शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

भावाने कापला बहिणीचा गळा

By admin | Updated: August 18, 2016 02:19 IST

मोबाईलवर बोलत असल्याने संतापलेल्या भावाने आपल्या बहिणीचा चाकूने गळा कापला. ही घटना पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील कडबी चौकात घडली.

आरोपी भावाला अटक : तातडीने उपचार मिळाल्याने वाचला जीव नागपूर : मोबाईलवर बोलत असल्याने संतापलेल्या भावाने आपल्या बहिणीचा चाकूने गळा कापला. ही घटना पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील कडबी चौकात घडली. रक्षाबंधनाच्या एक दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जखमी तरुणीला तातडीने उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला. मिताली रणवीर चौहान (३०) असे जखमी बहिणीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी ३७ वर्षीय भाऊ राजेश उर्फ ऋत्वीज चौहान याला अटक केली आहे. मितालीचे कुटुंबीय कडबी चौकातील प्रियदर्शिनी अपार्टमेंटमध्ये राहतात. कुटुंबात आई-वडील, भाऊ राजेश उर्फ ऋत्वीज, लहान बहीण चिन्मयी आहेत. वडील रणवीर हे आकाशवाणीतून सेवानिवृत्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चौहान यांच्या घरी नेहमीच भांडण होत होते. काही दिवसांपासून मिताली खूप त्रासली होती. चौहान कुटुंबांची शेजाऱ्यांसोबतही जास्त बोलचाल नव्हती. त्यामुळे शेजारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. पोलीस सूत्रानुसार बुधवारी सकाळी राजेश उर्फ ऋत्वीज आणि मिताली यांच्यात नेहमीप्रमाणे वाद झाला. मितालीने ऋत्वीजला आंघोळ करण्याचा आणि स्वच्छतेने राहण्याचा सल्ला दिला. यावर ‘तू मला ज्या दिवशी नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी घेऊन गेली होती. तेव्हापासूनच माझी प्रकृती बरोबर राहत नसल्याचे म्हणत’ तो वाद घालू लागला. यापूर्वीही त्याने अनेकदा ‘बेडरूममध्ये मोबाईलवर कुणाशी बोलत असते’, असे म्हणत मितालीशी वाद घातला होता. मोबाईलवरून ऋत्वीजने पुन्हा प्रश्न उपस्थित केल्याने मिताली त्याला समजावू लागली. दरम्यान संतापलेल्या राजेशने भाजी कापण्याच्या चाकूने मितालीच्या गळ्यावर वार केला. मितालीची आरडाओरड ऐकून शेजारी त्यांच्या फ्लॅटमध्ये पाहोचले. मितालीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून शेजाऱ्यांनी लगेच पाचपावली पोलिसांना सूचना दिली. डीसीपी अभिनाश कुमार, ठाणेदार राजू बहादुरे, महिला पीएसआय एम.एम. मोकाशे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मितालीला अगोदर खासगी रुग्णालयात नेले त्यानंतर मेयो रुग्णालयात स्थानांतरित करण्यात आले. पोलिसांनी ऋत्वीजला लगेच अटक केली. पकडल्या गेल्यावर तो वेड्यासारखे वर्तन करू लगला. त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे कुु टुंबीयांचे म्हणणे आहे. मितालीचे कुटुंब चार वर्षांपूर्वीच प्रियदर्शनी अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते. ते येथे भाड्याने राहत होते. त्यांच्या घराचे दार नेहमीच बंद राहायचे. कुणी भेटायला आला तर दरवाजा उघडायलासुद्धा खूप वेळ लावायचे. मिताली आणि तिच्या बहिणीला कुणाशीही बोलू दिले जात नव्हते. (प्रतिनिधी) जीवाला धोका असल्याची होती जाणीव मितालीला तिच्या जीवाला धोका असल्याची जाणीव होती. ऋत्वीजने तिचा गळा आवळल्याचे तिने शेजाऱ्यांना सांगितले होते. ऋत्वीजकडून तिच्या जीवाला धोका असल्याचेही सांगत शेजाऱ्यांना मदत करण्याची विनंतीसुद्धा केली होती. दोन दिवसांपूर्वीच वाचला जीव असेही संगितले जाते की, मितालीने दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्येचा प्रयत्न करीत असताना तिने एक पाय बालकनीतून बाहेर काढला होता, त्याचवेळी शेजाऱ्यांनी तिला पकडून वाचविले होते.