शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाचा मुलगा झाला आरबीआयचा व्यवस्थापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:06 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेची नाडी सुरक्षित ठेवणारी यंत्रणा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) होय. या यंत्रणेचा भाग होऊन अर्थकारणाचा गाडा हाकण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले होते आणि अखेर तो यशस्वीही झाला. अभिषेक सयाम असे या तरुणाचे नाव.

ठळक मुद्देअभिषेकने गाठले ध्येय जिल्ह्यातून एकमेव यशस्वी उमेदवार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या अर्थव्यवस्थेची नाडी सुरक्षित ठेवणारी यंत्रणा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) होय. या यंत्रणेचा भाग होऊन अर्थकारणाचा गाडा हाकण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले होते आणि अखेर तो यशस्वीही झाला. अभिषेक सयाम असे या तरुणाचे नाव. आरबीआयच्या व्यवस्थापक पदावर नुकतीच त्यांची नियुक्ती झाली आहे. देशभरातील अडीच लाख परीक्षार्थ्यांपैकी केवळ १२७ परीक्षार्थी यशस्वी ठरले असून, त्यात अभिषेक यांचा सहभाग आहे व नागपूर जिल्ह्यातून ते एकमेव उमेदवार ठरले आहेत.अभिषेक यांचे वडील सुखदेवराव सयाम हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून, आई गृहिणी आहे. त्यांना अर्थशास्त्र विषयाची आवड होती आणि आरबीआयमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न मनात होते. मात्र तिथे पोहचावे कसे, याबाबत कल्पना नव्हती. सोमलवार निकालसमधून दहावी आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालयातून बारावी केल्यानंतर आयआयटी कानपूरमध्ये नंबर लागला. ही पदवीही त्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली.पुढे दिल्ली विद्यापीठातून मास्टर्स डिग्रीसाठी प्रवेश घेतला. दिल्लीत गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांना आरबीआयच्या व्यवस्थापक (मॅनेजर) पदाच्या परीक्षेबाबत माहिती मिळाली. बालपणापासून जे स्वप्न मनात होतं, ते पूर्ण करण्याची दिशा त्यांना प्राप्त झाली आणि लागलीच याची तयारीही सुरू केली.२०१७ मध्ये मास्टर्स पूर्ण केल्यानंतर ते जोमाने या परीक्षेच्या तयारीत लागले. अर्थातच कोणतेही क्लासेस लावण्याऐवजी आरबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध सिलॅबस आणि जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारावरच त्यांचा हा अभ्यास सुरू होता. अखेर प्रयत्नांचे चीज झाले. ऑगस्ट २०१८ मध्ये प्राथमिक व सप्टेंबर २०१८ मध्ये मुख्य परीक्षा ते सहज उत्तीर्ण झाले व पुढे मुलाखतीमध्येही त्यांनी यश मिळविले. या परीक्षेला अडीच लाख विद्यार्थी बसले होते, त्यापैकी २००० विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेला निवड झाली व नंतर मुलाखतीसाठी ६०० उमेदवार पात्र ठरले. विभागनिहाय मुलाखतीमध्ये निवड झालेल्या १२७ उमेदवारांमध्ये अभिषेक सयाम यांचाही समावेश आहे. येत्या २९ जुलै रोजी अभिषेक १० आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी चेन्नईला रवाना होणार आहेत. व्यवस्थापक पदासाठी महाराष्ट्रातून केवळ १९ उमेदवारांची निवड झाली आहे, त्यात नागपूरचे अभिषेक व एका चंद्रपूरच्या उमेदवाराचा समावेश आहे. यातून सयाम यांची नियुक्ती ही प्रेरणादायी बाब आहे.

ध्येयाची कल्पना करीत राहा, यश मिळतेचआपल्याकडे बँकिंग क्षेत्राबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे, मात्र आरबीआयच्या अधिकारी पदांच्या परीक्षांबाबत फारशी जनजागृती नाही. ही अवस्था अभिषेक यांनी अनुभवली आहे. आरबीआयच्या ग्रेड बी म्हणजे व्यवस्थापक पदाची परीक्षा आणि क्लरिकल पदाची परीक्षा होते. व्यवस्थापक पदाची परीक्षा ही यूपीएससी स्तराची असते. आवड होती पण दिशा नव्हती, जी दिल्लीला गेल्यावरच मिळाल्याचे अभिषेक सांगतात. आवड आणि ध्येय एकसमान झाले तर यशाची दिशा सापडते. ठरविलेल्या निश्चित ध्येयाची नेहमी कल्पना करीत राहिलो तर त्यानुसार बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्व विकसित होत असते व त्यातूनच यश मिळते, असा विश्वास सयाम यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र