शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

बायोटॉयलेट प्रकल्पाला मिळणार गती

By admin | Updated: March 7, 2017 02:01 IST

रेल्वे अर्थसंकल्पात २०१९ पर्यंत देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लावण्याची घोषणा करण्यात आली.

मोतीबागेत रेल्वेचा पायलट प्रकल्प : पुढील वर्षी तयार होतील तीन हजार बायोटॉयलेटनागपूर : रेल्वे अर्थसंकल्पात २०१९ पर्यंत देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लावण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे मोतीबाग बायोटॉयलेट प्रकल्पाला गती वाढविण्याचे वेध लागले आहे. यापूर्वीसुद्धा या प्रकल्पाची क्षमता वाढविण्याची तयारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने दाखविली होती. परंतु त्याबाबत पुढे काहीच होऊ शकले नाही. अर्थसंकल्पातील घोषणेमुळे प्रकल्पाची गती वाढणार असून, पुढील वर्षी या प्रकल्पात तीन हजार बायोटॉयलेट तयार करण्यात येणार आहेत. मोतीबागच्या बायोटॉयलेट प्रकल्पात बायोटॉयलेटसाठी लागणाऱ्या पाण्यात इनॉक्युलम बॅक्टेरियाची निर्मिती केली जाते. या प्लॅन्टची क्षमता प्रति दिवस ५०० लिटर पाण्याची आहे. २०१४-१५ या वर्षात प्रकल्प सुरू झाला, मात्र प्रत्यक्षात २०१५-१६ यावर्षी कामाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी मोतीबाग प्रकल्पातून ६१० बायोटॉयलेट तयार झाले. मध्य रेल्वेच्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदा येथील बायोटॉयलेट लावण्यात आले. तत्पूर्वी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतही काही महत्त्वपूर्ण गाड्यात बायोटॉयलेट लावण्यात आले असले तरी त्यांची संख्या अतिशय कमी आहे. भारतीय रेल्वेचा हा देशातील एकमेव पायलट प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी दपूम रेल्वे प्रशासनाने आग्रहाची भूमिका घेतली होती. दपूम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी या प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ करण्याची तयारी दर्शवून या प्रकल्पातील २५०० बायोटॉयलेट विविध रेल्वे झोनमधील गाड्याात लावले. पुढील वर्षी तीन हजार बायोटॉयलेट निर्मितीचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लावण्यासाठी वर्षाला अडीच लाख बायोटॉयलेटची गरज आहे. या प्रकल्पातून सध्या २५०० बायोटॉयलेटची निर्मिती होत आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची उत्पादनक्षमता फारच कमी आहे. त्यामुळे रेल्वे खासगी तत्त्वावर बायोटॉयलेट विकत घेत आहे. मोतीबाग प्रकल्पाची क्षमता वाढल्यास लवकरच देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लागणार आहेत. (प्रतिनिधी)अशी आहे प्रक्रिया प्रकल्पातील साठवणूक केलेल्या पाण्यात इनॉक्युलम बॅक्टेरियाची निर्मिती होते. हे पाणी लिटर प्रमाणे मागेल त्या रेल्वेला पाठविले जाते. चौकोनी आकाराच्या डब्यात हे पाणी असलेली टाकी रेल्वेतील शौचालयाखाली लावली जाते. मानवी मलमूत्र या टाकीत साचते. मात्र या टाकीत असलेले इनॉक्युलम बॅक्टेरिया यातील मल नष्ट करून त्याचे पाण्यात रूपांतर करतात. बॅक्टेरियाने तयार केलेल्या पाण्याची पातळी वाढली की ते बाहेर पडत राहते. त्यामुळे टाकीत केवळ पाणीच उरते. बंद डब्यात हे बॅक्टेरिया दोन महिन्यापर्यंत जिवंत राहू शकतात.