शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नागपुरातील वस्त्यांमध्ये महिनाभरापासून पाणी साचले; अनारोग्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 11:59 IST

नागपूर शहरात कोरोनाचा ससर्ग वाढत असतानाच दुसरीकडे शहरालगतच्या भागातील वस्त्यांत गेल्या एक - दीड महिन्यापासून पावसाचे पाणी साचून आहे. दुर्गधी व डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देआले तलावाचे स्वरूपमनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोनाचा ससर्ग वाढत असतानाच दुसरीकडे शहरालगतच्या भागातील वस्त्यांत गेल्या एक - दीड महिन्यापासून पावसाचे पाणी साचून आहे. दुर्गधी व डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.प्रभाग क्रमांक २९ मधील गुलमोहर कॉलनी लगतच्या समाधान नगर परिसरात पाणी साचून आहे. येथे रस्त्याचे डांबरीकरण केले परंतु पावसाळी नाली व गडरलाईन न टाकल्याने रिकाम्या प्लॉटवर पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले आहे.

प्रभाग २८ मधील रामकृष्ण नगर, सेनापती नगर, सर्वस्वी नगर व योगेश्वर नगर यासह अनेक वस्त्यांत पाणी साचून आहे. प्रभाग क्रमांक २ मधील नारा, नारी, प्रभाग ३ मधील विनोबा भावे नगर, प्रभाग ६ मधील यादव नगर, चिमूरकर ले-आऊट, एकता कॉलनी, हाउसिंग बोर्ड कॉलनी, पंचशील नगर व हनुमान सोसायटी, प्रभाग २५ मधील पारडी, विनोबा भावे नगर, प्रभाग २६ मधील वाठोडा ले - आऊट, प्रभाग ३४ मधील बेलतरोडी यासह अनेक वस्त्यांत पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळी नाल्या व गडरलाईनची व्यवस्था नसल्याने शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने परिसर अजूनही जलमय आहे.धूर व औषध फवारणीची मागणीबदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्यासारखे आजार उफाळून येत असतानाच शहराच्या कानाकोपऱ्यात घोंगावणाऱ्या डासांनी नागरिकांची झोप उडविली आहे. रात्री आणि दिवसादेखील डासांपासून सुटका करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियमित धूर आणि औषध फवारणी करण्याची मागणी होत आहे.बगिच्यातही डासांचा त्रासमैदाने, बगिच्यांमध्ये तर संध्याकाळी आणि रात्रीच नव्हे तर दिवसाही डास घोंगावत असल्यामुळे लहान मुलांसह मोठ्या माणसांनाही या डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रभागातील कचरा नियमित उचलण्यासह पाणी साचणाऱ्या आणि कचरा साचलेल्या ठिकाणी नियमित फवारणी केल्यास डासांच्या अळ्या नष्ट होऊ शकतील, मात्र प्रशासनाकडून मागणीनंतरही फवारणी केली जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका