शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
3
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
4
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
6
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
7
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
8
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
9
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
10
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
11
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
12
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
13
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
14
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
15
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
16
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
17
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
18
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
19
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
20
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार

भावाने कापला बहिणीचा गळा

By admin | Updated: August 18, 2016 02:19 IST

मोबाईलवर बोलत असल्याने संतापलेल्या भावाने आपल्या बहिणीचा चाकूने गळा कापला. ही घटना पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील कडबी चौकात घडली.

आरोपी भावाला अटक : तातडीने उपचार मिळाल्याने वाचला जीव नागपूर : मोबाईलवर बोलत असल्याने संतापलेल्या भावाने आपल्या बहिणीचा चाकूने गळा कापला. ही घटना पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील कडबी चौकात घडली. रक्षाबंधनाच्या एक दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जखमी तरुणीला तातडीने उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला. मिताली रणवीर चौहान (३०) असे जखमी बहिणीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी ३७ वर्षीय भाऊ राजेश उर्फ ऋत्वीज चौहान याला अटक केली आहे. मितालीचे कुटुंबीय कडबी चौकातील प्रियदर्शिनी अपार्टमेंटमध्ये राहतात. कुटुंबात आई-वडील, भाऊ राजेश उर्फ ऋत्वीज, लहान बहीण चिन्मयी आहेत. वडील रणवीर हे आकाशवाणीतून सेवानिवृत्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चौहान यांच्या घरी नेहमीच भांडण होत होते. काही दिवसांपासून मिताली खूप त्रासली होती. चौहान कुटुंबांची शेजाऱ्यांसोबतही जास्त बोलचाल नव्हती. त्यामुळे शेजारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. पोलीस सूत्रानुसार बुधवारी सकाळी राजेश उर्फ ऋत्वीज आणि मिताली यांच्यात नेहमीप्रमाणे वाद झाला. मितालीने ऋत्वीजला आंघोळ करण्याचा आणि स्वच्छतेने राहण्याचा सल्ला दिला. यावर ‘तू मला ज्या दिवशी नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी घेऊन गेली होती. तेव्हापासूनच माझी प्रकृती बरोबर राहत नसल्याचे म्हणत’ तो वाद घालू लागला. यापूर्वीही त्याने अनेकदा ‘बेडरूममध्ये मोबाईलवर कुणाशी बोलत असते’, असे म्हणत मितालीशी वाद घातला होता. मोबाईलवरून ऋत्वीजने पुन्हा प्रश्न उपस्थित केल्याने मिताली त्याला समजावू लागली. दरम्यान संतापलेल्या राजेशने भाजी कापण्याच्या चाकूने मितालीच्या गळ्यावर वार केला. मितालीची आरडाओरड ऐकून शेजारी त्यांच्या फ्लॅटमध्ये पाहोचले. मितालीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून शेजाऱ्यांनी लगेच पाचपावली पोलिसांना सूचना दिली. डीसीपी अभिनाश कुमार, ठाणेदार राजू बहादुरे, महिला पीएसआय एम.एम. मोकाशे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मितालीला अगोदर खासगी रुग्णालयात नेले त्यानंतर मेयो रुग्णालयात स्थानांतरित करण्यात आले. पोलिसांनी ऋत्वीजला लगेच अटक केली. पकडल्या गेल्यावर तो वेड्यासारखे वर्तन करू लगला. त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे कुु टुंबीयांचे म्हणणे आहे. मितालीचे कुटुंब चार वर्षांपूर्वीच प्रियदर्शनी अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते. ते येथे भाड्याने राहत होते. त्यांच्या घराचे दार नेहमीच बंद राहायचे. कुणी भेटायला आला तर दरवाजा उघडायलासुद्धा खूप वेळ लावायचे. मिताली आणि तिच्या बहिणीला कुणाशीही बोलू दिले जात नव्हते. (प्रतिनिधी) जीवाला धोका असल्याची होती जाणीव मितालीला तिच्या जीवाला धोका असल्याची जाणीव होती. ऋत्वीजने तिचा गळा आवळल्याचे तिने शेजाऱ्यांना सांगितले होते. ऋत्वीजकडून तिच्या जीवाला धोका असल्याचेही सांगत शेजाऱ्यांना मदत करण्याची विनंतीसुद्धा केली होती. दोन दिवसांपूर्वीच वाचला जीव असेही संगितले जाते की, मितालीने दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्येचा प्रयत्न करीत असताना तिने एक पाय बालकनीतून बाहेर काढला होता, त्याचवेळी शेजाऱ्यांनी तिला पकडून वाचविले होते.