शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

...तर गर्भातच रोखता येईल ‘टाइप-१’ मधुमेह! राष्ट्रीय परिषदेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2023 20:28 IST

Nagpur News ‘टाइप-१’ मधुमेहावर संशोधन सुरू आहे. हा मधुमेह गर्भातच रोखणे शक्य होईल, अशी माहिती ‘डायबिटीज इन प्रेग्नेंसी स्टडी ग्रुप इंडिया’ (डीआयपीएसआय), चेन्नईचे संस्थापक संरक्षक व पद्मश्री डॉ. व्ही. शेशैया यांनी दिली.

 

नागपूर : ‘टाइप-१’ मधुमेहावर संशोधन सुरू आहे. संशोधन प्राथमिक टप्प्यावर असले तरी त्याचे चांगले रिझल्ट पुढे येत आहेत. यात यश मिळाल्यास हा मधुमेह गर्भातच रोखणे शक्य होईल, अशी माहिती ‘डायबिटीज इन प्रेग्नेंसी स्टडी ग्रुप इंडिया’ (डीआयपीएसआय), चेन्नईचे संस्थापक संरक्षक व पद्मश्री डॉ. व्ही. शेशैया यांनी दिली.

‘डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया’ (नागपूर) व ‘सुनील डायबिटिज केअर अँण्ड रिसर्च सेंटर’च्या वतीने आयोजित ९व्या वार्षिक ‘हॅलो डायबिटीज ॲकॅडेमिया - २०२३’च्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन दिवसाच्या विशेष सत्रात ते बोलत होते. डॉ. शेशैया म्हणाले, हे संशोधन गर्भवती माता आणि त्यांच्या पोटातील मुलांसाठी आशेचा किरण आहे. यात गर्भधारणेच्या ९ ते ११व्या आठवड्यात रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण ११०च्यावर गेल्यास ‘स्वादुपिंड इन्सुलिन’ तयार करण्यास सुरुवात करतो. यामुळे आईच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते. मात्र, इतक्या लवकर इन्सुलिनची निर्मिती होत असल्याने बाळाच्या स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन निर्मितीची सवय लागून बाळ ‘हायपरइन्सुलिनमिया’सह जन्म घेऊ शकते. अर्थातच जन्मत: मधुमेहाचा धोका वाढू शकतो आणि पुढील आयुष्यात आरोग्यविषयक गुंतागुंत होऊ शकते.

-गर्भावस्थेतच उपचार आवश्यक

९ ते ११व्या आठवड्यात गर्भाच्या स्वादुपिंडाचा विकास सुरू होतो. या कालावधीत तपासणी केली आणि आईच्या रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचे आढळल्यास त्यावर उपचार आवश्यक ठरतो. गर्भाच्या विकसनशील स्वादुपिंडाला जास्त इन्सुलिन तयार करण्यापासून रोखता येतो. ज्यामुळे ‘टाइप १’ मधुमेहाचा धोका कमी होतो. सध्या हे संशोधन सुरुवातीच्या टप्प्यात आहे. डेटा संकलन सुरू आहे. संशोधन दीर्घकालीन चालणारे असले तरी सुरुवातीचे परिणाम आशादायक आहेत.

- पुढील २५ वर्षांत टाइप-१ मधुमेहाचे उच्चाटन

डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता यांनी या संशोधनाच्या संभाव्य परिणामाबद्दल आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले, हे संशोधन यशस्वी झाल्यास ‘टाइप १’ मधुमेह प्रतिबंधकाच्या पद्धतीत क्रांती घडून येईल. पुढील २५ वर्षांत जेव्हा भारत स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा या रोगाचे उच्चाटन होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेह