शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

काहींना आश्वासन तर काहींची निराशा

By admin | Updated: December 25, 2015 03:51 IST

हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी अखेर सूप वाजले. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला आता दीड वर्ष पूर्ण होत आहे

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी अखेर सूप वाजले. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला आता दीड वर्ष पूर्ण होत आहे आणि नव्या सरकारचे नागपुरातील हे दुसरे अधिवेशन होते. मात्र विरोधात असताना आमच्या संघटनेच्या मागण्यांसाठी आंदोलन क रणारे आणि पाठिंबा देणारे सत्तेत येताच आमच्या मागण्या विसरले, अशा भावना धरणे मंडपातील ८० टक्के संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. त्यामुळे नेतृत्व करणारे सत्तेत गेले तरी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे फसे झाले, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.दरम्यान, यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनात राज्यभरातून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी तब्बल ११२ संघटनांनी नागपूरला हजेरी लावली. यामध्ये २४ वैयक्तिक आंदोलकांचा समावेश होता. पटवर्धन मैदानात बसलेल्या आंदोलकांचा आवाज विधानभवनापर्यंत पोहोचत नसला तरी गेले १७ दिवस हा परिसर नारे आणि घोषणांनी दुमदुमला होता. काही लोक पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत ठाण मांडून बसून राहिले. मात्र अनेक संघटना समाधानी होऊन परतल्या. अशा ९४ संघटनांनी सरकारच्या समाधानकारक आश्वासनानंतर आपले आंदोलन मागे घेतले. यामध्ये वैयक्तिक आंदोलन करणाऱ्या १८ लोकांचाही समावेश आहे. मात्र १२ संघटना आणि ६ वैयक्तिक आंदोलनकर्त्यांनी शेवटपर्यंत धरण्याची जागा सोडली नाही. काहींचे मंत्र्यांसोबत भेटूनही समाधान झाले नाही, तर काहींना सरकारच्या प्रतिनिधीसोबत भेटताच आले नाही. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीची अट घालून बसलेल्या अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काहींनी शेवटच्या आठवड्यात आपले आंदोलन सुरू केले. यातील बहुतेक संघटनांचे आंदोलन १० ते १५ वर्षांपासून सुरू आहे. विरोधात असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी एकतर विविध संघटनांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले किंवा पाठिंबा तरी दिला होता. मागील वर्षी अधिवेशनापूर्वी नुकतेच सरकार स्थापन झाल्याने संघटना आक्रमक नव्हत्या. मात्र आता सरकारला १३ महिने झाल्याने संघटनांच्या अपेक्षा अधिक वाढल्या होत्या. त्यातील काहींच्या पूर्ण झाल्या तर काहींच्या पदरी निराशा आली.(प्रतिनिधी)