देलुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर एकमेकांशी जुळणार‘धर्मयात्रा सर्किट’वरदेखील भरभूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून नियमित ‘वॉच’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना मानणारे अनुयायी जगभरात असून सर्वांना भारताबद्दल विशेष प्रेम आहे. देशातील व विदेशातील पर्यटकांना सहजतेने बौद्ध स्थळांना सहजपणे भेटी देता याव्यात व ‘कनेक्टिव्हिटी’ वाढावी यासाठी ‘बुद्धिस्ट सर्किट’ व ‘धर्मयात्रा सर्किट’ची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर यासारख्या महत्त्वाच्या स्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी महामार्ग बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात विशेष पुढाकार घेतला आहे. हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण व्हावे, यासाठी ते स्वत: याकडे लक्ष देत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.जगभरातील पर्यटक भारतातील बौद्ध स्थळांना ते वर्षभर भेटी देत असतात. त्यामुळे बौद्ध स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास मोठ्या प्रमाणावर पर्यटक वाढतील आणि त्यातून रोजगार वाढेल, या उद्देशाने केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी देशभरातील ३८ ‘बुद्धिस्ट सर्किट’ची घोषणा केली. लुंबिनीला आलेल्या पर्यटकास बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर यांच्यासह देशातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाच्या सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, यासाठी आराखडादेखील तयार करण्यात आला.याअंतर्गत सुरू असलेल्या कामाला वेग आला आहे. ‘बुद्धिस्ट सर्किट’अंतर्गत बिहार राज्यातील बुद्धगया, नालंदा, राजगीर, वैशाली, कहालगाव, पटना यांना एकमेकांशी जोडण्यात येत आहे. तर ‘धम्मयात्रा सर्किट’अंतर्गत बिहारमधील बुद्धगया, उत्तर प्रदेशमधील सारनाथ, कुशीनगर व पिपरवाह यांना जोडण्याचा आराखडा तयार आहे. याशिवाय विस्तारित ‘धम्मयात्रा सर्किट’अंतर्गत बिहार राज्यातील बुद्धगया, विक्रमशीला, उत्तर प्रदेशमधील सारनाथ, कुशीनगर, कपिलवस्तू, संकिसा, पिपरवाह यांना एकमेकांशी जोडण्यात येत आहे. या तिन्ही ‘सर्किट’ला जोडण्यासाठी महामार्गांचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी तर काम बहुतांशपणे संपण्याच्या मार्गावरदेखील आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी राज्य शासनाला शक्य ते सहकार्य करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीNitin Gadkariनितीन गडकरी