शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

...तर दुसरे लग्न केलेली पत्नीही पहिल्या पतीच्या संपत्तीचा वाटा मिळण्यास पात्र; उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 07:30 IST

Nagpur News हिंदू वारसाहक्क कायद्यातील कलम २४ अनुसार, वारसाहक्क लागू होण्याच्या तारखेपर्यंत पत्नीने दुसरे लग्न केले नसेल तर, ती पत्नी पहिल्या पतीच्या संपत्तीचा वाटा मिळण्यास पात्र आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्दे मृताच्या आईलाही दिला अर्धा वाटा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हिंदू वारसाहक्क कायद्यातील कलम २४ अनुसार, वारसाहक्क लागू होण्याच्या तारखेपर्यंत पत्नीने दुसरे लग्न केले नसेल तर, ती पत्नी पहिल्या पतीच्या संपत्तीचा वाटा मिळण्यास पात्र आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी एका प्रकरणात दिला. (... so the second married wife also deserves a share of the first husband's wealth; High Court)

प्रकरणातील रेल्वे कर्मचारी अनिलचा १९ एप्रिल १९९१ रोजी अपघातात मृत्यू झाला. त्याच्या वारसाला रेल्वेकडून मिळणारी भरपाई लागू होती. त्यामुळे रेल्वेने अनिलची नॉमिनी या नात्याने त्याची पत्नी सुनंदाला ६५ हजार रुपये भरपाई अदा केली. तत्पूर्वी सुनंदाने मे १९९१ मध्ये दुसरे लग्न केले होते. त्यामुळे अनिलची आई जयवंताबाईने सुनंदा भरपाईसाठी पात्र नसल्याचा दावा करून कायदेशीर लढाईला सुरुवात केली. त्याकरिता तिने उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. उच्च न्यायालयाने कायदेशीर बाबी तपासल्यानंतर सुनंदा व जयवंताबाई या दोघींनाही समान भरपाई मिळण्यासाठी पात्र ठरवले.

या प्रकरणाला हिंदू वारसाहक्क कायद्यातील कलम २४ लागू असून त्यानुसार, वारसाहक्क लागू होण्याच्या तारखेपर्यंत पत्नीने दुसरे लग्न केले नसेल तर, ती पहिल्या पतीच्या संपत्तीचा वाटा मिळण्यास पात्र आहे. अनिलचा १९ एप्रिल १९९१ रोजी मृत्यू झाला होता. त्या तारखेला अनिलच्या संपत्तीवर वारसाहक्क लागू झाला. त्या वेळी सुनंदाने दुसरे लग्न केले नव्हते. त्यामुळे ती अनिलच्या संपत्तीचा वाटा मिळण्यास पात्र होती, असे न्यायालयाने या निर्णयात स्पष्ट केले. याशिवाय, न्यायालयाने अनिलच्या संपत्तीत जयवंताबाईचाही वाटा असल्याचे नमूद करून तिला अर्धी रक्कम मिळण्यासाठी पात्र ठरवले, तसेच तिला संबंधित रक्कम तीन महिन्यांमध्ये ६ टक्के व्याजासह परत देण्यात यावी, असे निर्देश सुनंदाला दिले.

...म्हणून कलम २४ लागू

कलम २४ ला हिंदू वारसाहक्क कायद्यातून ९ सप्टेंबर २००५ पासून वगळण्यात आले आहे. परंतु, हे प्रकरण त्यापूर्वीचे असल्यामुळे संबंधित पत्नीचा या कलमानुसार अधिकार निर्धारित करण्यात आला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय