शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुख्यमंत्री महोदय, पंतप्रधानांकडे चला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:14 IST

बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या नेतृत्वात महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची मागणी मान्य केली होती. त्यानुसार असे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे, अशी विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देअभिजात दर्जा : अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने पाठविले स्मरणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या नेतृत्वात महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची मागणी मान्य केली होती. त्यानुसार असे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे, अशी विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. यासोबतच शासनाकडे गेली ८४ वर्षे प्रलंबित असलेल्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या मागणीबाबत शासनाने प्रथमच सक्रियता दर्शवली आहे. आधीच ८४ वर्षे विलंब झालेल्या या मागणीच्या सकारात्मक पूर्तीसाठी शासनाने अधिक वेळ न घालवता त्वरित अशासकीय सदस्यांचा समावेश असलेली एक उच्चाधिकार समिती त्या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी नेमावी अशीही विनंती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रात केली आहे.महामंडळाच्या स्थापनेपासून आजवर शासनाकडे प्रलंबित अनेक ठराव, मागण्या , सूचना इ.संबंधाने प्रत्यक्षात काही कृती शासनाने करावी व त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावा, अशी मागणीही महामंडळाने केली होती. तिलाही मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत महिनाभरात अशी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याचेही स्मरण करून देत अशी बैठक उशिरात उशिरा ३० मार्चपूर्वी आयोजित करण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.... तर बेळगाववासीयांसोबत देणार धरणेसंमेलन समारोपप्रसंगी बेळगाववासीयांच्या संवेदनशील भावना प्रकट झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री यावर तोडगा काढतील, यावर आमचा विश्वास आहे. बैठक होईस्तो धीर धरू व महिनाभरात अशी बैठक न झाल्यास बेळगाववासी धरणे धरणार असल्यास आपणही त्यांच्यासोबत असू याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य