शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जलजीवन मिशनची गती संथ; २९ कंत्राटदारांना दंड

By गणेश हुड | Updated: July 16, 2024 20:02 IST

जि.प.च्या बैठकीत पाणीपुरवठा योजनांचा आढावा

नागपूर : जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या कामांची संथगती आहे.१३०४ मंजूर योजनांपैकी केवळ ४५७ कामेच पूर्ण झाली आहेत. अन्य कामे प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सप्टेंबरपर्यत कामांना मुदत असताना १९ गावांतील योजनांना सुरुवातच झालेली नाही. तर ५४ योजनांची कामे जेमतेम २५ टक्के, २०९ योजनांची कामे २५ ते ४९ टक्के झाली आहे. २६२ योजनांची कामे ५० ते ७४ टक्के झाल्याचा दावा केला प्रशासनाने केला आहे. कामांना विलंब करणाऱ्या २९ कंत्राटदारांना दंड आकारण्यात आला आहे.

जलजीवन मिशन योजनेसंदर्भात असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे व खासदार श्यामकुमार बर्वे यांनी तालुकानिहाय कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच व नागरिकांनी तक्रारीचा पाठा वाचला. दोघांनीही कामांच्याबाबत नाराजी व्यक्त करीत २९ कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. तर २१४ कामांचा आराखड्यात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. यावेळी उपाध्यक्ष कुंदा राऊत, सीईओ सौम्या शर्मा, महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, माजी जि.प.अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सप्टेंबर २०२४ पर्यंत या योजनेची मुदत आहे. परंतु अद्यापर्यंत कामेच निम्मेच कामे पूर्ण झाली नाही. काही ठिकाणी कामांची सुरवात झाली नसून कामांच्या दर्जावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काही ठिकाणी फक्त कामांनी सुरवात झाली, परंतु वर्षभरानंतरही त्यात प्रगती नाही. अधिकाऱ्यांकडून या तक्रारीवर थातूरमातून उत्तर देण्यात आले. यावर कोकड्डे व बर्वे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दोन कामे रद्द करीत २१४ कामांचा आराखाडा नव्याने तयार करण्याचे निर्देश दिले.

ग्रामपंचायतींना आराखडेच माहिती नाहीगावात कुठे टाकी तयार करण्यात येणार आहे, त्यावर किती खर्च मंजूर आहे, कंत्राटदार कोण, किती मुदतीत कामे करायची आहे, याची संपूर्ण माहिती ग्रामपंचायतींना देण्याच्या सूचनामुक्ता कोकड्डे व सीईओ सौम्या शर्मा यांनी विभागाला दिल्या होत्या. परंतु विभागातील अधिकाऱ्यांनी याची माहिती ग्रामपंचायतींनी दिली नसल्याची बाब आढावा बैठकीच्या अनुषंगाने समोर आली.

थकीत वीज बिलाचा फटकाजिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींकडे वीज बिलाची मोठ्याप्रमाणात थकबाकी आहे. त्यात नवीन योजनेचा वीज जोडणीचा बोजा ग्रामपंचायती भरण्यास सक्षम नाही. याचाही योजनांना फटका बसला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर