शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

आचारसंहिता शिथिल होताच बैठकांचे सत्र सुरू

By admin | Updated: May 5, 2014 00:04 IST

निवडणूक आचारसंहितेमुळे दीड महिन्यापासून विषय समित्यांना धोरणात्मक निर्णय घेता येत नव्हते. त्यातच अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते.

जिल्हा परिषद : प्रलंबित कामांना गती मिळणारनागपूर : निवडणूक आचारसंहितेमुळे दीड महिन्यापासून विषय समित्यांना धोरणात्मक निर्णय घेता येत नव्हते. त्यातच अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते. आचारसंंहिता शिथिल होताच पुन्हा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.अतिवृष्टी व पुरामुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून ३२ कोटींचा निधी जि.प.च्या बांधकाम विभागाला प्राप्त झाला आहे. परंतु आचारसंहितेमुळे रस्ते व पूल दुरुस्तीची कामे अद्याप सुरू झालेली नाही. जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांना उन्हाळ्यातील सुटीपूर्वी सायकल वाटप होणार होते. लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार आहे. परंतु आचारसंहितेमुळे वाटप रखडले. वास्तविक शाळा सुरू होताच सायकली मिळण्याची अपेक्षा होती. परंतु अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या वादात वाटप रखडले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्या बदलीनंतर हा वाद शमला. परंतु आचारसंहितेमुळे सायकल वाटप करता आले नाही. समाज कल्याण, महिला व बाल कल्याण, कृषी आणि पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. आचारसंहितेचा या योजनांना फटका बसला. वास्तविक आचारसंहिता विचारात घेता मार्चपूर्वी योजना राबविल्या जातील, यादृष्टीने संबंधित विभागांनी नियोजन करण्याची गरज होती. अधिकारी व पदाधिकार्‍यांना याचा विसर पडल्याने नियोजन कोलमडले. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही. गेल्या दीड महिन्यात औपचारिकता म्हणून विषय समित्यांच्या बैठका होत होत्या. कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येत नव्हते. आता आचारसंंहिता शिथिल झाल्याने जि.प.मध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले. पहिल्याच दिवशी स्थायी समिती व जलव्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. बांधकाम समितीच्या बैठकीत रस्ते व पूल दुरुस्तीच्या कामांना मंजुरी दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)नियोजनाची गरज जूनपासून सुरू होणारा पावसाळा व चार महिन्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता याचा विचारात करता विकास कामे मार्गी लागण्यासाठी नियोजनाची गरज आहे. जि.प. प्रशासनाने वेळीच नियोजन न केल्यास विकास योजनांचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची शक्यता आहे.