शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार झाडांची कत्तल !

By admin | Updated: June 5, 2015 02:34 IST

उपराजधानीतील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणाच्या नावाखाली झाडांची सर्रास कटाई केली जात आहे.

जीवन रामावत  नागपूर उपराजधानीतील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणाच्या नावाखाली झाडांची सर्रास कटाई केली जात आहे. यात मागील पाच वर्षांत शहरातील सुमारे तीन हजार झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्याचा शहरातील पर्यावरणावर फार मोठा वाईट परिणाम होऊ लागला आहे. विज्ञान व बुद्घिमत्तेच्या जोरावर प्रगतीची भरारी घेताना पर्यावरणाला दुय्यम ठरविले जात आहे. परंतु पर्यावरण हा जीवनाचा आधार आहे. त्यामुळे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने नवीन वृक्ष लावण्याची शपथ घेण्याची गरज आहे. पर्यावरण संरक्षणासाठी हाच सर्वात सोपा मार्ग आहे. जैवविविधता मानवाला अन्न, पाणी व निवारा अशा जीवनावश्यक वस्तू पुरविते. जैवविविधतेचा नाश हा पर्यावरणीय परिसंस्थांची उत्पादकता कमी करतो. त्यामुळे जैवविविधतेचे संगोपन करणे आवश्यक आहे. वृक्ष जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. मनुष्यासह विविध सजीवांच्या सुरक्षेसाठी आज वृक्षारोपण ही प्राथमिक गरज आहे. हिरव्यागार झाडांमुळे शहरात चैतन्य निर्माण होते.मात्र सध्याची जीवनशैली पर्यावरणाला बाधक ठरत आहे. उत्पादन व उपभोगाच्या पद्घतीमुळे पाणी, हवा व जमिनींचा अनिर्बंध वापर होत आहे. यामुळे अनेक वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भोगवादी व चंगळवादी जीवनशैलीमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. मानवासह हवा, पाणी, माती, खडक, वनस्पती व प्राणी हे सर्व पर्यावरणाचे घटक आहेत. यात आपले शहर सुद्घा अंतर्भूत आहे. उपराजधानीत ७९.५८ एकर जागेत ४१ उद्याने विकसित केली आहेत. परंतु त्या उद्यानांची सुद्धा फार चांगली अवस्था नाही. नागपूर मध्य भारतातील सर्वात मोठे शहर आहे. येथून काहीच अंतरावर कन्हान व पेंच नदी असून, पश्चिमेला वर्धा व पूर्वेला वैनगंगा नदी आहे. पर्यावरणाचा विचार डोक्यात येताच प्रदूषणाचा प्रश्न पुढे उभा ठाकतो.या प्रदूषणाच्या प्रकोपात अनेक पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. शिवाय २८७ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तज्ज्ञांच्या मते, पशुपक्ष्यांचा निवास नष्ट झाल्यास त्यांच्या प्रजातीही नष्ट होतात.