शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

...तर गर्भातच रोखता येईल ‘टाइप-१’ मधुमेह! राष्ट्रीय परिषदेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2023 20:28 IST

Nagpur News ‘टाइप-१’ मधुमेहावर संशोधन सुरू आहे. हा मधुमेह गर्भातच रोखणे शक्य होईल, अशी माहिती ‘डायबिटीज इन प्रेग्नेंसी स्टडी ग्रुप इंडिया’ (डीआयपीएसआय), चेन्नईचे संस्थापक संरक्षक व पद्मश्री डॉ. व्ही. शेशैया यांनी दिली.

 

नागपूर : ‘टाइप-१’ मधुमेहावर संशोधन सुरू आहे. संशोधन प्राथमिक टप्प्यावर असले तरी त्याचे चांगले रिझल्ट पुढे येत आहेत. यात यश मिळाल्यास हा मधुमेह गर्भातच रोखणे शक्य होईल, अशी माहिती ‘डायबिटीज इन प्रेग्नेंसी स्टडी ग्रुप इंडिया’ (डीआयपीएसआय), चेन्नईचे संस्थापक संरक्षक व पद्मश्री डॉ. व्ही. शेशैया यांनी दिली.

‘डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया’ (नागपूर) व ‘सुनील डायबिटिज केअर अँण्ड रिसर्च सेंटर’च्या वतीने आयोजित ९व्या वार्षिक ‘हॅलो डायबिटीज ॲकॅडेमिया - २०२३’च्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन दिवसाच्या विशेष सत्रात ते बोलत होते. डॉ. शेशैया म्हणाले, हे संशोधन गर्भवती माता आणि त्यांच्या पोटातील मुलांसाठी आशेचा किरण आहे. यात गर्भधारणेच्या ९ ते ११व्या आठवड्यात रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण ११०च्यावर गेल्यास ‘स्वादुपिंड इन्सुलिन’ तयार करण्यास सुरुवात करतो. यामुळे आईच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते. मात्र, इतक्या लवकर इन्सुलिनची निर्मिती होत असल्याने बाळाच्या स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन निर्मितीची सवय लागून बाळ ‘हायपरइन्सुलिनमिया’सह जन्म घेऊ शकते. अर्थातच जन्मत: मधुमेहाचा धोका वाढू शकतो आणि पुढील आयुष्यात आरोग्यविषयक गुंतागुंत होऊ शकते.

-गर्भावस्थेतच उपचार आवश्यक

९ ते ११व्या आठवड्यात गर्भाच्या स्वादुपिंडाचा विकास सुरू होतो. या कालावधीत तपासणी केली आणि आईच्या रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचे आढळल्यास त्यावर उपचार आवश्यक ठरतो. गर्भाच्या विकसनशील स्वादुपिंडाला जास्त इन्सुलिन तयार करण्यापासून रोखता येतो. ज्यामुळे ‘टाइप १’ मधुमेहाचा धोका कमी होतो. सध्या हे संशोधन सुरुवातीच्या टप्प्यात आहे. डेटा संकलन सुरू आहे. संशोधन दीर्घकालीन चालणारे असले तरी सुरुवातीचे परिणाम आशादायक आहेत.

- पुढील २५ वर्षांत टाइप-१ मधुमेहाचे उच्चाटन

डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता यांनी या संशोधनाच्या संभाव्य परिणामाबद्दल आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले, हे संशोधन यशस्वी झाल्यास ‘टाइप १’ मधुमेह प्रतिबंधकाच्या पद्धतीत क्रांती घडून येईल. पुढील २५ वर्षांत जेव्हा भारत स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा या रोगाचे उच्चाटन होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेह