शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

सामाजिक सौहार्द केवळ स्वप्न नाही, त्याची पूर्तता होणारच : ब्रह्मविहारी स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 16:38 IST

Nagpur News सामाजिक सौहार्दासाठी जगाकडून अपेक्षा करण्याऐवजी अगोदर स्वत:पासूनच सुरुवात केली पाहिजे, असे प्रतिपादन बीएपीएस स्वामिनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी यांनी केले.

नागपूर : एक काळ होता जेव्हा चंद्रावर जाणे, अंतराळाची सहल हे स्वप्न वाटत होते. परंतु या गोष्टी प्रत्यक्षात आल्या. अनेकांना जगात सामाजिक सौहार्द नांदेल हे स्वप्न वाटते, परंतु निश्चितच ते पूर्ण होईल हा विश्वास आहे. प्रेमाचा प्रसार, नियमांचे पालन व योग्य जीवनशैलीचा विकास यासाठी संपूर्ण समाजाने एकत्रित प्रयत्न केले तर जागतिक सामाजिक सौहार्द प्रस्थापित केला जाऊ शकतो. सामाजिक सौहार्दासाठी जगाकडून अपेक्षा करण्याऐवजी अगोदर स्वत:पासूनच सुरुवात केली पाहिजे, असे प्रतिपादन बीएपीएस स्वामिनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी यांनी केले.

जगासमोर अनेक प्रश्न असतात. यांची उत्तरे शोधण्याची जबाबादारी आपलीच आहे. जेव्हा योग्य प्रश्न विचारण्याची क्षमता असेल तेव्हाच कुठल्याही समस्येवर उत्तर मिळू शकते. आध्यात्मिकता व धर्म ही देशाची संस्कृती आहे. परंतु अनेकदा त्याचे योग्य पद्धतीने पालन होत नाही. धर्माच्या नावाखाली लोक हेटाळणी करतात. जर आध्यात्मिकता व धर्माचे योग्य दिशेने अनुसरण झाले तर जगात शांतता व सौहार्द प्रस्थापित करता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

गुजरातच्या अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की त्यावेळी देशातील ७५ टक्के लोक न्याय व बदल्याची भाषा करत होते. परंतु प्रमुखस्वामी महाराज यांनी शांततेचे आवाहन केले. न्यायापेक्षा शांतता केव्हाही मोठी असते हाच त्यांचा विचार होता. गुजरातच्या लोकांनी त्यांच्या आवाहनाचे पालन केले व त्यामुळेच शांतता प्रस्थापित झाली. जगात एकच धर्म राहील असा विचार करणे अयोग्य आहे. देवालाच विविधता आवडते. म्हणूनच निसर्गात वेगवेगळा सुगंध, चव असलेली फुले, फळ आहे. धर्माचार्य मंचावर जो संवाद करतात तोच अनुयायांपर्यंत पोहोचायला हवा व तोच संवाद ह्रद्यापर्यंत पोहोचून त्याचे अनुसरण व्हायला हवे. सौहार्द वाढावायचा असेल तर स्वत: त्याग करण्याची भावना निर्माण व्हायला हवी आणि प्रेम, नियम व जीवनावर प्रेम ही त्रिसूत्री लक्षात ठेवायला हवी. एकमेकांवर फुलाप्रमाणे प्रेम करावे. सौहार्दासाठी आवश्यक नियम व कायदे निर्माण झाले पाहिजे ही काळाची गरज आहे. तसेच सामाजिक सौहार्द वाढेल अशी जीवनशैली विकसित करायला हवी. स्वत:च्या धर्मासोबत इतर धर्मांचादेखील आदर केला तर एकात्मता वाढीस लागले, अशी भावनादेखील त्यांनी व्यक्त केली.

अबुधाबीचे मंदिर सामाजिक समरसतेचे उदाहरण

अबुधाबीसारख्या मुस्लिम देशात हिंदू मंदिर साकारत आहे ही मोठी बाब आहे. हेदेखील एकेकाळी स्वप्नच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इच्छा व मार्ग आहे. त्यातून हे स्वप्न पूर्ण होत आहे. अबुधाबीच्या राज्यकर्त्यांनी मंदिरासाठी अगोदर साडेतेरा एकर जागा दिलीच. शिवाय नंतर पार्किंगसाठी आणखी साडेतेरा एकर जागा दिली. एका मुस्लिम राजाने हिंदू मंदिरासाठी जागा दिली. या मंदिराचे आर्किटेक्ट ख्रिश्चन आहेत, प्रकल्प व्यवस्थापक शीख आहेत, कंत्राटदार पारसी आहेत तर चेअरमन जैन आहेत. खरोखरच हे मंदिर सामाजिक समरसतेचा आदर्श प्रस्थापित करणारे ठरणार आहे, असे ब्रह्मविहारी स्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद