शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

नागपूरच्या तरुणींना मध्य प्रदेशात विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 11:22 IST

Human trafficking, Nagpur News दोन तरुणींना रोजगाराचे आमिष दाखवून एका टोळीने त्यांची मध्य प्रदेशमध्ये नेऊन विक्री केली. या दोघींच्या बदल्यात एक लाख ९० हजार रुपये घेऊन आरोपी नागपुरात परतले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या दोन तरुणींना रोजगाराचे आमिष दाखवून एका टोळीने त्यांची मध्य प्रदेशमध्ये नेऊन विक्री केली. या दोघींच्या बदल्यात एक लाख ९० हजार रुपये घेऊन आरोपी नागपुरात परतले. तर विकत घेणाऱ्या आरोपींनी त्या तरुणींवर अनन्वित अत्याचार केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी या टोळीतील एका आरोपीला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.अनुसूचित जमातीच्या या दोन तरुणी नातेवाईक आहेत. त्या रोजगाराच्या शोधात असताना माया नामक महिलेची त्या दोघींसोबत जूनमध्ये ओळख झाली. तिने त्यांना घरोघरी जाऊन साहित्य विकण्याचा रोजगार दिला. त्यानंतर पारडीतील आकाश नामक आरोपीच्या संपर्कात या मुली आल्या. त्याने वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तसेच मध्य प्रदेशात या दोन ठिकाणी मोठा आॅर्डर असून तेथे जाऊन आपल्याला माल विकायचा आहे. खाणे-पिणे, राहणे आणि दहा हजार रुपये पगार मिळेल, असे सांगितले. दोघींच्याही घरची स्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे त्या दोघी मध्य प्रदेशमध्ये जाण्यासाठी तयार झाल्या.आरोपी आकाश आणि त्याचा साथीदार सुशील पैसाडील या दोघांनी जून-जुलैमध्ये त्यांना मध्य प्रदेशच्या टिकमगड जिल्ह्यात नेले. तेथे यादव नामक आरोपींना या दोघींची एक लाख ९० हजार रुपयात विक्री केली. आरोपीने एका मंदिरात या दोघींसोबत जबरदस्तीने लग्न लावले आणि त्यांच्यावर ते अत्याचार करू लागले. असह्य झाल्यामुळे मुली विरोध करू लागल्या. त्या दाद देत नसल्याचे पाहून आरोपींनी आकाशला बोलावून घेतले. त्यानुसार चार दिवसांपूर्वी आरोपी आकाश त्याच्या पत्नी मुलासह टिकमगडला गेला. या दोघी आमच्याजवळ राहायला तयार नसल्यामुळे आमचे पैसे परत कर, असे आरोपी आकाशला म्हणाले. एवढेच नव्हे तर आकाशला आपल्या ताब्यात ठेवून आरोपींनी त्याच्या पत्नी, मुलांना नागपुरात पैसे आणण्यासाठी पाठवले.गावात बोभाटागावात बोभाटा झाल्याने हे प्रकरण त्या गावातील पोलिस ठाण्यात पोहोचले. आकाशने पीडित तरुणीच्या पालकांना व्हिडिओ कॉल करून ही माहिती सांगितली. टिकमगड पोलिसांनीही स्थानिक वरिष्ठांशी संपर्क करून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात माहिती कळविली. त्यानुसार मुलींच्या आई तसेच गिट्टीखदानचे पोलीस पथक शनिवारी तिथे पोहोचले. त्यांनी मुलींना आणि आरोपी आकाशला ताब्यात घेतले. त्यांना नागपुरात आणण्यात आले. मुलींच्या तक्रारीवरून आरोपी आकाश आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध अपहरण करून विक्री करणे, बलात्कार करणे आदी आरोपांखाली अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्याकडे देण्यात आला आहे.नरकयातनांमुळे तरुणी शहारल्याअनेक दिवस आरोपींच्या ताब्यात नरकयातना भोगणाऱ्या त्या दोन तरुणी  नागपुरात परतल्या. मात्र त्या पुरत्या मानसिकरीत्या खचल्या आहेत. पोलिसांनी त्यांचे वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन केले आहे.

 

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करी