शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

भावाने कापला बहिणीचा गळा

By admin | Updated: August 18, 2016 02:19 IST

मोबाईलवर बोलत असल्याने संतापलेल्या भावाने आपल्या बहिणीचा चाकूने गळा कापला. ही घटना पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील कडबी चौकात घडली.

आरोपी भावाला अटक : तातडीने उपचार मिळाल्याने वाचला जीव नागपूर : मोबाईलवर बोलत असल्याने संतापलेल्या भावाने आपल्या बहिणीचा चाकूने गळा कापला. ही घटना पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील कडबी चौकात घडली. रक्षाबंधनाच्या एक दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जखमी तरुणीला तातडीने उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला. मिताली रणवीर चौहान (३०) असे जखमी बहिणीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी ३७ वर्षीय भाऊ राजेश उर्फ ऋत्वीज चौहान याला अटक केली आहे. मितालीचे कुटुंबीय कडबी चौकातील प्रियदर्शिनी अपार्टमेंटमध्ये राहतात. कुटुंबात आई-वडील, भाऊ राजेश उर्फ ऋत्वीज, लहान बहीण चिन्मयी आहेत. वडील रणवीर हे आकाशवाणीतून सेवानिवृत्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चौहान यांच्या घरी नेहमीच भांडण होत होते. काही दिवसांपासून मिताली खूप त्रासली होती. चौहान कुटुंबांची शेजाऱ्यांसोबतही जास्त बोलचाल नव्हती. त्यामुळे शेजारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. पोलीस सूत्रानुसार बुधवारी सकाळी राजेश उर्फ ऋत्वीज आणि मिताली यांच्यात नेहमीप्रमाणे वाद झाला. मितालीने ऋत्वीजला आंघोळ करण्याचा आणि स्वच्छतेने राहण्याचा सल्ला दिला. यावर ‘तू मला ज्या दिवशी नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी घेऊन गेली होती. तेव्हापासूनच माझी प्रकृती बरोबर राहत नसल्याचे म्हणत’ तो वाद घालू लागला. यापूर्वीही त्याने अनेकदा ‘बेडरूममध्ये मोबाईलवर कुणाशी बोलत असते’, असे म्हणत मितालीशी वाद घातला होता. मोबाईलवरून ऋत्वीजने पुन्हा प्रश्न उपस्थित केल्याने मिताली त्याला समजावू लागली. दरम्यान संतापलेल्या राजेशने भाजी कापण्याच्या चाकूने मितालीच्या गळ्यावर वार केला. मितालीची आरडाओरड ऐकून शेजारी त्यांच्या फ्लॅटमध्ये पाहोचले. मितालीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून शेजाऱ्यांनी लगेच पाचपावली पोलिसांना सूचना दिली. डीसीपी अभिनाश कुमार, ठाणेदार राजू बहादुरे, महिला पीएसआय एम.एम. मोकाशे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मितालीला अगोदर खासगी रुग्णालयात नेले त्यानंतर मेयो रुग्णालयात स्थानांतरित करण्यात आले. पोलिसांनी ऋत्वीजला लगेच अटक केली. पकडल्या गेल्यावर तो वेड्यासारखे वर्तन करू लगला. त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे कुु टुंबीयांचे म्हणणे आहे. मितालीचे कुटुंब चार वर्षांपूर्वीच प्रियदर्शनी अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते. ते येथे भाड्याने राहत होते. त्यांच्या घराचे दार नेहमीच बंद राहायचे. कुणी भेटायला आला तर दरवाजा उघडायलासुद्धा खूप वेळ लावायचे. मिताली आणि तिच्या बहिणीला कुणाशीही बोलू दिले जात नव्हते. (प्रतिनिधी) जीवाला धोका असल्याची होती जाणीव मितालीला तिच्या जीवाला धोका असल्याची जाणीव होती. ऋत्वीजने तिचा गळा आवळल्याचे तिने शेजाऱ्यांना सांगितले होते. ऋत्वीजकडून तिच्या जीवाला धोका असल्याचेही सांगत शेजाऱ्यांना मदत करण्याची विनंतीसुद्धा केली होती. दोन दिवसांपूर्वीच वाचला जीव असेही संगितले जाते की, मितालीने दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्येचा प्रयत्न करीत असताना तिने एक पाय बालकनीतून बाहेर काढला होता, त्याचवेळी शेजाऱ्यांनी तिला पकडून वाचविले होते.