शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर दररोज सुरू राहावा सीताबर्डी किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:21 IST

संत्रानगरीतील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला हा केवळ राष्ट्रीय दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच सुरू राहतो. हा ऐतिहासिक वारसा आहे आणि नागपूरकरांची संपत्ती आहे. त्याचा इतिहास मनामनात रुजावा यासाठी हा किल्ला वर्षभर दररोज सुरू राहावा, अशी मागणी पुढे येत आहे.

ठळक मुद्देहेमंत व अर्चना जोशी यांची जनजागृती : पर्यटन वाढण्यास होईल मदत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संत्रानगरीतील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला हा केवळ राष्ट्रीय दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच सुरू राहतो. हा ऐतिहासिक वारसा आहे आणि नागपूरकरांची संपत्ती आहे. त्याचा इतिहास मनामनात रुजावा यासाठी हा किल्ला वर्षभर दररोज सुरू राहावा, अशी मागणी पुढे येत आहे. नागपूरकरांनी ही मागणी लावून धरावी यासाठी डॉ. हेमंत जोशी व अर्चना जोशी जनजागृती अभियान राबवित आहे.सीताबर्डी किल्ल्याचे नाव घेताच आठवते ती किल्ल्याची लढाई. या लढाईला आता २०१ वर्षे पूर्ण होत आहेत. टेकडीवर ईस्ट इंडिया कंपनीच्या २४ व्या रेजिमेंटच्या सैन्याचा डोळा होता. नागपूर जिंकण्यासाठी या टेकडीचे महत्त्व लक्षात घेता, इंग्रज अधिकाऱ्यांनी २५ नोव्हेंबर १८१७ रोजी युद्धाला सुरुवात केली. राजे आप्पासाहेब भोसले यांनी युद्धात नेतृत्व करीत होते. त्यांच्या सैन्याने तीन दिवस ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याशी कडवी झुंज दिली. मात्र इंग्रजांसमोर त्यांना पराभव पत्करावा लागला. लढाईनंतर ही टेकडी इंग्रज लष्कराच्या ताब्यात गेली आणि भारतात खऱ्या अर्थाने ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली. ब्रिटिशांनी टेकडीवर असलेल्या आऊटपोस्टच्या ठिकाणी जानेवारी १८२२ मध्ये किल्ल्याची तटबंदी पूर्ण केली. स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १० एप्रिल ते १५ मे १९२३ या काळात या किल्ल्यातील तुरुंगात डांबून ठेवले होते. १८५७ च्या क्रांतीमध्ये सहभागी टिपू सुलतान यांचे नातू नवाब कादर अली व त्यांच्या आठ सहकाऱ्यांना इंग्रजांनी येथे फाशी दिली होती. सध्या हा किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात असून येथे ११८ इन्फन्ट्री बटालियन (प्रादेशिक सेना) ग्रेनेडियर्सचे वास्तव्य आहे. सैन्याने या सर्व आठवणी सांभाळून ठेवल्या आहेत.सीताबर्डी किल्ल्यावर मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाचे म्युझियम व्हावे, युद्धस्मारक तयार व्हावे. दिल्लीचा लाल किल्ला, पुण्याचा शनिवार वाडा, ग्वाल्हेर, हैद्राबादचा किल्ला अशा सगळीकडे किल्ला रोज बघता येतो. तेथील किल्ल्यावर साऊंड आणि लाईट शो च्या माध्यमातून, ऐतिहासिक गोष्टींवर प्रकाश टाकला जातो तसा सीताबर्डी किल्ल्यावर व्हावा. त्यामुळे नागपूरचे पर्यटन वाढेल, असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. किल्ल्याचा परिसर हा ८७० एकरामध्ये पसरला आहे. एवढ्या परिसरात बटालियनचे केवळ १०-१२ जवान तैनात आहेत. सामान्यांसाठी दररोज किल्ला खुला झाला तर दररोज फिरता येईल आणि इतिहास जाणता येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यासाठी शहरातील नागरिकांनी ही मागणी लावून धरावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Fortगडnagpurनागपूर