शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

पूर पीडितांच्या मदतीसाठी सैनिक धावले; विदर्भातील शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 21:25 IST

Nagpur News मुसळधार पावसामुळे विदर्भातील अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. अशा गावांतील नागरिकांच्या मदतीसाठी सैनिक धावून गेले. त्यांनी शेकडो नागरिकांना पुराच्या संकटातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.

नागपूर : भारतीय नागरिकांवर आलेले संकट परतवून लावण्यासाठी तिन्ही सुरक्षा दलाचे सैनिक नेहमीच पुढे असतात. त्याची प्रचिती सध्याच्या अस्मानी संकटाच्या वेळीही आली. मुसळधार पावसामुळे विदर्भातील अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. अशा गावांतील नागरिकांच्या मदतीसाठी सैनिक धावून गेले. त्यांनी शेकडो नागरिकांना पुराच्या संकटातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.

विदर्भामध्ये पाऊस गेल्या आठ दिवसापासून थैमान घालत आहे. धरणे पाण्याने भरली आहेत. धरणातील अतिरिक्त पाणी नद्यांमध्ये सोडले जात आहे. याशिवाय पाऊसही सलग सुरू आहे. परिणामी, सर्वच नद्यांना पूर आला आहे. नद्यांजवळची गावे पाण्याखाली आली आहेत. सरकारी यंत्रणा या संकटातून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या परीने संघर्ष करीत आहे. दरम्यान, सरकारने सैन्य दलांनाही मदतीकरिता आवाहन केले होते. सैन्य दलांनी सरकारला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला.

विदर्भामध्ये कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटल सेंटरच्या सैनिकांना १९ जुलै रोजी रात्री आवश्यक उपकरणांसह मेजर भूवन शाह यांच्या नेतृत्वाखाली पूर प्रभावित क्षेत्रांत पाठविण्यात आले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मानगाव येथून बचाव कार्याला सुरुवात केली. पुरामुळे या गावाचा संपर्क तुटला होता. गावातील ११३ नागरिकांना स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले. ब्रिगेडियर दीपक शर्मा यांनी पूर प्रभावित क्षेत्राला भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, इतर ठिकाणी बचाव कार्यासाठी जाण्याकरिता कामठी येथे एक अतिरिक्त पथक सज्ज ठेवण्यात आले.

टॅग्स :floodपूर