शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वंचित बहुजन आघाडीमध्ये लवकरच फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:54 IST

भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्णत: विलिनीकरण करण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यभर बदल होण्याची शक्यता असून सर्व जिल्हा स्तरावर २० नोव्हेंबरनंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देभारिप आघाडीत विलीन : २० नोव्हेंबरनंतर सर्व जिल्हास्तरावर बदलाचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्णत: विलिनीकरण करण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यभर बदल होण्याची शक्यता असून सर्व जिल्हा स्तरावर २० नोव्हेंबरनंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मुंबई दादरमधील आंबेडकर भवनात भारिपसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमसारख्या राजकीय पक्षांशिवाय फक्त सामाजिक संघटनांचाच समावेश होता. मात्र २१ ऑक्टोबरला झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमसुद्धा वंचित बहुजन आघाडीबाहेर पडली. यानंतर विधानसभा निवडणुका होताच भारिपचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याचा हा निर्णय झाला आहे. यामुळे भारिपचे पदाधिकारीच २० नोव्हेंबरपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असतील. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठे फेरबदल होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.‘रिपब्लिकन’ शब्द हटविल्याने नाराजीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारिपच्या वंचित बहुजन आघाडीमधील विलिनीकरणानंतर ‘रिपब्लिकन’ शब्द हटविल्याने नाराजी पसरली आहे. रिपब्लिकन हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भावनिक नाते जोडतो, त्यामुळे बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गाला आणि व कार्यकर्त्यांना ‘रिपब्लिकन’ शब्दाचे विशेष महत्व आहे. भारिपच्या विलयामुळे रिपब्लिकन हा शब्दच हटविला गेला असल्याने आघाडीमध्ये राहण्यात काय अर्थ, असा पक्षातील नाराजांचा सूर असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भविष्यात वंचित बहुजन आघाडीमध्ये फटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एकत्र काम करण्याची संधी मिळणार : डबरसेया संदर्भात प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव सागर डबरासे म्हणाले, भारिपचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय पार्टी अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत झाले आहे. यामुळे आता आघाडीला एकाच मंचावर एकत्र काम करण्याची संधी मिळेल. विद्यमान भारिप पदाधिकारीच वंचित बहुजन आघाडीमध्येसुद्धा त्याच पदावर काम करतील. पुढील २० नोव्हेंबरपर्यंत वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय कमिट्यांचे गठन केले जाईल.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण