शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, घात गेल्यावर बात करणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : साधारणत: महिनाभरापूर्वीच सोयाबीन, धान या पिकांकरिता महाबीज बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आता ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : साधारणत: महिनाभरापूर्वीच सोयाबीन, धान या पिकांकरिता महाबीज बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आता आभाळ गडबड करीत आहे. इकडे पाऊस बरसला की तिकडे शेतकरी पेरते होतील. दिवस कमी. पूर्वमशागतीच्या अखेरच्या टप्प्यात वेळही कमी. अशा अटीतटीच्या नेमक्या वेळीच नोंदणी केलेली बियाणे हातात नाहीत. या संपूर्ण अव्यवस्थेमुळे हतबल होत मोठ्या काकुळतीने ‘साहेब, घात गेल्यावर बात करणार काय?’ असा संतापजनक सवालच शेतकरी महाबीज महामंडळास करताना दिसत आहेत.

महाबीज बीजोत्पादन योजना शासनाचा उपक्रम असल्याने फसवणुकीचा गोरखधंदा अजिबात नसतो. अशी खात्री शेतकऱ्यांना असल्याने असंख्य शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करीत असतात. शिवाय, प्रमाणित बियाणे रास्त दरात उपलब्ध होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा कल महाबीज बियाण्यांकडे दिसून येतो. मागील काही वर्षांत मात्र सोयाबीनबाबत शेतकऱ्यांची उदासीनता दिसून येत आहे. अशातही अनेक शेतकऱ्यांची बीजोत्पादनासाठी नोंदणी झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील एकूण ३२५ शेतकऱ्यांनी महाबीज बीजोत्पादन आरक्षण योजनेत नोंदणी केली आहे. एकूण १,१४४ हेक्टरसाठी ही नोंदणी झाली असून, यामध्ये सोयाबीन ९५८ हेक्टर, धान १४३ तर तूर केवळ ४३ हेक्टरसाठी मागणी झाली असल्याची बाब महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक गणेश चिरुटकर यांनी सांगितली. बियाणे येणे सुरू असून, लवकरच वितरणाचेही काम ताबडतोब करीत आहोत, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील एकूण ३५ वितरकांच्या माध्यमातून सबवितरकाकडे बियाण्यांचा पुरवठा करण्याचे नियोजन पूर्णत्वास आले असून, कृषी केंद्रासाठी ६,६३० क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली.

....

नोंदणी अधिक, मिळणार किती?

शेतकऱ्यांनी बीजोत्पादन योजनेत प्रति बॅग १०० रुपये याप्रमाणे नोंदणी शुल्काचा भरणा करीत बियाणे नोंदविले आहे. आता ऐनवेळी बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध असून, नोंदणी केलेल्यांपैकी अर्ध्या बियाण्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जाईल, असे महाबीजचे अधिकारी शेतकऱ्यांना सांगत आहेत. आधीच विलंब होत आहे. त्यात आता बियाणे कमी मिळत असल्याने आम्ही निराश आणि हताश झालो आहोत, अशी कैफियत रवी मलवंडे, दिवाकर मस्की, माधव राऊत, पुंडलिक पलांदूरकर, रामाजी शहारे, मंगेश नवघरे, अनिकेत भोयर, प्रवीण नवघरे, लक्ष्मण चौधरी आदींनी मांडली आहे.

.....

पोहोचता का नाही?

बी-बियाणे, खते बांधापर्यंत पोहोचवून देण्याचे धोरण महाआघाडी शासनाचे आहे. अशातच आता पेरणीचा हंगाम अगदी जवळ असताना अद्याप बियाण्यांचा पत्ता नाही. शिवाय, मागील वर्षापासून महामंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे पोहोचवून देत नाही. शेतकरी स्वत: स्वखर्चातून नागपूर येथील महामंडळाच्या गोदामातून बियाणे घेऊन जातात. हा अधिकचा भुर्दंड शेतकऱ्यांवर बसतो. आतापर्यंत गावात पाेहोचता होत असताना मागील वर्षापासून धोरण बदलविण्याचे कारण काय, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे.