शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पूर पीडितांच्या मदतीसाठी सैनिक धावले; विदर्भातील शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 21:25 IST

Nagpur News मुसळधार पावसामुळे विदर्भातील अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. अशा गावांतील नागरिकांच्या मदतीसाठी सैनिक धावून गेले. त्यांनी शेकडो नागरिकांना पुराच्या संकटातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.

नागपूर : भारतीय नागरिकांवर आलेले संकट परतवून लावण्यासाठी तिन्ही सुरक्षा दलाचे सैनिक नेहमीच पुढे असतात. त्याची प्रचिती सध्याच्या अस्मानी संकटाच्या वेळीही आली. मुसळधार पावसामुळे विदर्भातील अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. अशा गावांतील नागरिकांच्या मदतीसाठी सैनिक धावून गेले. त्यांनी शेकडो नागरिकांना पुराच्या संकटातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.

विदर्भामध्ये पाऊस गेल्या आठ दिवसापासून थैमान घालत आहे. धरणे पाण्याने भरली आहेत. धरणातील अतिरिक्त पाणी नद्यांमध्ये सोडले जात आहे. याशिवाय पाऊसही सलग सुरू आहे. परिणामी, सर्वच नद्यांना पूर आला आहे. नद्यांजवळची गावे पाण्याखाली आली आहेत. सरकारी यंत्रणा या संकटातून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या परीने संघर्ष करीत आहे. दरम्यान, सरकारने सैन्य दलांनाही मदतीकरिता आवाहन केले होते. सैन्य दलांनी सरकारला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला.

विदर्भामध्ये कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटल सेंटरच्या सैनिकांना १९ जुलै रोजी रात्री आवश्यक उपकरणांसह मेजर भूवन शाह यांच्या नेतृत्वाखाली पूर प्रभावित क्षेत्रांत पाठविण्यात आले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मानगाव येथून बचाव कार्याला सुरुवात केली. पुरामुळे या गावाचा संपर्क तुटला होता. गावातील ११३ नागरिकांना स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले. ब्रिगेडियर दीपक शर्मा यांनी पूर प्रभावित क्षेत्राला भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, इतर ठिकाणी बचाव कार्यासाठी जाण्याकरिता कामठी येथे एक अतिरिक्त पथक सज्ज ठेवण्यात आले.

टॅग्स :floodपूर