शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

संतूर व बासरीच्या जुगलबंदीने श्रोते मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:55 IST

ऑनलाईन लोकमत नागपूर : ऋतुचक्रावर आधारित यंदाच्या कालिदास महोत्सवाची सांगताही मोठ्या थाटात झाली. पंडित सतीश व्यास आणि सूरमणी पंडित रेणू मजुमदार यांनी सादर केलेल्या संतूर व बासरीच्या बहारदार जुगलबंदीने नागपूरकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.संतूर व बासरीच्या जुगलबंदीसाठी रविवारी नागपूरकर रसिकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. जागतिक स्तरावरील विख्यात असलेल्या या कलावंतांनी ...

ठळक मुद्देकालिदास महोत्सवाची थाटात सांगता : पं. सतीश व्यास व पं. रेणू मजुमदार यांचे बहारदार सादरीकरण

ऑनलाईन लोकमत नागपूर : ऋतुचक्रावर आधारित यंदाच्या कालिदास महोत्सवाची सांगताही मोठ्या थाटात झाली. पंडित सतीश व्यास आणि सूरमणी पंडित रेणू मजुमदार यांनी सादर केलेल्या संतूर व बासरीच्या बहारदार जुगलबंदीने नागपूरकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.संतूर व बासरीच्या जुगलबंदीसाठी रविवारी नागपूरकर रसिकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. जागतिक स्तरावरील विख्यात असलेल्या या कलावंतांनी त्यांना निराश केले नाही. व्यास यांचे कलमांवरील प्रभुत्व, सुरेल वादन तर रोणू मजुमदार यांचे मधाळ बासरीवादन यासह राग यमनच्या वादनात रसिक हरवून गेले होते.यानंतर ओडिशी नृत्य बिंदू जुनेजा आणि त्यांचा ग्रुपने सादर केले. शास्त्रीय गायनाची जुगलबंदी ऋतुरंग पंडित संजीव अभ्यंकर व अश्विनी भिडे-देशपांडे यांनी सादर केली.कविवर्य सुरेश भट सभागृह उभारल्याचे सार्थक झाले - नितीन गडकरीकालिदास समारोहाला रसिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ‘कविवर्य सुरेश भट सभागृह उभारले त्याचे सार्थक झाले’, अशी भावना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.या कलावंतांचे आणि त्यांच्या साथीदारांचे नितीन गडकरी आणि कांचन गडकरी यांनी स्वागत केले.कालिदास समारोह आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि नागपूर महापालिका यांच्यावतीने आयोजित तीन दिवसीय कालिदास समारोहाची रविवारी सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते. कालिदास समारोहाच्या आयोजनाबद्दल गडकरी यांनी विभागीय आयुक्त अनुप कुमार यांचे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील ‘टीम’चे कौतुक केले.यावेळी गडकरी यांच्या हस्ते क्रिएशन आॅफसेटचे तरुण उद्योजक स्वप्निल पंचभाई व श्वेता पंचभाई, आकांक्षा अग्रवाल, संदीप बारस्कर, जहिर भाई, शुभांगी गाडेकर, निवेदक जैनेंद्र सिंह व रेणुका देशकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. विभागीय आयुक्त यांनी प्रास्ताविक केले.