शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांमुळेच सामाजिक व आर्थिक प्रगती

By admin | Updated: April 25, 2016 02:50 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली असून, भारतीयांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे प्रतिपादन डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.

स्वतंत्र मजदूर युनियनचे संमेलन : डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंतीनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली असून, भारतीयांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे प्रतिपादन डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय कामगार संमेलन बैद्यनाथ चौक येथील अजंता हॉलमध्ये रविवारी पार पडले. अध्यक्षस्थानी डॉ. सुखदेव थोरात, स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. डी.बी. वानकर, नागपूरचे महासचिव जे.एस. पाटील, विनायक निकाळे, दोन्ता प्रशांत उपस्थित होते. थोरात म्हणाले, संविधानाच्या माध्यमातून समानता, स्वतंत्रता आणि न्यायाचा अधिकार तसेच शैक्षणिक आणि सेवांमध्ये आरक्षणाची तरतूद झाली. त्याच्या परिणामस्वरूपात भारतात ८० ते ९० लाख अनुसूचित जाती-जमातीचे कर्मचारी संघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक आणि आर्थिक उन्नती बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग आणि बलिदानामुळे प्राप्त झाली. डॉ. आंबेडकरांनी १२-१३ फेब्रुवारी १९३८ रोजी मनमाड (महाराष्ट्र ) येथे झालेल्या दलित रेल्वे कामगार परिषदेत ट्रेड युनियनवर भाष्य केले होते. त्यांच्या विचारामुळेच राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र मजदूर युनियनची स्थापना झाली. यावेळी स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. डी.बी. वानकर, नागपूरचे महासचिव जे.एस. पाटील, विनायक निकाळे, दोन्ता प्रशांत यांनी मार्गदर्शन करताना अनुसूचित जाती-जनजाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यक कर्मचाऱ्यांना संघटित करून आंबेडकरी कामगार आंदोलन मजबूत करण्याचे आवाहन केले. पहिल्या सत्रात डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते युनियनच्या माईलस्टोन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक एन.बी. जारोंडे यांनी केले तर डी.एम. खैरे यांनी आभार मानले. दुसऱ्या सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.एस. पाटील. अ‍ॅड. मनोज गोरकेला. एम. जगन्नाथन, ए.व्ही. किरण. दिलीप गामील यांनी ‘संविधानिक संरक्षण व न्यायिक भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले.दुसऱ्या सत्रात एस.के. सचदेव यांनी प्रास्ताविक केले. संमेलनात एआयव्हीईएफचे सरचिटणीस ए.व्ही. किरण, एमआरएमव्हीकेएसचे मुख्य संघटक एस.के. हनवते, अध्यक्ष संजय घोडके, आयएलयूचे सीडब्ल्यूसी सदस्य गणेश उके, एमआरएमव्हीकेएस, एनयूझेडचे अध्यक्ष एच.व्ही. ढोके, एसआरबीकेयूचे (रेल्वे) केंद्रीय उपाध्यक्ष सी.एस. जनबदकर, उपाध्यक्ष वा.के. कांबळे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)