शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पूर पीडितांच्या मदतीसाठी सैनिक धावले; विदर्भातील शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 21:25 IST

Nagpur News मुसळधार पावसामुळे विदर्भातील अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. अशा गावांतील नागरिकांच्या मदतीसाठी सैनिक धावून गेले. त्यांनी शेकडो नागरिकांना पुराच्या संकटातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.

नागपूर : भारतीय नागरिकांवर आलेले संकट परतवून लावण्यासाठी तिन्ही सुरक्षा दलाचे सैनिक नेहमीच पुढे असतात. त्याची प्रचिती सध्याच्या अस्मानी संकटाच्या वेळीही आली. मुसळधार पावसामुळे विदर्भातील अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. अशा गावांतील नागरिकांच्या मदतीसाठी सैनिक धावून गेले. त्यांनी शेकडो नागरिकांना पुराच्या संकटातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.

विदर्भामध्ये पाऊस गेल्या आठ दिवसापासून थैमान घालत आहे. धरणे पाण्याने भरली आहेत. धरणातील अतिरिक्त पाणी नद्यांमध्ये सोडले जात आहे. याशिवाय पाऊसही सलग सुरू आहे. परिणामी, सर्वच नद्यांना पूर आला आहे. नद्यांजवळची गावे पाण्याखाली आली आहेत. सरकारी यंत्रणा या संकटातून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या परीने संघर्ष करीत आहे. दरम्यान, सरकारने सैन्य दलांनाही मदतीकरिता आवाहन केले होते. सैन्य दलांनी सरकारला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला.

विदर्भामध्ये कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटल सेंटरच्या सैनिकांना १९ जुलै रोजी रात्री आवश्यक उपकरणांसह मेजर भूवन शाह यांच्या नेतृत्वाखाली पूर प्रभावित क्षेत्रांत पाठविण्यात आले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मानगाव येथून बचाव कार्याला सुरुवात केली. पुरामुळे या गावाचा संपर्क तुटला होता. गावातील ११३ नागरिकांना स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले. ब्रिगेडियर दीपक शर्मा यांनी पूर प्रभावित क्षेत्राला भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, इतर ठिकाणी बचाव कार्यासाठी जाण्याकरिता कामठी येथे एक अतिरिक्त पथक सज्ज ठेवण्यात आले.

टॅग्स :floodपूर