शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

तपासाला अधिक गती द्या!

By admin | Updated: December 16, 2015 03:15 IST

नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला २८ महिने आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाला १० महिन्यांचा कालावधी लोटला असताना आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येऊ शकले नाही.

दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरण : कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीगणेश खवसे  नागपूरनरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला २८ महिने आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाला १० महिन्यांचा कालावधी लोटला असताना आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येऊ शकले नाही. त्यामुळे असंतोष वाढत चालला आहे. हे पाहता या प्रकरणाचा तपास अधिक गतीने करण्यात यावा, अशी मागणी दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांनी केली असून याबाबत कुटुंबीयांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. दोन्ही विचारवंतांची हत्या होऊन मोठा कालावधी लोटूनही आरोपी पकडले न गेल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. हमीद दाभोलकर आणि मेघा पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत छोटेखानी बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या खुनाला एवढ्या महिन्यांचा कालावधी लोटला असताना त्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यातल्या त्यात केंद्र आणि राज्याच्या तपास यंत्रणेमध्ये योग्य समन्वय नाही. समन्वयाचा अभाव असल्याने आरोपींपर्यंत पोहोचण्यात अडचणी जात आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी की, जी चौकशी समिती शासनाने नेमली आहे; त्यातील अधिकाऱ्यांवर ही चौकशी करण्याव्यतिरिक्त नियमित कामांचा बोजा आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा एकीकडे लक्ष केंद्रित करता येत नाही. यासाठी शासनाने केवळ या खुनांचा तपास करण्यासाठी विशेष अशा पथकाची नेमणूक करणे गरजेचे आहे, अशी मागणी हमीद दाभोलकर यांनी विधानभवनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना केली. त्यांच्यासोबत कॉ. पानसरे यांची स्नुषा मेघा पानसरे यासुद्धा उपस्थित होत्या. या प्रकरणाचा तपास करणाऱ्यांच्या तपासावर समाधानी आहात का, असा प्रश्न हमीद आणि मेघा पानसरे यांना विचारला असता तपासावर समाधानी होण्याचे कारणच नाही असे सांगत एवढा कालावधी खूप झाला. या कालावधीमध्ये तपासाच्या मुळापर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही, हे खरेच क्लेषदायक आहे.दोन विचारवंतांची हत्या झाली असताना त्यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचता न येणे हे खरेच गंभीर आहे, असेही हमीद यांनी सांगितले.सक्षम अधिकाऱ्यांची नावे सूचवाकॉ. पानसरे यांच्या खुनाचा तपास करणारे कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची तपास होण्यापूर्वीच बदली करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास थंडावल्याचा आरोप होत आहे. अशात या प्रकरणाचा तपास करण्यासाठी याबाबत माहिती असलेलाच सक्षम अधिकारी व्यवस्थितरीत्या तपास करू शकतो, हे डॉ. हमीद दाभोलकर आणि मेघा पानसरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ध्यानात आणून दिले. त्यावर सक्षम अशा अधिकाऱ्यांची तुम्हीच नावे सुचवा, अशीे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्याचे हमीद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिना बोरा हत्याकांडात जलदगती कशी?शिना बोरा हत्याकांड हे लब्धप्रतिष्ठितांशी संबंधित असे प्रकरण होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करीत असताना त्या प्रकरणातील आरोपींना अटक करून चार्जशिटही दाखल केली. दुसरीकडे विचारवंतांचा खून होऊनही तेवढी तत्परता पोलिसांना दाखविली नाही, असा दुजाभाव कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.