शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

उपराजधानीत काविळसदृश आजाराचे सहा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 11:06 IST

वाडी परिसरातील आंबेडकरनगर वॉर्डामध्ये काविळ पसरला आहे. गेल्या काही दिवसात येथे काविळसदृश आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देवाडीत उद्रेक नगर परिषदेकडे सक्षम आरोग्य यंत्रणाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाडी परिसरातील आंबेडकरनगर वॉर्डामध्ये काविळ पसरला आहे. गेल्या काही दिवसात येथे काविळसदृश आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान तीन वर्षापासून वाडीला नगर परिषद घोषित केल्याने नगर परिषदेकडे आरोग्य यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली आहे.आंबेडकरनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ही नाल्यातून गेली आहे. तसा वाडी परिसराला वेणा जलाशयातून पाणीपुरवठा होतो. गेल्या काही दिवसापासून वेणा जलाशयातून पाणी बंद केले आहे. त्यामुळे टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. टँक रद्वारे होणारा पाणीपुरवठा दूषित असल्याने काविळ परिसरात पसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दूषित पाण्यामुळे गेल्या काही दिवसापासून आजार पसरले असून स्वाती गायकवाड यांना नुकत्याच जुळ्या मुली झाल्या होत्या. तेव्हापासूनच आई आणि दोघी जुळ्या मुली काविळसदृश आजाराने ग्रस्त होत्या.या तिघांचाही मृत्यू काविळने झाल्याचे बोलले जात आहे. काविळचा प्रकोप वाढत असल्याचे लक्षात घेता, जि.प.च्या आरोग्य विभागाने वाडीमध्ये इपॅडेमिक सेल तयार केला आहे. दोन डॉक्टरची तिथे नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर आशा वर्करच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला आहे. ग्रा.पं.ला मेडिक्लोर दिले असून, पाणी उकळून व गाळून पिण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नाल्यातून गेलेल्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी दिली आहे.

आरोग्य यंत्रणा उभी करावीवाडीमध्ये यापूर्वीही साथ रोग पसरला होता. डेंग्यूचे रुग्णही आढळून आले होते. वाडीला नगर परिषदेचा दर्जा मिळाला आहे. पण नगर परिषदेची स्वत:ची आरोग्य यंत्रणा नाही. त्यामुळे दरवेळी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग धावपळ करून आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. वाडीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाल्याने नगर परिषदेने स्वत:ची आरोग्य यंत्रणा उभी करावी, अशी मागणी आरोग्य विभागातर्फे वेळोवेळी करण्यात आली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य