शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

वंचित बहुजन आघाडीमध्ये लवकरच फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:54 IST

भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्णत: विलिनीकरण करण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यभर बदल होण्याची शक्यता असून सर्व जिल्हा स्तरावर २० नोव्हेंबरनंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देभारिप आघाडीत विलीन : २० नोव्हेंबरनंतर सर्व जिल्हास्तरावर बदलाचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्णत: विलिनीकरण करण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यभर बदल होण्याची शक्यता असून सर्व जिल्हा स्तरावर २० नोव्हेंबरनंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मुंबई दादरमधील आंबेडकर भवनात भारिपसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमसारख्या राजकीय पक्षांशिवाय फक्त सामाजिक संघटनांचाच समावेश होता. मात्र २१ ऑक्टोबरला झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमसुद्धा वंचित बहुजन आघाडीबाहेर पडली. यानंतर विधानसभा निवडणुका होताच भारिपचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याचा हा निर्णय झाला आहे. यामुळे भारिपचे पदाधिकारीच २० नोव्हेंबरपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असतील. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठे फेरबदल होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.‘रिपब्लिकन’ शब्द हटविल्याने नाराजीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारिपच्या वंचित बहुजन आघाडीमधील विलिनीकरणानंतर ‘रिपब्लिकन’ शब्द हटविल्याने नाराजी पसरली आहे. रिपब्लिकन हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भावनिक नाते जोडतो, त्यामुळे बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गाला आणि व कार्यकर्त्यांना ‘रिपब्लिकन’ शब्दाचे विशेष महत्व आहे. भारिपच्या विलयामुळे रिपब्लिकन हा शब्दच हटविला गेला असल्याने आघाडीमध्ये राहण्यात काय अर्थ, असा पक्षातील नाराजांचा सूर असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भविष्यात वंचित बहुजन आघाडीमध्ये फटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एकत्र काम करण्याची संधी मिळणार : डबरसेया संदर्भात प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव सागर डबरासे म्हणाले, भारिपचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय पार्टी अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत झाले आहे. यामुळे आता आघाडीला एकाच मंचावर एकत्र काम करण्याची संधी मिळेल. विद्यमान भारिप पदाधिकारीच वंचित बहुजन आघाडीमध्येसुद्धा त्याच पदावर काम करतील. पुढील २० नोव्हेंबरपर्यंत वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय कमिट्यांचे गठन केले जाईल.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण