शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

तीन हजार झाडांची कत्तल !

By admin | Updated: June 5, 2015 02:34 IST

उपराजधानीतील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणाच्या नावाखाली झाडांची सर्रास कटाई केली जात आहे.

जीवन रामावत  नागपूर उपराजधानीतील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणाच्या नावाखाली झाडांची सर्रास कटाई केली जात आहे. यात मागील पाच वर्षांत शहरातील सुमारे तीन हजार झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्याचा शहरातील पर्यावरणावर फार मोठा वाईट परिणाम होऊ लागला आहे. विज्ञान व बुद्घिमत्तेच्या जोरावर प्रगतीची भरारी घेताना पर्यावरणाला दुय्यम ठरविले जात आहे. परंतु पर्यावरण हा जीवनाचा आधार आहे. त्यामुळे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने नवीन वृक्ष लावण्याची शपथ घेण्याची गरज आहे. पर्यावरण संरक्षणासाठी हाच सर्वात सोपा मार्ग आहे. जैवविविधता मानवाला अन्न, पाणी व निवारा अशा जीवनावश्यक वस्तू पुरविते. जैवविविधतेचा नाश हा पर्यावरणीय परिसंस्थांची उत्पादकता कमी करतो. त्यामुळे जैवविविधतेचे संगोपन करणे आवश्यक आहे. वृक्ष जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. मनुष्यासह विविध सजीवांच्या सुरक्षेसाठी आज वृक्षारोपण ही प्राथमिक गरज आहे. हिरव्यागार झाडांमुळे शहरात चैतन्य निर्माण होते.मात्र सध्याची जीवनशैली पर्यावरणाला बाधक ठरत आहे. उत्पादन व उपभोगाच्या पद्घतीमुळे पाणी, हवा व जमिनींचा अनिर्बंध वापर होत आहे. यामुळे अनेक वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भोगवादी व चंगळवादी जीवनशैलीमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. मानवासह हवा, पाणी, माती, खडक, वनस्पती व प्राणी हे सर्व पर्यावरणाचे घटक आहेत. यात आपले शहर सुद्घा अंतर्भूत आहे. उपराजधानीत ७९.५८ एकर जागेत ४१ उद्याने विकसित केली आहेत. परंतु त्या उद्यानांची सुद्धा फार चांगली अवस्था नाही. नागपूर मध्य भारतातील सर्वात मोठे शहर आहे. येथून काहीच अंतरावर कन्हान व पेंच नदी असून, पश्चिमेला वर्धा व पूर्वेला वैनगंगा नदी आहे. पर्यावरणाचा विचार डोक्यात येताच प्रदूषणाचा प्रश्न पुढे उभा ठाकतो.या प्रदूषणाच्या प्रकोपात अनेक पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. शिवाय २८७ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तज्ज्ञांच्या मते, पशुपक्ष्यांचा निवास नष्ट झाल्यास त्यांच्या प्रजातीही नष्ट होतात.