शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सोलर रुफ टॉपला अनुदानाची ‘ऊर्जा’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:24 IST

भरभक्कम विजेच्या बिलापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही जर अनुदान घेऊन सोलर रुफ टॉप लावण्याच्या तयारीत असाल तर थोडे थांबा. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याने यावरील अनुदानाबाबत अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही.

ठळक मुद्देअद्याप दिशानिर्देश नाहीतकेंद्र व राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरभक्कम विजेच्या बिलापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही जर अनुदान घेऊन सोलर रुफ टॉप लावण्याच्या तयारीत असाल तर थोडे थांबा. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याने यावरील अनुदानाबाबत अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. यासाठी जबाबदार असलेल्या महाऊर्जा किंवा महावितरण यापैकी कुणाकडेही ठोस उत्तर नाही. ते केंद्राकडे बोट दाखवित दिशानिर्देश नसल्याने आम्हीही दुविधेत असल्याचा दावा करीत आहेत.सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे अनुदान थांबलेले आहे. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापित होताच अनुदान दिले जाईल. परंतु हा दावाही फोल ठरत असल्याचे दिसून येते कारण आतापर्यंत यासंदर्भातील दिशा-निर्देशच ठरलेले नाहीत.विशेष म्हणजे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने ‘ग्रीन एनर्जी’ ला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. घर किंवा प्रतिष्ठानांच्या छतावर सोलर रुफ टॉप योजना सुरु करण्यात आली. यापासून तयार होणारी अतिरिक्त विजेचे नेट मीटरिंगच्या माध्यमातून त्याची रक्कम बिलात समाविष्ट करून नागिरकांना दिलासा दिला जात आहे. ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी अनुदानाची घोषणा करण्यात आली. निर्णय झाला की वर्ष २०१८-१९ मध्ये ५० मेगावॉट सौर ऊर्जाचे उत्पादन राज्यात केले जाईल. सोलर रुफ टॉप लावणाऱ्यांना प्रति किलोवॉट (के.डब्ल्यू) १४,३०० रुपयाचे अनुदान दिले जाईल. वर्ष २०१७-१८ मध्ये अनुदानाची रक्कम १६ हजार व त्यापूर्वी १७ हजार रुपये इतकी होती. महावितरणकडून नेट मीटरिंगचे प्रमाणपत्र देताच केंद्र सरकार महाऊर्जाच्या माध्यमातून अनुदान प्रदान करीत होते. मार्चपर्यंत सर्व व्यवस्थित चालले. यावेळीही अनुदान उशिराच आले. परंतु खरी समस्या यानंतर सुरु झाली. केंद्र सरकारने सांगितले की, नेट मीटरिंगची जबाबदारी महावितरणकडे आहे, त्यामुळे त्यांच्या मार्फतच अनुदान जारी केले जाईल. एप्रिलमध्ये यासंदर्भात ‘सर्क्युलर’ जारी करण्यात आले. परंतु आॅक्टोबर संपला तरी महावितरणला अनुदान मिळालेले नाही. दुसरीकडे महावितरणचे म्हणणे आहे की, त्यांना यासंदर्भात केंद्र सरकारच्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशनकडून कुठलेही दिशा-निर्देश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत यासंदर्भात काहीही सांगता येणार नाही. महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आता अनुदान हा त्यांचा विषय राहिलेला नाही. ते केवळ मागच्या वर्षीच्या अनुदानाचा निपटारा करतील. महाऊर्जाने अनुदान जारी होण्यास विलंबासाठी कंत्राटदराला जबाबदार धरले आहे. ते वेळेवर अर्ज करीत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

अनेकदा केली विनंतीमहाऊर्जाचे म्हणणे आहे की, नागरिकांपर्यंत अनुदान पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेकदा केंद्र सरकारल पत्र लिहिले आहे. महावितरणने सुद्धा पत्र लिहिले. परंतु अजुनपर्यंत अनुदान जारी झालेले नाही.अनेकांनी नेट मीटरिंग सुरुच केले नाहीमहावितरणतर्फे टू वे मीटर लावल्यानंतरच अनुदान जारी होते. जर कुणी अनुदान मिळण्यापूर्वीच उत्पादन सुरु केले असेल तर त्याला ते मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेक लोकांनी सोलर रुफ टॉप लावल्यानंतरही नेट मीटरिंग सुरु केलेले नाही. ही अडचण लक्षात घेता ठेकेदरांनी उपाय शोधला आहे. यासाठी असे इनव्हर्टर लावले जात आहे जे तितक्याच ऊर्जेचे उत्पादन करीत आहेत जितक्या ऊर्जेची गरज आहे. नेट मीटरिंगच्या अभावामुळे नागरिकांना अतिरिक्त उत्पादनाचा लाभही मिळत नाही आहे.

जास्तीत जास्त अनुदान १.३० लाख रुपयापर्यंतकेंद्र सरकारने ३ सप्टेंबर रोजी वर्ष २०१९-२० साठी अनुदानाचे जे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार जास्तीत जस्त १ लाख ३० हजार रुपये अनुदान दिले जाईल. १ के डब्ल्यू क्षमतेसाठी जास्तीत जास्त २० हजार रुपये, दोन के डब्ल्यूसाठी ४० हजार रुपये, ३ के डब्ल्यूसाठी ६० हजार रुपये, ४ के डब्ल्यूसाठी ७० हजार रुपये, ५ के डब्ल्यूसाठी ८० हजार रुपये, ६ के. डब्ल्यूसाठी ९० हजार रुपये, ७ के.डब्ल्यूसाठी १ लाख रुपये, ८ के. डब्ल्यूसाठी १.१० हजार रुपये, ९ के. डब्यूसाठी १.२० हजार आणि १० के.डबल्यू आणि त्यापेक्षा अधिकसाठी १ लाख ३० हजार रुपयाच अनुदान दिले जाईल.

टॅग्स :Governmentसरकार