शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे गुन्हाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 20:02 IST

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, मात्र महाराष्ट्र  मोटार वाहन कायदा १९८९ मधील ‘२५० अ’ कलमानुसार तो गुन्हा ठरतो. याच कलमाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने वर्षभरात ६० तर गेल्या चार महिन्यात वाहतूक शाखा चेंबर २ अंतर्गत ४३३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

ठळक मुद्देवायरलेस मोबाईलचाही वापर करणे बेकायदेशीर  चार महिन्यात ४३३ वाहनचालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, मात्र महाराष्ट्र  मोटार वाहन कायदा १९८९ मधील ‘२५० अ’ कलमानुसार तो गुन्हा ठरतो. याच कलमाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने वर्षभरात ६० तर गेल्या चार महिन्यात वाहतूक शाखा चेंबर २ अंतर्गत ४३३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.जोपर्यंत वाहन चालविताना लोकांची सुरक्षा धोक्यात येत नाही, तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे लोकांसाठी आणि सार्वजनिक संपत्तीसाठी धोक्याचे आहे, असे म्हणू शकत नाही. कोणताही कायदा असे करण्यापासून रोखत नाही, असा निष्कर्षही केरळ उच्च न्यायालयाने मांडला आहे. परंतु तज्ज्ञाच्या मते केरळमध्ये त्या कायद्यात तसे नियम केले नसावे. महाराष्ट्र  मोटार वाहन कायद्यात तशी तरतूद असल्याने तो गुन्हाच ठरतो.असा आहे कायदा‘आरटीओ’ने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालविताना लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता मोबाईलच नव्हे, तर वायर अथवा वायरलेस मोबाईलचा वापर करता येत नाही. सिग्नलवर, तसेच रस्त्याच्या कडेला थांबले असतानाही त्याचा वापर करता येत नाही. वाहनावरून उतरून ते रस्त्याच्या कडेला नेऊन नीट उभे करा. उतरा आणि मगच मोबाईल वापरा, असे कायदा सांगतो.२०० रुपये दंडवाहन चालविताना किंवा वाहनावर बसून मोबाईलचा वापर वाढल्याने यावर गंभीर कारवाई केली जात आहे. नियमानुसार २०० रुपये दंड आकारला जातो. मोबाईलचा वापर, तसेच हेल्मेट नसणे, कागदपत्रे नसणे, विमा नसणे, परवाना नसणे, परवाना न बाळगणे, अयोग्य पार्किंग आदींसह मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन आढळल्यास दंडाच्या रकमेत वाढ होते. मोटार वाहन कायद्याचे तीन वेळा उल्लंघन केल्यास आर्थिक दंडाबरोबरच परवाना निलंबन करण्याची शिफारस प्रादेशिक परिवहन खात्याला केली जाते.आरटीओकडून ३० हजार रुपयांची दंडात्मक कारवाईआरटीओ नागपूर शहरने मार्च १७ ते एप्रिल १८ या कालावधीत ६० वाहनचालकांवर कारवाई करून ३० हजार रुपयांची दंडात्मक वसुली केली आहे. तर वाहतूक शाखा चेंबर २ अंतर्गत जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत ४३३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :MobileमोबाइलRto officeआरटीओ ऑफीस