शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

जलजीवन मिशनची गती संथ; २९ कंत्राटदारांना दंड

By गणेश हुड | Updated: July 16, 2024 20:02 IST

जि.प.च्या बैठकीत पाणीपुरवठा योजनांचा आढावा

नागपूर : जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या कामांची संथगती आहे.१३०४ मंजूर योजनांपैकी केवळ ४५७ कामेच पूर्ण झाली आहेत. अन्य कामे प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सप्टेंबरपर्यत कामांना मुदत असताना १९ गावांतील योजनांना सुरुवातच झालेली नाही. तर ५४ योजनांची कामे जेमतेम २५ टक्के, २०९ योजनांची कामे २५ ते ४९ टक्के झाली आहे. २६२ योजनांची कामे ५० ते ७४ टक्के झाल्याचा दावा केला प्रशासनाने केला आहे. कामांना विलंब करणाऱ्या २९ कंत्राटदारांना दंड आकारण्यात आला आहे.

जलजीवन मिशन योजनेसंदर्भात असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे व खासदार श्यामकुमार बर्वे यांनी तालुकानिहाय कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच व नागरिकांनी तक्रारीचा पाठा वाचला. दोघांनीही कामांच्याबाबत नाराजी व्यक्त करीत २९ कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. तर २१४ कामांचा आराखड्यात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. यावेळी उपाध्यक्ष कुंदा राऊत, सीईओ सौम्या शर्मा, महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, माजी जि.प.अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सप्टेंबर २०२४ पर्यंत या योजनेची मुदत आहे. परंतु अद्यापर्यंत कामेच निम्मेच कामे पूर्ण झाली नाही. काही ठिकाणी कामांची सुरवात झाली नसून कामांच्या दर्जावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काही ठिकाणी फक्त कामांनी सुरवात झाली, परंतु वर्षभरानंतरही त्यात प्रगती नाही. अधिकाऱ्यांकडून या तक्रारीवर थातूरमातून उत्तर देण्यात आले. यावर कोकड्डे व बर्वे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दोन कामे रद्द करीत २१४ कामांचा आराखाडा नव्याने तयार करण्याचे निर्देश दिले.

ग्रामपंचायतींना आराखडेच माहिती नाहीगावात कुठे टाकी तयार करण्यात येणार आहे, त्यावर किती खर्च मंजूर आहे, कंत्राटदार कोण, किती मुदतीत कामे करायची आहे, याची संपूर्ण माहिती ग्रामपंचायतींना देण्याच्या सूचनामुक्ता कोकड्डे व सीईओ सौम्या शर्मा यांनी विभागाला दिल्या होत्या. परंतु विभागातील अधिकाऱ्यांनी याची माहिती ग्रामपंचायतींनी दिली नसल्याची बाब आढावा बैठकीच्या अनुषंगाने समोर आली.

थकीत वीज बिलाचा फटकाजिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींकडे वीज बिलाची मोठ्याप्रमाणात थकबाकी आहे. त्यात नवीन योजनेचा वीज जोडणीचा बोजा ग्रामपंचायती भरण्यास सक्षम नाही. याचाही योजनांना फटका बसला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर