शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

अपारंपरिक ऊर्जेसाठी विशेष धोरण

By admin | Updated: June 26, 2016 02:50 IST

राज्यात कोणत्याही माध्यमातून वीजनिर्मिती होणे आवश्यक आहे. मग त्यासाठी अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी लागेल.

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल : ऊर्जाविषयक प्रश्नांवर बैठक नागपूर : राज्यात कोणत्याही माध्यमातून वीजनिर्मिती होणे आवश्यक आहे. मग त्यासाठी अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी लागेल. यात पवन ऊर्जा व सौर ऊर्जा निर्मितीमधील अडचणी दूर करून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशपातळीवर खास धोरण निश्चित केले जाईल, असे केंद्रीय ऊर्जा, कोळसा व अपारंपरिक ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील ऊर्जाविषयक विविध प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाच्या ऊर्जा आणि वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यात सुरू असलेले विविध औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि त्यांना कोळसा पुरवठ्यात येणाऱ्या अडीअडचणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवाय यावर केंद्रीय ऊर्जा मंत्रालय, कोळसा मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यांची एक बैठक घेऊन या अडचणी तातडीने दूर करू, अशी यावेळी गोयल यांनी ग्वाही दिली. शिवाय महाराष्ट्रात मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत नवीन उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्यांना विजेचा स्वस्त आणि शाश्वत पुरवठा उपलब्ध करुन दिल्यास राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार वाढेल. तसेच महसुलातही भरीव वाढ होईल. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांच्या परिसरात एमआयडीसीचा विकास करण्यासंदर्भातही विचार होऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोलर वीजपुरवठा आणि विजेची मोठ्या प्रमाणात बचत करणारे एनर्जी इफिशियंट पंप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनामार्फत भरीव अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी राज्य शासनाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, असेही गोयल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राज्यात सोलरसाठी व्यापक योजना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्रातील विजेचा वापर हा सोलरआधारित करण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असल्याचे सांगितले. ते म्हणाले, राज्यात फिडर सेपरेशनसारख्या उपाययोजनांवरही भर दिला जात आहे. कृषी आणि ग्रामीण वीजपुरवठा अधिक सुनिश्चित करण्यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेचा अतिरिक्त सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र शासनास सादर करण्यात आलेला आहे. त्यास तातडीने मान्यता देण्यात यावी, अशी विनंती यावेळी फडणवीस यांनी गोयल यांना केली. कृषिपंप स्मार्ट होणार केंद्र शासनाने देशभरातील कृषिपंपांसाठी एक व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. यात शेतकऱ्यांना स्मार्ट मीटर व फ्लोमीटरसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. यातून विजेबरोबरच वेळेचा आणि पाण्याचाही अपव्यय टाळणे शक्य होणार आहे. यासाठी केंद्र शासनामार्फत राज्यांना कर्ज तत्त्वावर अर्थपुरवठा करण्यात येत आहे. महाराष्ट्रानेही या योजनेचा लाभ घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला सोलर वीजपुरवठा, ठिबक सिंचन व विजेची बचत करणारा पंप उपलब्ध होईल, अशा पद्धतीचा आराखडा तयार करून तो राज्यभर राबवावा. यामुळे शेतकऱ्यांचा विजेसाठी होणाऱ्या मोठ्या खर्चात बचत होणार आहे, शिवाय यातून पाण्याचीही मोठी बचत होईल. या योजनेसाठी केंद्र शासनामार्फत महाराष्ट्राला तातडीने भरीव अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री गोयल यांनी सांगितले.