शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

सामाजिक सौहार्द केवळ स्वप्न नाही, त्याची पूर्तता होणारच : ब्रह्मविहारी स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 16:38 IST

Nagpur News सामाजिक सौहार्दासाठी जगाकडून अपेक्षा करण्याऐवजी अगोदर स्वत:पासूनच सुरुवात केली पाहिजे, असे प्रतिपादन बीएपीएस स्वामिनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी यांनी केले.

नागपूर : एक काळ होता जेव्हा चंद्रावर जाणे, अंतराळाची सहल हे स्वप्न वाटत होते. परंतु या गोष्टी प्रत्यक्षात आल्या. अनेकांना जगात सामाजिक सौहार्द नांदेल हे स्वप्न वाटते, परंतु निश्चितच ते पूर्ण होईल हा विश्वास आहे. प्रेमाचा प्रसार, नियमांचे पालन व योग्य जीवनशैलीचा विकास यासाठी संपूर्ण समाजाने एकत्रित प्रयत्न केले तर जागतिक सामाजिक सौहार्द प्रस्थापित केला जाऊ शकतो. सामाजिक सौहार्दासाठी जगाकडून अपेक्षा करण्याऐवजी अगोदर स्वत:पासूनच सुरुवात केली पाहिजे, असे प्रतिपादन बीएपीएस स्वामिनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी यांनी केले.

जगासमोर अनेक प्रश्न असतात. यांची उत्तरे शोधण्याची जबाबादारी आपलीच आहे. जेव्हा योग्य प्रश्न विचारण्याची क्षमता असेल तेव्हाच कुठल्याही समस्येवर उत्तर मिळू शकते. आध्यात्मिकता व धर्म ही देशाची संस्कृती आहे. परंतु अनेकदा त्याचे योग्य पद्धतीने पालन होत नाही. धर्माच्या नावाखाली लोक हेटाळणी करतात. जर आध्यात्मिकता व धर्माचे योग्य दिशेने अनुसरण झाले तर जगात शांतता व सौहार्द प्रस्थापित करता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

गुजरातच्या अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की त्यावेळी देशातील ७५ टक्के लोक न्याय व बदल्याची भाषा करत होते. परंतु प्रमुखस्वामी महाराज यांनी शांततेचे आवाहन केले. न्यायापेक्षा शांतता केव्हाही मोठी असते हाच त्यांचा विचार होता. गुजरातच्या लोकांनी त्यांच्या आवाहनाचे पालन केले व त्यामुळेच शांतता प्रस्थापित झाली. जगात एकच धर्म राहील असा विचार करणे अयोग्य आहे. देवालाच विविधता आवडते. म्हणूनच निसर्गात वेगवेगळा सुगंध, चव असलेली फुले, फळ आहे. धर्माचार्य मंचावर जो संवाद करतात तोच अनुयायांपर्यंत पोहोचायला हवा व तोच संवाद ह्रद्यापर्यंत पोहोचून त्याचे अनुसरण व्हायला हवे. सौहार्द वाढावायचा असेल तर स्वत: त्याग करण्याची भावना निर्माण व्हायला हवी आणि प्रेम, नियम व जीवनावर प्रेम ही त्रिसूत्री लक्षात ठेवायला हवी. एकमेकांवर फुलाप्रमाणे प्रेम करावे. सौहार्दासाठी आवश्यक नियम व कायदे निर्माण झाले पाहिजे ही काळाची गरज आहे. तसेच सामाजिक सौहार्द वाढेल अशी जीवनशैली विकसित करायला हवी. स्वत:च्या धर्मासोबत इतर धर्मांचादेखील आदर केला तर एकात्मता वाढीस लागले, अशी भावनादेखील त्यांनी व्यक्त केली.

अबुधाबीचे मंदिर सामाजिक समरसतेचे उदाहरण

अबुधाबीसारख्या मुस्लिम देशात हिंदू मंदिर साकारत आहे ही मोठी बाब आहे. हेदेखील एकेकाळी स्वप्नच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इच्छा व मार्ग आहे. त्यातून हे स्वप्न पूर्ण होत आहे. अबुधाबीच्या राज्यकर्त्यांनी मंदिरासाठी अगोदर साडेतेरा एकर जागा दिलीच. शिवाय नंतर पार्किंगसाठी आणखी साडेतेरा एकर जागा दिली. एका मुस्लिम राजाने हिंदू मंदिरासाठी जागा दिली. या मंदिराचे आर्किटेक्ट ख्रिश्चन आहेत, प्रकल्प व्यवस्थापक शीख आहेत, कंत्राटदार पारसी आहेत तर चेअरमन जैन आहेत. खरोखरच हे मंदिर सामाजिक समरसतेचा आदर्श प्रस्थापित करणारे ठरणार आहे, असे ब्रह्मविहारी स्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद