शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
"ठाकरे बंधू बोलबच्चन...बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
3
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
4
सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
7
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
8
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
9
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
10
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
11
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
12
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
13
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
14
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
15
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
16
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
17
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
18
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
19
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
20
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...

नागपूरला हवे ३५० कोटींचे विशेष अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:38 IST

नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असल्याने १९९५-९६ साली शासनस्तरावर विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही वर्षे अनुदान मिळाले, पण नंतर बंद झाले. आता पुन्हा विशेष साहाय्यता अनुदान मिळावे म्हणून महापालिका राज्य सरकारकडे दरवर्षी ३२५ कोटींची मागणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत येणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीकडे प्रस्ताव : मनपा विशेष विकास साहाय्यता अनुदान म्हणून शासनाकडे मागणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असल्याने १९९५-९६ साली शासनस्तरावर विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही वर्षे अनुदान मिळाले, पण नंतर बंद झाले. आता पुन्हा विशेष साहाय्यता अनुदान मिळावे म्हणून महापालिका राज्य सरकारकडे दरवर्षी ३२५ कोटींची मागणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत येणार आहे.गेल्या चार वर्षापासून राज्यात भाजपाची सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेने याआधीच विशेष साहाय्यता अनुदानाचा प्रस्ताव पाठविला असता तर महापालिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला नसता. तूर्त महापालिका प्रस्ताव पाठविणार आहे. मंजूर करायचा की नाही, हे मात्र राज्य सरकारच्या हातात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १० आॅक्टोबर १९९५ रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नागपूर शहराच्या विकासासाठी विशेष अनुदान मंजूर करण्यात आले होते. शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. १९९५-९६ पासून सलग पाच वर्ष निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरवर्षी १५ कोटी म्हणजेच पाच वर्षात ७५ कोटी मिळणार होते. याला मंजुरीही मिळाली होती. मात्र विशिष्ट स्वरूपात अनुदान मिळाले नाही. वर्ष २००६-०७ ते २०१०-११ विशेष अनुदान म्हणून फक्त १५.५९ कोटी मिळाले. त्यानंतर २०११-१२ पासून विशेष अनुदान बंद करण्यात आले. वास्तविक उपराजधानीला नियमित अनुदान मिळणे अपेक्षित होते.सध्या महापालिकेला वेतन, पेन्शन, वीज, पाणी, देखभाल व इंधन यासह अन्य बाबींवर महिन्याला ९२ कोटींचा खर्च करावा लागतो. जकात व एलबीटी बंद झाल्याने जीएसटी अनुदानावर महापालिकेला निर्भर राहावे लागते. परंतु अपेक्षित अनुदान मिळत नाही. दरवर्षी खर्च वाढत आहे. पुढील सात वर्षात विकास योजनांवर महापालिकेला मोठा खर्च करावयाचा आहे. यासाठी विशेष अनुदानाची गरज आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी ठेवला जाईल. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.सात वर्षात मनपावर ३०१२.३९ कोटींचा बोजाविविध विकास प्रकल्पामुळे पुढील पाच ते सात वर्षात महापालिकेवर ३०१२.३९ कोटींचा बोजा पडणार आहे. हा निधी उभारताना महापालिकेला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने विशेष अनुदानाची मागणी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. स्मार्ट सिटीसाठी ६५८.७८ कोटी, सिमेंटरोडच्या दोन टप्प्यातील कामांसाठी २०० कोटी, परिवहन विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी ५४० कोटी, अमृत योजनेसाठी ११३.३५ कोटी, हुडकेश्वर, नरसाळा विकासासाठी २५ कोटी, एलईडी पथदिव्यासाठी २७०.४८ कोटी, भांडेवाडी एसटीपीसाठी १३० कोटी, वीजनिर्मिती प्रकल्पासाठी ९० कोटी, झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ११४.२८ कोटी, नागनदी प्रकल्पासाठी १८७.८४ कोटी यासह विविध योजनांसाठी निधी खर्च करावयाचा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी