शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

स्मृती इराणींनी केला पदाचा गैरवापर

By admin | Updated: January 24, 2016 03:05 IST

हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे. त्यात मंत्र्यांना थेट कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही,

पंतप्रधानांनी घ्यावा मंत्रिपदाचा राजीनामा : प्रकाश आंबेडकर यांची मागणीनागपूर : हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे. त्यात मंत्र्यांना थेट कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे असूनही मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी त्या विद्यापीठातील कारभारात थेट हस्तक्षेप करीत आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केला आहे. कायद्याने हा गुन्हा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणी यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठ हे विद्यापीठ कायदा १९७४ अंतर्गत येते या कायद्यांतर्गत हे विद्यापीठ एक ‘अ‍ॅटोनॉमस बॉडी’ (स्वायत्त संस्था) आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू नेमायचे असतील तर ते या देशातील राष्ट्रपतींद्वारे नेमले जातात. या विद्यापीठातील अभ्यासक्रम युजीसी ठरवित असते. येथील सगळा व्यवहार येथील गव्हर्नन्स बॉर्डी मार्फत पाहिले जातात. स्मृती इराणी या मानव संसाधन मंत्री असल्या तरी त्यांना येथे थेट हस्तक्षेप करण्याचे अधिकार नाहीत. त्यांना विद्यापीठासंबंधी काही माहिती हवी असल्यास त्या युजीसीमार्फत मागवू शकतात. परंतु स्मृती इराणी यांनी एक नव्हे तर चारवेळा विद्यापीठाशी पत्रव्यवहार केलेला असून त्यात कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे.रोहित वेमुला हा हुशार विद्यार्थी होता. दलित असूनही तो जनरल कॅटेगरीतूनच प्रवेश घेत होता. विद्यापीठात आंबेडकरी चळवळ फोफावू नये म्हणूनच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याच्यावर साामजिक बहिष्कार घालण्यात आला. त्यातून त्याने आत्महत्या केली. हा ब्रिलियन्सी किल करण्याचा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला पक्षाचे ज्येष्ठ नेते नगरसेवक राजू लोखंडे, अ‍ॅड. मिलिंद पखाले, डॉ. संदीप नंदेशवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)पाकिस्तानवर हल्ला करण्यास कुणी रोखले पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची भाषा करणाऱ्या भाजप व नरेंद्र मोदींना पाकिस्तानवर हल्ला करण्यास कुणी रोखले आहे, असा प्रश्न उपस्थित करीत पाकिस्तानला त्यांच्या देशात घुसून मारण्यासाठी प्रचंड राजकीय ताकद लागते. मंदिरातील पुजाऱ्याकडून हे काम होऊ शकत नाही, मंदिरातील पुजारी देशाचे संरक्षण काय करणार, अशी टीकाही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली.