शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

- तर कशी होणार घोषणांची अंमलबजावणी?

By admin | Updated: June 16, 2017 01:55 IST

महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा फटका शहरातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना बसला आहे. पर्याय म्हणून

मनपाची तिजोरी रिकामी : प्रलंबित प्रकल्पांना हवे बूस्ट, शनिवारी अर्थसंकल्प लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा फटका शहरातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना बसला आहे. पर्याय म्हणून प्रशासनाने काही प्रकल्प खासगी सहभागातून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सर्वच प्रकल्प शंभर टक्के खासगी सहभागातून राबविणे योग्य नाही. याचा विचार करता वर्षानुवर्ष रखडलेल्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून आर्थिक बूस्ट देण्याची गरज आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शहर बस वाहतूक सक्षम करणे, शहरातील तलावांचे सौंदर्यीकरण,बाजार संकुलाचे निर्माण, उद्यानांचा विकास, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, आॅरेंज सिटी स्ट्रीट असे प्रक ल्प रखडलेले आहेत. घनकचरा व्यवस्थापन, महिलांसाठी शौचालय,सुलभ शौचालये, श्रीमंत राजे रघुजी भोसले. सभागृहाचे नवीन बांधकाम,नगरभवन सभागृहाचे बांधकाम, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच शहर विकास योजनेतील प्रस्तावित प्रकल्प निधीअभावी रखडलेले आहेत. घनकचरा व्यवस्थापन व शौचालयासारखे विकास प्रकल्प रखडल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात २०४८ कोटीचे उत्पन्न अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५४६ कोटींचा महसूल जमा झाला होता. अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ५०० कोटींची तूट निर्माण झाली. याचा विकास योजनांवर परिणाम झाला आहे. तलावांचे संवर्धन कधी होणार?नागपूर शहरात ११ तलाव आहेत. गांधीसागर, फुटाळा, पांढराबोडी, सक्करदरा, सोनेगाव, नाईक तलाव अशा प्रमुख तलावांच्या संवर्धनाची गरज आहे. महापालिकेचे आर्थिक स्रोत विचारात घेता यासाठी निधी उपलब्ध करणे शक्य नाही. परंतु टप्प्याटप्प्याने तलावांचे संवर्धन शक्य आहे. तलावातील अनावश्यक गाळ काढून खोलीकरण करणे, पाणथळ क्षेत्राची धूप रोखण्यासाठी आणि तलावाची गुणवत्ता टिकवण्याकरिता उपाययोजना करणे, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे, तलावाच्या किनाऱ्याचे सौंदर्यीकरण, हरित पट्टा विकसित करणे यासाठी नियोजनाची गरज आहे. लक्ष्य निर्धारित करून अर्थसंकल्पात यासाठी तरतुदीची गरज आहे.उद्यानांची निर्मिती व्हावी :देशभरातील हिरव्यागार शहरात नागपूरचा समावेश आहे. यात उद्यान विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. शहरात १५१ उद्याने आहेत. यातील ९१ उद्याने महानगरपालिका, ६१ नागपूर सुधार प्रन्यास, तीन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची तर एक उद्यान वन विभागाच्या मालकीचे आहे. शहराचा विस्तार व विकास विचारात घेता शहरात नवीन उद्यानांची निर्मिती करणे गरजेचे आहे. १० नवीन उद्यानांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव होता. परंतु याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. रुग्णालयांसाठी तरतुदीची गरजशहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु महापालिके च्या रुग्णालंयाची अवस्था बिकट आहे. सुविधा व यंत्रसामुग्रीचा अभाव, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे यामुळे गरजू व गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात उत्तम दर्जाचे उपचार मिळत नाही. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्याची गरज आहे.