शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

‘बुद्धिस्ट सर्किट’च्या कामाचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 21:42 IST

तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना मानणारे अनुयायी जगभरात असून सर्वांना भारताबद्दल विशेष प्रेम आहे. देशातील व विदेशातील पर्यटकांना सहजतेने बौद्ध स्थळांना सहजपणे भेटी देता याव्यात व ‘कनेक्टिव्हिटी’ वाढावी यासाठी ‘बुद्धिस्ट सर्किट’ व ‘धर्मयात्रा सर्किट’ची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर यासारख्या महत्त्वाच्या स्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी महामार्ग बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात विशेष पुढाकार घेतला आहे. हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण व्हावे, यासाठी ते स्वत: याकडे लक्ष देत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देलुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर एकमेकांशी जुळणार‘धर्मयात्रा सर्किट’वरदेखील भरभूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून नियमित ‘वॉच’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना मानणारे अनुयायी जगभरात असून सर्वांना भारताबद्दल विशेष प्रेम आहे. देशातील व विदेशातील पर्यटकांना सहजतेने बौद्ध स्थळांना सहजपणे भेटी देता याव्यात व ‘कनेक्टिव्हिटी’ वाढावी यासाठी ‘बुद्धिस्ट सर्किट’ व ‘धर्मयात्रा सर्किट’ची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर यासारख्या महत्त्वाच्या स्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी महामार्ग बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात विशेष पुढाकार घेतला आहे. हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण व्हावे, यासाठी ते स्वत: याकडे लक्ष देत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.जगभरातील पर्यटक भारतातील बौद्ध स्थळांना ते वर्षभर भेटी देत असतात. त्यामुळे बौद्ध स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास मोठ्या प्रमाणावर पर्यटक वाढतील आणि त्यातून रोजगार वाढेल, या उद्देशाने केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी देशभरातील ३८ ‘बुद्धिस्ट सर्किट’ची घोषणा केली. लुंबिनीला आलेल्या पर्यटकास बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर यांच्यासह देशातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाच्या सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, यासाठी आराखडादेखील तयार करण्यात आला.याअंतर्गत सुरू असलेल्या कामाला वेग आला आहे. ‘बुद्धिस्ट सर्किट’अंतर्गत बिहार राज्यातील बुद्धगया, नालंदा, राजगीर, वैशाली, कहालगाव, पटना यांना एकमेकांशी जोडण्यात येत आहे. तर ‘धम्मयात्रा सर्किट’अंतर्गत बिहारमधील बुद्धगया, उत्तर प्रदेशमधील सारनाथ, कुशीनगर व पिपरवाह यांना जोडण्याचा आराखडा तयार आहे. याशिवाय विस्तारित ‘धम्मयात्रा सर्किट’अंतर्गत बिहार राज्यातील बुद्धगया, विक्रमशीला, उत्तर प्रदेशमधील सारनाथ, कुशीनगर, कपिलवस्तू, संकिसा, पिपरवाह यांना एकमेकांशी जोडण्यात येत आहे. या तिन्ही ‘सर्किट’ला जोडण्यासाठी महामार्गांचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी तर काम बहुतांशपणे संपण्याच्या मार्गावरदेखील आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी राज्य शासनाला शक्य ते सहकार्य करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीNitin Gadkariनितीन गडकरी