शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

एसटीच्या विकासात स्पीड ब्रेकर!

By admin | Updated: November 18, 2015 00:38 IST

प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात तेच परंपरागत धोरण, नव्या बदलांकडे पाठ आणि प्रवाशांना काय हवे काय नको याची जाणीव न ठेवता वर्षानुवर्षे त्याच गतीने

एस.टी. केव्हा टाकणार कात? : महामार्ग होऊनही वेग मात्र वाढेना, काळ बदलूनही एस.टी.ची सेवा मात्र ‘जैसे थे’चभंडारा : प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात तेच परंपरागत धोरण, नव्या बदलांकडे पाठ आणि प्रवाशांना काय हवे काय नको याची जाणीव न ठेवता वर्षानुवर्षे त्याच गतीने आणि भूमिकेने वाटचाल करणाऱ्या एसटी महामंडळाची प्रवासी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रवासी ऐषोआराम पुरविणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळत आहेत. खाजगी वाहनांच्या तुलनेत हंगाम वगळता एसटीचे प्रवासभाडे नेहमीच खाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक राहत असल्यामुळे प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देत आहेत. प्रवासी पैसे मोजून स्लीपर क्लास बसेसमध्ये जाण्यास इच्छुक असताना एसटी महामंडळ मात्र त्याच पारंपरिक बसेस प्रवाशांना उपलब्ध करून देते. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूक सुरू केली. परंतु बदलत्या काळानुसार एसटीला आपल्या धोरणात बदल करणे गरजेचे असताना एसटीने कुठलाच बदल घडवून आणला नाही. या कारणामुळे एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणारे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत असून, एसटी महामंडळाची धावपळीच्या स्पर्धेच्या युगात कासवगतीने वाटचाल सुरू आहे. बसेसमध्ये करमणुकीच्या साधनांचाही अभावखाजगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करताना प्रवाशांना गाणी, चित्रपट दाखविण्यात येतात. परंतु एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये अशी कुठलीच सुविधा नसते. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना कंटाळवाणे वाटते. यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये करमणुकीच्या साधनांचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे.कर्मचाऱ्यांचा तुटवडाआधुनिक साधनांचा अभावमहामंडळात चालक-वाहक, तंत्रज्ञांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो. यामुळे महामंडळाने ठरविलेले शेड्यूल वेळेवर चालू शकत नाही. त्यासाठी रिक्त पदांची समस्या निकाली काढण्याची गरज आहे. वाहतूक क्षेत्रात नवनवे तांत्रिक बदलासोबतच संगणकीकरण होत आहे. परंतु एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी मात्र त्याच पारंपरिक पद्धतीने काम करताना दिसत असून एसटी कात टाकण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)‘स्पीड लॉक’मुळे प्रवासी कंटाळलेत एसटी महामंडळाने आपल्या सर्व बसेसचा ‘स्पीड लॉक’ केलेला असतो. यामुळे एका विशिष्ट क्षमतेच्यावर एसटीच्या बसेस धावत नाहीत. यामुळे प्रवाशांना नियोजितस्थळी पोहोचण्यासाठी विलंब होतो. भंडारा - नागपूर हा आता चौपदरी मार्ग झाला आहे. तरीसुद्धा वेग बांधलेला असल्यामुळे या मार्गावर बसेस कमी वेगानेच धावतात. विशेष म्हणजे जलद आणि साधारण, जनता बसेसचा वेग सारखाच असतो. बस वेगाने चालविणे हे चालकावर अवलंबून असते. खाजगी वाहतुकीच्या वाहनांचा वेग एसटीच्या तुलनेत कितीतरी अधिक असतो. त्यामुळे प्रवाशांना वेळेत आपल्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होते. खाजगी वाहतुकीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाला ‘स्पीड लॉक’चे धोरण बंद करण्याची गरज आहे.खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा भाडे अधिकएसटी महामंडळाच्या बसेसचे प्रवासभाडे खाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत नेहमीच अधिक असते. भंडाराहून नागपूरला जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स एसटीच्या बसपेक्षा १० ते १५ रूपये कमी तिकीट आकारून प्रवाशांची वाहतूक करते. परंतु एसटी महामंडळ स्पर्धेत उतरून प्रवासी मिळविण्याच्या उद्देशाने प्रवासी भाड्यात तडजोड करण्यासाठी तयार नाही. यामुळे एसटीचे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत असून त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे.बसेसची अवस्थाही दयनीयएसटी महामंडळाच्या बसेस अनेकदा स्वच्छ नसतात. त्यामुळे बस पाहताच प्रवाशांना या बसने प्रवास करावा की नाही, असा प्रश्न पडतो. बसमध्येही थुंकी, कचरा, घाण दिसल्यामुळे प्रवाशांचा भ्रमनिरास होतो. खाजगी बसेस चकाचक असतात. त्यातील सीटही आरामदायक असतात. प्रवासभाडेही एसटीच्या तुलनेत कमी असल्यामुळे साहजिकच प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सकडे आकर्षित होतात. स्लीपर क्लास, एसी बसेसची सुविधा नाहीत. लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी एसी आणि स्लीपर क्लास बसेसना प्राधान्य देतात. खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडे बुकिंग करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना वेटिंगमध्ये राहावे लागते. प्रवासीवर्ग असताना एसटी महामंडळाने स्लीपर क्लास बसेस, एसी बसेस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसत नाही. यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सच्या स्लीपर क्लास बसेसने प्रवासी प्रवास करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.