शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

...तर गर्भातच रोखता येईल ‘टाइप-१’ मधुमेह! राष्ट्रीय परिषदेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2023 20:28 IST

Nagpur News ‘टाइप-१’ मधुमेहावर संशोधन सुरू आहे. हा मधुमेह गर्भातच रोखणे शक्य होईल, अशी माहिती ‘डायबिटीज इन प्रेग्नेंसी स्टडी ग्रुप इंडिया’ (डीआयपीएसआय), चेन्नईचे संस्थापक संरक्षक व पद्मश्री डॉ. व्ही. शेशैया यांनी दिली.

 

नागपूर : ‘टाइप-१’ मधुमेहावर संशोधन सुरू आहे. संशोधन प्राथमिक टप्प्यावर असले तरी त्याचे चांगले रिझल्ट पुढे येत आहेत. यात यश मिळाल्यास हा मधुमेह गर्भातच रोखणे शक्य होईल, अशी माहिती ‘डायबिटीज इन प्रेग्नेंसी स्टडी ग्रुप इंडिया’ (डीआयपीएसआय), चेन्नईचे संस्थापक संरक्षक व पद्मश्री डॉ. व्ही. शेशैया यांनी दिली.

‘डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया’ (नागपूर) व ‘सुनील डायबिटिज केअर अँण्ड रिसर्च सेंटर’च्या वतीने आयोजित ९व्या वार्षिक ‘हॅलो डायबिटीज ॲकॅडेमिया - २०२३’च्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन दिवसाच्या विशेष सत्रात ते बोलत होते. डॉ. शेशैया म्हणाले, हे संशोधन गर्भवती माता आणि त्यांच्या पोटातील मुलांसाठी आशेचा किरण आहे. यात गर्भधारणेच्या ९ ते ११व्या आठवड्यात रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण ११०च्यावर गेल्यास ‘स्वादुपिंड इन्सुलिन’ तयार करण्यास सुरुवात करतो. यामुळे आईच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते. मात्र, इतक्या लवकर इन्सुलिनची निर्मिती होत असल्याने बाळाच्या स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन निर्मितीची सवय लागून बाळ ‘हायपरइन्सुलिनमिया’सह जन्म घेऊ शकते. अर्थातच जन्मत: मधुमेहाचा धोका वाढू शकतो आणि पुढील आयुष्यात आरोग्यविषयक गुंतागुंत होऊ शकते.

-गर्भावस्थेतच उपचार आवश्यक

९ ते ११व्या आठवड्यात गर्भाच्या स्वादुपिंडाचा विकास सुरू होतो. या कालावधीत तपासणी केली आणि आईच्या रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचे आढळल्यास त्यावर उपचार आवश्यक ठरतो. गर्भाच्या विकसनशील स्वादुपिंडाला जास्त इन्सुलिन तयार करण्यापासून रोखता येतो. ज्यामुळे ‘टाइप १’ मधुमेहाचा धोका कमी होतो. सध्या हे संशोधन सुरुवातीच्या टप्प्यात आहे. डेटा संकलन सुरू आहे. संशोधन दीर्घकालीन चालणारे असले तरी सुरुवातीचे परिणाम आशादायक आहेत.

- पुढील २५ वर्षांत टाइप-१ मधुमेहाचे उच्चाटन

डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता यांनी या संशोधनाच्या संभाव्य परिणामाबद्दल आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले, हे संशोधन यशस्वी झाल्यास ‘टाइप १’ मधुमेह प्रतिबंधकाच्या पद्धतीत क्रांती घडून येईल. पुढील २५ वर्षांत जेव्हा भारत स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा या रोगाचे उच्चाटन होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेह