शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

मुख्यमंत्री महोदय, पंतप्रधानांकडे चला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:14 IST

बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या नेतृत्वात महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची मागणी मान्य केली होती. त्यानुसार असे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे, अशी विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देअभिजात दर्जा : अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने पाठविले स्मरणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या नेतृत्वात महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची मागणी मान्य केली होती. त्यानुसार असे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे, अशी विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. यासोबतच शासनाकडे गेली ८४ वर्षे प्रलंबित असलेल्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या मागणीबाबत शासनाने प्रथमच सक्रियता दर्शवली आहे. आधीच ८४ वर्षे विलंब झालेल्या या मागणीच्या सकारात्मक पूर्तीसाठी शासनाने अधिक वेळ न घालवता त्वरित अशासकीय सदस्यांचा समावेश असलेली एक उच्चाधिकार समिती त्या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी नेमावी अशीही विनंती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रात केली आहे.महामंडळाच्या स्थापनेपासून आजवर शासनाकडे प्रलंबित अनेक ठराव, मागण्या , सूचना इ.संबंधाने प्रत्यक्षात काही कृती शासनाने करावी व त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावा, अशी मागणीही महामंडळाने केली होती. तिलाही मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत महिनाभरात अशी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याचेही स्मरण करून देत अशी बैठक उशिरात उशिरा ३० मार्चपूर्वी आयोजित करण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.... तर बेळगाववासीयांसोबत देणार धरणेसंमेलन समारोपप्रसंगी बेळगाववासीयांच्या संवेदनशील भावना प्रकट झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री यावर तोडगा काढतील, यावर आमचा विश्वास आहे. बैठक होईस्तो धीर धरू व महिनाभरात अशी बैठक न झाल्यास बेळगाववासी धरणे धरणार असल्यास आपणही त्यांच्यासोबत असू याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य