शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
5
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
6
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
7
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
9
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
10
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
11
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
12
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
13
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
14
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
15
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
16
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
17
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
18
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
20
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार

बायोटॉयलेट प्रकल्पाला मिळणार गती

By admin | Updated: March 7, 2017 02:01 IST

रेल्वे अर्थसंकल्पात २०१९ पर्यंत देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लावण्याची घोषणा करण्यात आली.

मोतीबागेत रेल्वेचा पायलट प्रकल्प : पुढील वर्षी तयार होतील तीन हजार बायोटॉयलेटनागपूर : रेल्वे अर्थसंकल्पात २०१९ पर्यंत देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लावण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे मोतीबाग बायोटॉयलेट प्रकल्पाला गती वाढविण्याचे वेध लागले आहे. यापूर्वीसुद्धा या प्रकल्पाची क्षमता वाढविण्याची तयारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने दाखविली होती. परंतु त्याबाबत पुढे काहीच होऊ शकले नाही. अर्थसंकल्पातील घोषणेमुळे प्रकल्पाची गती वाढणार असून, पुढील वर्षी या प्रकल्पात तीन हजार बायोटॉयलेट तयार करण्यात येणार आहेत. मोतीबागच्या बायोटॉयलेट प्रकल्पात बायोटॉयलेटसाठी लागणाऱ्या पाण्यात इनॉक्युलम बॅक्टेरियाची निर्मिती केली जाते. या प्लॅन्टची क्षमता प्रति दिवस ५०० लिटर पाण्याची आहे. २०१४-१५ या वर्षात प्रकल्प सुरू झाला, मात्र प्रत्यक्षात २०१५-१६ यावर्षी कामाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी मोतीबाग प्रकल्पातून ६१० बायोटॉयलेट तयार झाले. मध्य रेल्वेच्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदा येथील बायोटॉयलेट लावण्यात आले. तत्पूर्वी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतही काही महत्त्वपूर्ण गाड्यात बायोटॉयलेट लावण्यात आले असले तरी त्यांची संख्या अतिशय कमी आहे. भारतीय रेल्वेचा हा देशातील एकमेव पायलट प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी दपूम रेल्वे प्रशासनाने आग्रहाची भूमिका घेतली होती. दपूम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी या प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ करण्याची तयारी दर्शवून या प्रकल्पातील २५०० बायोटॉयलेट विविध रेल्वे झोनमधील गाड्याात लावले. पुढील वर्षी तीन हजार बायोटॉयलेट निर्मितीचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लावण्यासाठी वर्षाला अडीच लाख बायोटॉयलेटची गरज आहे. या प्रकल्पातून सध्या २५०० बायोटॉयलेटची निर्मिती होत आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची उत्पादनक्षमता फारच कमी आहे. त्यामुळे रेल्वे खासगी तत्त्वावर बायोटॉयलेट विकत घेत आहे. मोतीबाग प्रकल्पाची क्षमता वाढल्यास लवकरच देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लागणार आहेत. (प्रतिनिधी)अशी आहे प्रक्रिया प्रकल्पातील साठवणूक केलेल्या पाण्यात इनॉक्युलम बॅक्टेरियाची निर्मिती होते. हे पाणी लिटर प्रमाणे मागेल त्या रेल्वेला पाठविले जाते. चौकोनी आकाराच्या डब्यात हे पाणी असलेली टाकी रेल्वेतील शौचालयाखाली लावली जाते. मानवी मलमूत्र या टाकीत साचते. मात्र या टाकीत असलेले इनॉक्युलम बॅक्टेरिया यातील मल नष्ट करून त्याचे पाण्यात रूपांतर करतात. बॅक्टेरियाने तयार केलेल्या पाण्याची पातळी वाढली की ते बाहेर पडत राहते. त्यामुळे टाकीत केवळ पाणीच उरते. बंद डब्यात हे बॅक्टेरिया दोन महिन्यापर्यंत जिवंत राहू शकतात.