शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लघु उद्योग देशविकासाचा पाया बनावा: अर्जुनराम मेघवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 01:21 IST

देशातील लघु उद्योगाचा विकास व्हावा, अशी हूरहूर सर्वांच्या मनात असली पाहिजे. या उद्योगाचे स्वरुपच बदलले पाहिजे. लघु उद्योगाचा विकास होऊन तो देशविकासाचा पाया बनावा, असे मत केंद्रीय सांस्कृतिक आणि जड उद्योग राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देलघु उद्योग भारतीचे उद्यमी संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील लघु उद्योगाचा विकास व्हावा, अशी हूरहूर सर्वांच्या मनात असली पाहिजे. या उद्योगाचे स्वरुपच बदलले पाहिजे. लघु उद्योगाचा विकास होऊन तो देशविकासाचा पाया बनावा, असे मत केंद्रीय सांस्कृतिक आणि जड उद्योग राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी येथे व्यक्त केले.लघु उद्योग भारतीचा तीन दिवसीय अखिल भारतीय रौप्य महोत्सवी कार्यक्रम रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी उद्यमी संमेलनात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर उद्योजक असोसिएट्स कॅप्सुल लि.चे चेअरमन डॉ. अजित सिंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, उद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र गुप्ता, राष्ट्रीय सचिव गोविंद लेले, महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र वैद्य आणि सुधीर दाते उपस्थित होते.मेघवाल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न आहे. त्यासोबत देशाचा आर्थिक विकास दर कायम ठेवायचा आहे. त्याकरिता प्रत्येक गाव निर्यातदार बनावे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात लघु उद्योग भारतीची शाखा असावी. विकासाच्या प्रक्रियेत बँकांच्या समस्यांचे समाधान व्हावे. बँकांनी लघु उद्योजकांना एकाच काठीने हाणू नये. चांगली स्थिती नसलेल्या उद्योगांना मदत करावी. सन २०२२ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था सक्षम होणार आहे. त्यात लघु उद्योगांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आॅटोमोबाईल क्षेत्रात मंदी आहे. डीलर बँकेकडे जातो, पण त्याला भाव मिळत नाही. लघु उद्योगाला क्रेडिट मिळत नाही, शिवाय पुरवठा केलेल्या वस्तूंचा पैसाही वेळेत मिळत नाही. या दोन्ही गोष्टीत सरकारला मध्यस्थी करण्याची गरज आहे. लघु उद्योग मजबूत बनण्यासाठी त्यांना येणाºया समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान आणि वरिष्ठ मंत्र्यापर्यंत बाजू मांडू. प्लास्टिक बंद होणार, पण या उद्योगासाठी काय केले पाहिजे, यावरही विचार करणार आहे. लघु उद्योगासाठी एक खिडकी योजना असावी, असे त्यांनी स्पष्ट केले. जीएसटी तंत्रज्ञानाचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.संचालन गोविंद लेले यांनी केले तर डॉ. कृष्ण गोपाल यांनी आभार मानले. यावेळी लघु उद्योग भारतीचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :businessव्यवसायnagpurनागपूर