शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
6
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
7
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
8
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
9
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
10
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
11
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
12
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
13
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
14
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
15
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
16
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
17
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
18
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
19
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
20
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...

काहींना आश्वासन तर काहींची निराशा

By admin | Updated: December 25, 2015 03:51 IST

हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी अखेर सूप वाजले. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला आता दीड वर्ष पूर्ण होत आहे

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी अखेर सूप वाजले. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला आता दीड वर्ष पूर्ण होत आहे आणि नव्या सरकारचे नागपुरातील हे दुसरे अधिवेशन होते. मात्र विरोधात असताना आमच्या संघटनेच्या मागण्यांसाठी आंदोलन क रणारे आणि पाठिंबा देणारे सत्तेत येताच आमच्या मागण्या विसरले, अशा भावना धरणे मंडपातील ८० टक्के संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. त्यामुळे नेतृत्व करणारे सत्तेत गेले तरी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे फसे झाले, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.दरम्यान, यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनात राज्यभरातून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी तब्बल ११२ संघटनांनी नागपूरला हजेरी लावली. यामध्ये २४ वैयक्तिक आंदोलकांचा समावेश होता. पटवर्धन मैदानात बसलेल्या आंदोलकांचा आवाज विधानभवनापर्यंत पोहोचत नसला तरी गेले १७ दिवस हा परिसर नारे आणि घोषणांनी दुमदुमला होता. काही लोक पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत ठाण मांडून बसून राहिले. मात्र अनेक संघटना समाधानी होऊन परतल्या. अशा ९४ संघटनांनी सरकारच्या समाधानकारक आश्वासनानंतर आपले आंदोलन मागे घेतले. यामध्ये वैयक्तिक आंदोलन करणाऱ्या १८ लोकांचाही समावेश आहे. मात्र १२ संघटना आणि ६ वैयक्तिक आंदोलनकर्त्यांनी शेवटपर्यंत धरण्याची जागा सोडली नाही. काहींचे मंत्र्यांसोबत भेटूनही समाधान झाले नाही, तर काहींना सरकारच्या प्रतिनिधीसोबत भेटताच आले नाही. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीची अट घालून बसलेल्या अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काहींनी शेवटच्या आठवड्यात आपले आंदोलन सुरू केले. यातील बहुतेक संघटनांचे आंदोलन १० ते १५ वर्षांपासून सुरू आहे. विरोधात असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी एकतर विविध संघटनांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले किंवा पाठिंबा तरी दिला होता. मागील वर्षी अधिवेशनापूर्वी नुकतेच सरकार स्थापन झाल्याने संघटना आक्रमक नव्हत्या. मात्र आता सरकारला १३ महिने झाल्याने संघटनांच्या अपेक्षा अधिक वाढल्या होत्या. त्यातील काहींच्या पूर्ण झाल्या तर काहींच्या पदरी निराशा आली.(प्रतिनिधी)