शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

उपराजधानीत काविळसदृश आजाराचे सहा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 11:06 IST

वाडी परिसरातील आंबेडकरनगर वॉर्डामध्ये काविळ पसरला आहे. गेल्या काही दिवसात येथे काविळसदृश आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देवाडीत उद्रेक नगर परिषदेकडे सक्षम आरोग्य यंत्रणाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाडी परिसरातील आंबेडकरनगर वॉर्डामध्ये काविळ पसरला आहे. गेल्या काही दिवसात येथे काविळसदृश आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान तीन वर्षापासून वाडीला नगर परिषद घोषित केल्याने नगर परिषदेकडे आरोग्य यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली आहे.आंबेडकरनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ही नाल्यातून गेली आहे. तसा वाडी परिसराला वेणा जलाशयातून पाणीपुरवठा होतो. गेल्या काही दिवसापासून वेणा जलाशयातून पाणी बंद केले आहे. त्यामुळे टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. टँक रद्वारे होणारा पाणीपुरवठा दूषित असल्याने काविळ परिसरात पसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दूषित पाण्यामुळे गेल्या काही दिवसापासून आजार पसरले असून स्वाती गायकवाड यांना नुकत्याच जुळ्या मुली झाल्या होत्या. तेव्हापासूनच आई आणि दोघी जुळ्या मुली काविळसदृश आजाराने ग्रस्त होत्या.या तिघांचाही मृत्यू काविळने झाल्याचे बोलले जात आहे. काविळचा प्रकोप वाढत असल्याचे लक्षात घेता, जि.प.च्या आरोग्य विभागाने वाडीमध्ये इपॅडेमिक सेल तयार केला आहे. दोन डॉक्टरची तिथे नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर आशा वर्करच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला आहे. ग्रा.पं.ला मेडिक्लोर दिले असून, पाणी उकळून व गाळून पिण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नाल्यातून गेलेल्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी दिली आहे.

आरोग्य यंत्रणा उभी करावीवाडीमध्ये यापूर्वीही साथ रोग पसरला होता. डेंग्यूचे रुग्णही आढळून आले होते. वाडीला नगर परिषदेचा दर्जा मिळाला आहे. पण नगर परिषदेची स्वत:ची आरोग्य यंत्रणा नाही. त्यामुळे दरवेळी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग धावपळ करून आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. वाडीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाल्याने नगर परिषदेने स्वत:ची आरोग्य यंत्रणा उभी करावी, अशी मागणी आरोग्य विभागातर्फे वेळोवेळी करण्यात आली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य