शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

परिस्थिती गंभीर; सर्व सुरळीत होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 01:51 IST

आशावाद । मेलन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक बेईबेई ली यांचे मत

अंकिता देशकर ।

नागपूर : सगळीकडेच एक नैराश्याचे वातावरण आहे आणि बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतोय की आता पुढे काय; पण असे असतानादेखील एक आशेचा किरण कानेर्गी मेलन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक बेईबेई ली यांनी दाखविला आहे. त्यांना असा विश्वास आहे की, गोष्टी आता बºयाच नकारात्मक आहेत आणि बाजारपेठदेखील मंदावली आहे; पण ही परिस्थिती फार काळ राहणार नाही, पुन्हा सगळं सुरळीत सुरू होईल, असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’सोबत विविध विषयांवर चर्चा करीत असताना दाखवला. ‘लोकमत’ने कानेर्गी मेलन युनिव्हर्सिटी (सीएमयू)च्या प्राध्यापक बेईबेई ली यांच्यासोबत चर्चा करताना अमेरिका, भारत आणि चीन यांच्या संबंधांवरदेखील संवाद साधला.

ली म्हणाल्या, लोकांचे पगार कमी होत आहेत, तसेच त्यांच्या नोकºयादेखील चालल्या आहेत, बºयाच मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. बाहेर विद्यार्थ्यांना इंटर्नशिपदेखील मिळत नाही. सगळ्यांनीच या परिस्थितीचे आव्हान स्वीकारावे आणि कौशल्यामध्ये वाढ होईल असे कार्य करावे, नवीन काहीतरी शिकावे. कोरोना महामारीवर ली म्हणाल्या, एखाद्याने अशी अपेक्षा केली असती की, अमेरिकेसारख्या देशाने कोरोना व्हायरसमध्ये परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळायला हवी होती; पण अपेक्षेप्रमाणे काही झाले नाही, त्यामुळे आता सध्याच्या सरकारने यातून एक धडा घ्यायला हवा. त्या म्हणाल्या, इतर देशांच्या तुलनेत चीनने चांगले कामगिरी केली आहे.बरेच देश भारतात गुंतवणूक करतीलच्इतर देश भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्यास इच्छुक असतील का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, भारताकडे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान संस्था आहेत, तसेच आता बरेच स्टार्टअप्स कौतुकास्पद काम करीत आहेत, त्यामुळे बरेच देश भारतात गुंतवणूक करतील, असा विश्वास त्यांना आहे.च्भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल त्या म्हणाल्या, जर भारतातील विद्यापीठांना परदेशी स्वत:चा विस्तार करायचा असेल तर त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यासक्रमात समावेश करून विद्यार्थ्यांना आकर्षित करावे.