शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

वर्षभर दररोज सुरू राहावा सीताबर्डी किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:21 IST

संत्रानगरीतील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला हा केवळ राष्ट्रीय दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच सुरू राहतो. हा ऐतिहासिक वारसा आहे आणि नागपूरकरांची संपत्ती आहे. त्याचा इतिहास मनामनात रुजावा यासाठी हा किल्ला वर्षभर दररोज सुरू राहावा, अशी मागणी पुढे येत आहे.

ठळक मुद्देहेमंत व अर्चना जोशी यांची जनजागृती : पर्यटन वाढण्यास होईल मदत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संत्रानगरीतील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला हा केवळ राष्ट्रीय दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच सुरू राहतो. हा ऐतिहासिक वारसा आहे आणि नागपूरकरांची संपत्ती आहे. त्याचा इतिहास मनामनात रुजावा यासाठी हा किल्ला वर्षभर दररोज सुरू राहावा, अशी मागणी पुढे येत आहे. नागपूरकरांनी ही मागणी लावून धरावी यासाठी डॉ. हेमंत जोशी व अर्चना जोशी जनजागृती अभियान राबवित आहे.सीताबर्डी किल्ल्याचे नाव घेताच आठवते ती किल्ल्याची लढाई. या लढाईला आता २०१ वर्षे पूर्ण होत आहेत. टेकडीवर ईस्ट इंडिया कंपनीच्या २४ व्या रेजिमेंटच्या सैन्याचा डोळा होता. नागपूर जिंकण्यासाठी या टेकडीचे महत्त्व लक्षात घेता, इंग्रज अधिकाऱ्यांनी २५ नोव्हेंबर १८१७ रोजी युद्धाला सुरुवात केली. राजे आप्पासाहेब भोसले यांनी युद्धात नेतृत्व करीत होते. त्यांच्या सैन्याने तीन दिवस ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याशी कडवी झुंज दिली. मात्र इंग्रजांसमोर त्यांना पराभव पत्करावा लागला. लढाईनंतर ही टेकडी इंग्रज लष्कराच्या ताब्यात गेली आणि भारतात खऱ्या अर्थाने ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली. ब्रिटिशांनी टेकडीवर असलेल्या आऊटपोस्टच्या ठिकाणी जानेवारी १८२२ मध्ये किल्ल्याची तटबंदी पूर्ण केली. स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १० एप्रिल ते १५ मे १९२३ या काळात या किल्ल्यातील तुरुंगात डांबून ठेवले होते. १८५७ च्या क्रांतीमध्ये सहभागी टिपू सुलतान यांचे नातू नवाब कादर अली व त्यांच्या आठ सहकाऱ्यांना इंग्रजांनी येथे फाशी दिली होती. सध्या हा किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात असून येथे ११८ इन्फन्ट्री बटालियन (प्रादेशिक सेना) ग्रेनेडियर्सचे वास्तव्य आहे. सैन्याने या सर्व आठवणी सांभाळून ठेवल्या आहेत.सीताबर्डी किल्ल्यावर मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाचे म्युझियम व्हावे, युद्धस्मारक तयार व्हावे. दिल्लीचा लाल किल्ला, पुण्याचा शनिवार वाडा, ग्वाल्हेर, हैद्राबादचा किल्ला अशा सगळीकडे किल्ला रोज बघता येतो. तेथील किल्ल्यावर साऊंड आणि लाईट शो च्या माध्यमातून, ऐतिहासिक गोष्टींवर प्रकाश टाकला जातो तसा सीताबर्डी किल्ल्यावर व्हावा. त्यामुळे नागपूरचे पर्यटन वाढेल, असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. किल्ल्याचा परिसर हा ८७० एकरामध्ये पसरला आहे. एवढ्या परिसरात बटालियनचे केवळ १०-१२ जवान तैनात आहेत. सामान्यांसाठी दररोज किल्ला खुला झाला तर दररोज फिरता येईल आणि इतिहास जाणता येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यासाठी शहरातील नागरिकांनी ही मागणी लावून धरावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Fortगडnagpurनागपूर