शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

नागपुरातील सीताबर्डी किल्ल्यासाठी सैनिकांचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 10:39 IST

भारतीय सेनेचे उत्तर महाराष्ट्र व गुजरात युनिट (उमंग) हे मुंबईचे कार्यालय काही काळासाठी नागपुरात हलविण्यात आले. उमंगच्या अधिकाऱ्यांनी सेना मुख्यालय दिल्ली येथे शिफारस करून ८० वर्षांपासून वसलेल्या ११८ प्रादेशिक सेनेला येथून बेदखल करून भुसावळला पाठविले.

ठळक मुद्दे८० वर्षांपासून होता अधिवास ११८ प्रादेशिक सेनेला हलविले भुसावळमध्ये

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय सेनेच्या ११८ प्रादेशिक सेनेचे मुख्यालय हे सीताबर्डी किल्ला होते. ११८ इन्फन्ट्री बटालियनला विदर्भाची हक्काची सेना म्हटले जायचे. कर्नल, लेफ्ट. कर्नल, दोन मेजर यांच्या नेतृत्वात ५११ जवानांची कंपनी येथे तैनात असायची. पण सेनेचेच उत्तर महाराष्ट्र व गुजरात युनिट (उमंग) हे मुंबईचे कार्यालय काही काळासाठी नागपुरात हलविण्यात आले. उमंगच्या अधिकाऱ्यांना किल्ल्यावरील अधिवासाची भुरळ पडली. त्यांनी सेना मुख्यालय दिल्ली येथे शिफारस करून ८० वर्षांपासून वसलेल्या ११८ प्रादेशिक सेनेला येथून बेदखल करून भुसावळला पाठविले. मुख्यालयाच्या या निर्णयामुळे ११८ च्या जवानांनी नाराजी व्यक्त केली. माजी सैनिकांनी तर किल्ल्यासाठी भारतीय सेनेसोबतच संविधानाच्या मार्गाने लढाई सुरू केली आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी १९३९ मध्ये प्रादेशिक सेना स्थापन केली. या सेनेला इंग्रजांनी ताब्यात घेतलेला सीताबर्डीचा किल्ला सोपविला. स्वातंत्र्यानंतर प्रादेशिक सेना कायदा १९४८ निर्माण झाला. तेव्हापासून ११८ प्रादेशिक सेना किल्ल्यावर तैनात होती. विदर्भाच्या हक्काची ही सेना मानली जाते. विदर्भातील युवकांना प्रोत्साहन आणि सेनेत भरती होण्याची संधी मिळत होती. उपराजधानीच्या हृदयस्थळावर सेनेचे हे केंद्र होते. ११८ च्या माजी सैनिकांनी या उजाडलेल्या टेकडीवर नंदनवन खुलविले होते. त्यामुळे माजी सैनिकांचीही प्रचंड आत्मियता आहे. आपात्कालीन स्थितीत आणि सीमेवरील लढाईतसुद्धा या सेनेच्या जवानांनी शौर्य गाजविले. याच किल्ल्यावर महात्मा गांधींना इंग्रजांनी डांबून ठेवले होते. त्यांची कोठडीसुद्धा येथे आहे.सेनेच्याच उमंग युनिटला नागपुरात हलविण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या मागील सीडब्ल्यूई कार्यालयात त्यांना जागा दिली. उमंग युनिट हे सेनेचे थिंक टँक मानले जाते. मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात २२ अधिकाºयांसह ५० ते ५५ जवानांचा स्टाफ कार्य करतो. उमंग युनिटच्या अधिकाºयांना किल्ल्याच्या परिसराची भुरळ पडली. त्यांनी सेनेच्या मुख्यालयाकडे किल्ला ताब्यात देण्याची शिफारस केली. मुख्यालयाने ११८ प्रादेशिक सेनेला आपले घर सोडण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे अख्ख्या बटालियनने मुख्यालय सोडले.मुख्यालयाने दिलेल्या निर्णयामुळे तैनात सैनिकांनी नाराजी व्यक्त केली. पण सेनेचा आदेश अंतिम असल्याने त्यांना अधिवास सोडावा लागला. मात्र ही बाब माजी सैनिकांना खटकली. त्यांनी सनदशीर मार्गाने किल्ल्यासाठी लढाई सुरू केली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, चीफ आॅफ आर्मी स्टाफ यांना पत्र पाठवून मनधरणी केली. उच्च न्यायालयातसुद्धा याचिका दाखल केली. पण त्यांचे समाधान झाले नाही.

५५ सैनिकांसाठी ९९ एकरचा परिसरसीताबर्डी किल्ल्याचा परिसर हा ९९ एकरचा होता. ११८ प्रादेशिक सेनेच्या ५११ जवानांची कंपनी येथे तैनात असायची. आता किल्ल्याचा ताबा उमंग युनिटने घेतला आहे. त्यांचा अधिकाºयांसह जवानांचा ५५ लोकांचा स्टाफ आहे. ५५ लोकांनी ९९ एकरचा परिसर सांभाळणे अवघड आहे. माजी सैनिकांच्या मते, किल्ल्याची दुरवस्था होत आहे. वर्षातून दोन दिवस सामान्य नागरिकांसाठी किल्ला सुरू राहायचा. तोही लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे.

भाडेकरू म्हणून आले आणि घरमालक बनलेउमंग युनिट येथे भाडेकरू म्हणून आले होते. त्यांना जागा आवडल्याने सेनाप्रमुखाकडे शिफारस करून घरमालक बनले. पण येथे तैनात असलेली प्रादेशिक सेना ही विदर्भाची अस्मिता आहे. प्रादेशिक सेनेच्या ८० वर्षांच्या अधिवासापासून दूर केले आहे. आमच्या हक्काचा किल्ला मिळविण्यासाठी आमचा प्रयत्न शेवटपर्यंत राहील. ही लढाई सैनिकांची सेनेसोबत आहे.- राम कोरके, उपाध्यक्ष, माजी सैनिक आघाडी, भाजपा, महाराष्ट्र प्रदेश

टॅग्स :Fortगड