शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

नागपूर जिल्ह्यातील जमिनीत लोह, सल्फर, झिंकचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 07:00 IST

Nagpur News रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. जमिनीचा पोत खराब होत असून सुपिकता हरवत चालली आहे. नागपूर जिल्ह्यात झालेल्या निरीक्षणात ही बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देरासायनिक खतांच्या अतिवापराने सुपिकता हरवली सर्व तालुक्यात नायट्रोजन डिफिसियंसी

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. जमिनीचा पोत खराब होत असून सुपिकता हरवत चालली आहे. नागपूर जिल्ह्यात झालेल्या निरीक्षणात ही बाब पुढे आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये जमिनीत आयरन (लोह), झिंक आणि सल्फर यांसारखे सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण घटत चालले आहे. शिवाय नायट्रोजनची कमतरताही निर्माण झाली आहे.

जिल्हा कृषी विभागाने गेल्या काही दिवसात सर्व तालुक्यातील गावांमध्ये जमिनीचे सर्वेक्षण केले आहे. तसा रामटेक वगळता सर्व तालुक्यांमध्ये सुपिकता इंडेक्स समाधानकारक आहे. रामटेक तालुक्यामध्ये नायट्राेजन, फाॅस्फेट व पाेटॅशियम या मुख्य अन्न द्रव्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. हा इंडेक्स अनुक्रमे १.०७, १.८६ व २.०९ एवढा आहे. दरम्यान सर्व तालुक्यामध्ये नायट्राेजनची कमतरता निर्माण झाली आहे. दरम्यान रामटेक वगळता सर्व तालुक्यामध्ये फाॅस्फेट व पाेटॅशियमचे प्रमाण कळमेश्वर, काटाेल, कामठी, माैदा, नरखेड, पारशिवनी, सावनेर या तालुक्यांमध्ये अधिक तर उर्वरीत तालुक्यात चांगले आहे.

मात्र चिंतेची बाब म्हणजे सर्व तालुक्यांमध्ये जमिनीत लाेह, झिंक व सल्फर या सूक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता निर्माण झाली आहे. काॅपर, मॅगनिज, बाेराॅन हे घटक मात्र समाधानकारक आहेत. पिकांच्या वाढीपासून ते पिक येण्यापर्यंत किंवा फळ झाडाला फळ येईपर्यंत हे सर्व घटक महत्त्वाची भूमिका बजावणारे आहेत. पीएच ७.४ ते ८.४ असल्याने जमिन आम्लयुक्त हाेत असल्याचेही नमुद करण्यात आले आहे. जमिनीचा पाेत खराब हाेत चालल्याने सुपिकता घसरली असून उत्पादन कमी हाेत आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या अतिवापरावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

१८२४ गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक

कृषी विभाग रासायनिक खतांचा अतिवापर कमी करण्यासाठी ११ ते १७ मे पर्यंत जनजागृती सप्ताह राबवित आहे. जमिनीची सुपिकता पातळी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रीय, जैविक खतांसह रासायनिक खतांचा याेग्य प्रमाणात वापर करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.. यासाठी जिल्ह्यातील १८२४ गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक लावला असून तेथील जमिनीच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक पिकासाठी आणि फळशेतीसाठी किती प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

सुक्ष्म अन्नद्रव्य कमी हाेणे म्हणजे पिकांच्या वाढीपासून ते पीक पूर्ण येईपर्यंत परिणाम करणारे आहे. आयरनमुळे धान, गहू अशा पिकांना मजबुती येते, सल्फर फळ येण्यासाठी महत्त्वाचे आहे तर बाेराॅनसारखे घटक फुले येण्यासाठी आवश्यक आहेत. जैविक खतांमध्ये वातावरणातील नायट्राेजन जमिनीत शाेषण करण्याची व पिकांना पुरविण्याची क्षमता असते. त्यामुळे रासायनिक खतांचा अतिवापर टाळणे आवश्यक आहे.

- अरविंद्र उपरीकर, कृषी अधिकारी, जिल्हा कृषी विभाग

टॅग्स :agricultureशेती