शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

सौरपंप योजना अडकली

By admin | Updated: June 27, 2014 00:34 IST

भाजप नेतृत्वातील केंद्र सरकारने निर्णयाचा धडाका लावला आहे. देशात चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली आहे. परंतु याच पक्षाची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या धोरण लकव्यात महत्त्वाकांक्षी

जिल्हा परिषद : चार महिन्यांपासून फाईल्सची भ्रमंतीगणेश हूड - नागपूरभाजप नेतृत्वातील केंद्र सरकारने निर्णयाचा धडाका लावला आहे. देशात चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली आहे. परंतु याच पक्षाची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या धोरण लकव्यात महत्त्वाकांक्षी योजना अडकल्या आहेत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे दुहेरी सौरऊर्जा पंप योजना. चार महिन्यांपासून ही फाईल मंजुरीसाठी फिरत आहे. वीज भारनियमन व पाणी टंचाईची समस्या असलेल्या गावांसाठी ही योजना जीवनदायी ठरणार आहे. परंतु ३०जून पर्यंत मंजुरी न मिळाल्यास ही योजना बारगळण्याचा धोका निर्माण झाला आहे.स्थायी समितीने चार महिन्यांपूर्वी या योजनेला मंजुरी दिली. परंतु गेल्या चार महिन्यांपासून ही फाईल एका विभागातून दुसऱ्या विभागात भ्रमंती करीत आहे. महिनाभरापासून ती वित्त विभागात धूळखात आहे. विशेष म्हणजे सौरऊर्जा पंपासाठी शासनाने जाहीर केलेल्या दर कराराची मुदत संपत असल्याने या प्रस्तावाला ३० जून २०१४ पूर्वी मंजुरी मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यातून जिल्ह्यातील १०० हून अधिक टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परंतु कमी लोकसंख्येच्या गावासाठी अशा योजना राबविताना अडचणी येतात. यावर दुहेरी सौरपंप योजना उपयुक्त ठरत आहे. म्हणूनच पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील नऊ गावांसाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ४५ लाखांची तरतूदही करण्यात आली आहे. सौरऊर्जेवर चालणारा पंप व हँडपंप अशी दुहेरी सुविधा यात आहे. दिवसभर सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर हा पंप चालतो. ही ऊर्जा संपली तरी हँडपंपाच्या साह्याने पाणी काढता येते. त्यामुळे २४ तास पाणी उपलब्ध होते. कमी लोकसंख्येच्या गावांसाठी ही योजना उपयुक्त ठरणारी आहे. फाईलवर पाच दिवसात अधिकाऱ्याने सही न केल्यास सौरपंप खरेदीचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी शासनाची अनुमती घ्यावी लागणार आहे. या सर्व बाबींची जाणीव जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनाही आहे. असे असतानाही फाईलवर सही का होत नाही, हा प्रश्नच आहे.