शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वंचित बहुजन आघाडीमध्ये लवकरच फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:54 IST

भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्णत: विलिनीकरण करण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यभर बदल होण्याची शक्यता असून सर्व जिल्हा स्तरावर २० नोव्हेंबरनंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देभारिप आघाडीत विलीन : २० नोव्हेंबरनंतर सर्व जिल्हास्तरावर बदलाचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्णत: विलिनीकरण करण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यभर बदल होण्याची शक्यता असून सर्व जिल्हा स्तरावर २० नोव्हेंबरनंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मुंबई दादरमधील आंबेडकर भवनात भारिपसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमसारख्या राजकीय पक्षांशिवाय फक्त सामाजिक संघटनांचाच समावेश होता. मात्र २१ ऑक्टोबरला झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमसुद्धा वंचित बहुजन आघाडीबाहेर पडली. यानंतर विधानसभा निवडणुका होताच भारिपचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याचा हा निर्णय झाला आहे. यामुळे भारिपचे पदाधिकारीच २० नोव्हेंबरपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असतील. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठे फेरबदल होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.‘रिपब्लिकन’ शब्द हटविल्याने नाराजीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारिपच्या वंचित बहुजन आघाडीमधील विलिनीकरणानंतर ‘रिपब्लिकन’ शब्द हटविल्याने नाराजी पसरली आहे. रिपब्लिकन हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भावनिक नाते जोडतो, त्यामुळे बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गाला आणि व कार्यकर्त्यांना ‘रिपब्लिकन’ शब्दाचे विशेष महत्व आहे. भारिपच्या विलयामुळे रिपब्लिकन हा शब्दच हटविला गेला असल्याने आघाडीमध्ये राहण्यात काय अर्थ, असा पक्षातील नाराजांचा सूर असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भविष्यात वंचित बहुजन आघाडीमध्ये फटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एकत्र काम करण्याची संधी मिळणार : डबरसेया संदर्भात प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव सागर डबरासे म्हणाले, भारिपचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय पार्टी अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत झाले आहे. यामुळे आता आघाडीला एकाच मंचावर एकत्र काम करण्याची संधी मिळेल. विद्यमान भारिप पदाधिकारीच वंचित बहुजन आघाडीमध्येसुद्धा त्याच पदावर काम करतील. पुढील २० नोव्हेंबरपर्यंत वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय कमिट्यांचे गठन केले जाईल.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण