शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

नागपूरला हवे ३५० कोटींचे विशेष अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:38 IST

नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असल्याने १९९५-९६ साली शासनस्तरावर विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही वर्षे अनुदान मिळाले, पण नंतर बंद झाले. आता पुन्हा विशेष साहाय्यता अनुदान मिळावे म्हणून महापालिका राज्य सरकारकडे दरवर्षी ३२५ कोटींची मागणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत येणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीकडे प्रस्ताव : मनपा विशेष विकास साहाय्यता अनुदान म्हणून शासनाकडे मागणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असल्याने १९९५-९६ साली शासनस्तरावर विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही वर्षे अनुदान मिळाले, पण नंतर बंद झाले. आता पुन्हा विशेष साहाय्यता अनुदान मिळावे म्हणून महापालिका राज्य सरकारकडे दरवर्षी ३२५ कोटींची मागणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत येणार आहे.गेल्या चार वर्षापासून राज्यात भाजपाची सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेने याआधीच विशेष साहाय्यता अनुदानाचा प्रस्ताव पाठविला असता तर महापालिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला नसता. तूर्त महापालिका प्रस्ताव पाठविणार आहे. मंजूर करायचा की नाही, हे मात्र राज्य सरकारच्या हातात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १० आॅक्टोबर १९९५ रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नागपूर शहराच्या विकासासाठी विशेष अनुदान मंजूर करण्यात आले होते. शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. १९९५-९६ पासून सलग पाच वर्ष निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरवर्षी १५ कोटी म्हणजेच पाच वर्षात ७५ कोटी मिळणार होते. याला मंजुरीही मिळाली होती. मात्र विशिष्ट स्वरूपात अनुदान मिळाले नाही. वर्ष २००६-०७ ते २०१०-११ विशेष अनुदान म्हणून फक्त १५.५९ कोटी मिळाले. त्यानंतर २०११-१२ पासून विशेष अनुदान बंद करण्यात आले. वास्तविक उपराजधानीला नियमित अनुदान मिळणे अपेक्षित होते.सध्या महापालिकेला वेतन, पेन्शन, वीज, पाणी, देखभाल व इंधन यासह अन्य बाबींवर महिन्याला ९२ कोटींचा खर्च करावा लागतो. जकात व एलबीटी बंद झाल्याने जीएसटी अनुदानावर महापालिकेला निर्भर राहावे लागते. परंतु अपेक्षित अनुदान मिळत नाही. दरवर्षी खर्च वाढत आहे. पुढील सात वर्षात विकास योजनांवर महापालिकेला मोठा खर्च करावयाचा आहे. यासाठी विशेष अनुदानाची गरज आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी ठेवला जाईल. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.सात वर्षात मनपावर ३०१२.३९ कोटींचा बोजाविविध विकास प्रकल्पामुळे पुढील पाच ते सात वर्षात महापालिकेवर ३०१२.३९ कोटींचा बोजा पडणार आहे. हा निधी उभारताना महापालिकेला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने विशेष अनुदानाची मागणी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. स्मार्ट सिटीसाठी ६५८.७८ कोटी, सिमेंटरोडच्या दोन टप्प्यातील कामांसाठी २०० कोटी, परिवहन विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी ५४० कोटी, अमृत योजनेसाठी ११३.३५ कोटी, हुडकेश्वर, नरसाळा विकासासाठी २५ कोटी, एलईडी पथदिव्यासाठी २७०.४८ कोटी, भांडेवाडी एसटीपीसाठी १३० कोटी, वीजनिर्मिती प्रकल्पासाठी ९० कोटी, झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ११४.२८ कोटी, नागनदी प्रकल्पासाठी १८७.८४ कोटी यासह विविध योजनांसाठी निधी खर्च करावयाचा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी