शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
5
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
6
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
7
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
8
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
9
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
10
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
11
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
12
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
13
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
14
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
15
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
16
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
17
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
18
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
19
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना

काहींना आश्वासन तर काहींची निराशा

By admin | Updated: December 25, 2015 03:51 IST

हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी अखेर सूप वाजले. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला आता दीड वर्ष पूर्ण होत आहे

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी अखेर सूप वाजले. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला आता दीड वर्ष पूर्ण होत आहे आणि नव्या सरकारचे नागपुरातील हे दुसरे अधिवेशन होते. मात्र विरोधात असताना आमच्या संघटनेच्या मागण्यांसाठी आंदोलन क रणारे आणि पाठिंबा देणारे सत्तेत येताच आमच्या मागण्या विसरले, अशा भावना धरणे मंडपातील ८० टक्के संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. त्यामुळे नेतृत्व करणारे सत्तेत गेले तरी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे फसे झाले, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.दरम्यान, यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनात राज्यभरातून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी तब्बल ११२ संघटनांनी नागपूरला हजेरी लावली. यामध्ये २४ वैयक्तिक आंदोलकांचा समावेश होता. पटवर्धन मैदानात बसलेल्या आंदोलकांचा आवाज विधानभवनापर्यंत पोहोचत नसला तरी गेले १७ दिवस हा परिसर नारे आणि घोषणांनी दुमदुमला होता. काही लोक पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत ठाण मांडून बसून राहिले. मात्र अनेक संघटना समाधानी होऊन परतल्या. अशा ९४ संघटनांनी सरकारच्या समाधानकारक आश्वासनानंतर आपले आंदोलन मागे घेतले. यामध्ये वैयक्तिक आंदोलन करणाऱ्या १८ लोकांचाही समावेश आहे. मात्र १२ संघटना आणि ६ वैयक्तिक आंदोलनकर्त्यांनी शेवटपर्यंत धरण्याची जागा सोडली नाही. काहींचे मंत्र्यांसोबत भेटूनही समाधान झाले नाही, तर काहींना सरकारच्या प्रतिनिधीसोबत भेटताच आले नाही. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीची अट घालून बसलेल्या अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काहींनी शेवटच्या आठवड्यात आपले आंदोलन सुरू केले. यातील बहुतेक संघटनांचे आंदोलन १० ते १५ वर्षांपासून सुरू आहे. विरोधात असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी एकतर विविध संघटनांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले किंवा पाठिंबा तरी दिला होता. मागील वर्षी अधिवेशनापूर्वी नुकतेच सरकार स्थापन झाल्याने संघटना आक्रमक नव्हत्या. मात्र आता सरकारला १३ महिने झाल्याने संघटनांच्या अपेक्षा अधिक वाढल्या होत्या. त्यातील काहींच्या पूर्ण झाल्या तर काहींच्या पदरी निराशा आली.(प्रतिनिधी)