शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर दररोज सुरू राहावा सीताबर्डी किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:21 IST

संत्रानगरीतील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला हा केवळ राष्ट्रीय दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच सुरू राहतो. हा ऐतिहासिक वारसा आहे आणि नागपूरकरांची संपत्ती आहे. त्याचा इतिहास मनामनात रुजावा यासाठी हा किल्ला वर्षभर दररोज सुरू राहावा, अशी मागणी पुढे येत आहे.

ठळक मुद्देहेमंत व अर्चना जोशी यांची जनजागृती : पर्यटन वाढण्यास होईल मदत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संत्रानगरीतील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला हा केवळ राष्ट्रीय दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच सुरू राहतो. हा ऐतिहासिक वारसा आहे आणि नागपूरकरांची संपत्ती आहे. त्याचा इतिहास मनामनात रुजावा यासाठी हा किल्ला वर्षभर दररोज सुरू राहावा, अशी मागणी पुढे येत आहे. नागपूरकरांनी ही मागणी लावून धरावी यासाठी डॉ. हेमंत जोशी व अर्चना जोशी जनजागृती अभियान राबवित आहे.सीताबर्डी किल्ल्याचे नाव घेताच आठवते ती किल्ल्याची लढाई. या लढाईला आता २०१ वर्षे पूर्ण होत आहेत. टेकडीवर ईस्ट इंडिया कंपनीच्या २४ व्या रेजिमेंटच्या सैन्याचा डोळा होता. नागपूर जिंकण्यासाठी या टेकडीचे महत्त्व लक्षात घेता, इंग्रज अधिकाऱ्यांनी २५ नोव्हेंबर १८१७ रोजी युद्धाला सुरुवात केली. राजे आप्पासाहेब भोसले यांनी युद्धात नेतृत्व करीत होते. त्यांच्या सैन्याने तीन दिवस ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याशी कडवी झुंज दिली. मात्र इंग्रजांसमोर त्यांना पराभव पत्करावा लागला. लढाईनंतर ही टेकडी इंग्रज लष्कराच्या ताब्यात गेली आणि भारतात खऱ्या अर्थाने ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली. ब्रिटिशांनी टेकडीवर असलेल्या आऊटपोस्टच्या ठिकाणी जानेवारी १८२२ मध्ये किल्ल्याची तटबंदी पूर्ण केली. स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १० एप्रिल ते १५ मे १९२३ या काळात या किल्ल्यातील तुरुंगात डांबून ठेवले होते. १८५७ च्या क्रांतीमध्ये सहभागी टिपू सुलतान यांचे नातू नवाब कादर अली व त्यांच्या आठ सहकाऱ्यांना इंग्रजांनी येथे फाशी दिली होती. सध्या हा किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात असून येथे ११८ इन्फन्ट्री बटालियन (प्रादेशिक सेना) ग्रेनेडियर्सचे वास्तव्य आहे. सैन्याने या सर्व आठवणी सांभाळून ठेवल्या आहेत.सीताबर्डी किल्ल्यावर मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाचे म्युझियम व्हावे, युद्धस्मारक तयार व्हावे. दिल्लीचा लाल किल्ला, पुण्याचा शनिवार वाडा, ग्वाल्हेर, हैद्राबादचा किल्ला अशा सगळीकडे किल्ला रोज बघता येतो. तेथील किल्ल्यावर साऊंड आणि लाईट शो च्या माध्यमातून, ऐतिहासिक गोष्टींवर प्रकाश टाकला जातो तसा सीताबर्डी किल्ल्यावर व्हावा. त्यामुळे नागपूरचे पर्यटन वाढेल, असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. किल्ल्याचा परिसर हा ८७० एकरामध्ये पसरला आहे. एवढ्या परिसरात बटालियनचे केवळ १०-१२ जवान तैनात आहेत. सामान्यांसाठी दररोज किल्ला खुला झाला तर दररोज फिरता येईल आणि इतिहास जाणता येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यासाठी शहरातील नागरिकांनी ही मागणी लावून धरावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Fortगडnagpurनागपूर