शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

साहेब, घात गेल्यावर बात करणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : साधारणत: महिनाभरापूर्वीच सोयाबीन, धान या पिकांकरिता महाबीज बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आता ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : साधारणत: महिनाभरापूर्वीच सोयाबीन, धान या पिकांकरिता महाबीज बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आता आभाळ गडबड करीत आहे. इकडे पाऊस बरसला की तिकडे शेतकरी पेरते होतील. दिवस कमी. पूर्वमशागतीच्या अखेरच्या टप्प्यात वेळही कमी. अशा अटीतटीच्या नेमक्या वेळीच नोंदणी केलेली बियाणे हातात नाहीत. या संपूर्ण अव्यवस्थेमुळे हतबल होत मोठ्या काकुळतीने ‘साहेब, घात गेल्यावर बात करणार काय?’ असा संतापजनक सवालच शेतकरी महाबीज महामंडळास करताना दिसत आहेत.

महाबीज बीजोत्पादन योजना शासनाचा उपक्रम असल्याने फसवणुकीचा गोरखधंदा अजिबात नसतो. अशी खात्री शेतकऱ्यांना असल्याने असंख्य शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करीत असतात. शिवाय, प्रमाणित बियाणे रास्त दरात उपलब्ध होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा कल महाबीज बियाण्यांकडे दिसून येतो. मागील काही वर्षांत मात्र सोयाबीनबाबत शेतकऱ्यांची उदासीनता दिसून येत आहे. अशातही अनेक शेतकऱ्यांची बीजोत्पादनासाठी नोंदणी झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील एकूण ३२५ शेतकऱ्यांनी महाबीज बीजोत्पादन आरक्षण योजनेत नोंदणी केली आहे. एकूण १,१४४ हेक्टरसाठी ही नोंदणी झाली असून, यामध्ये सोयाबीन ९५८ हेक्टर, धान १४३ तर तूर केवळ ४३ हेक्टरसाठी मागणी झाली असल्याची बाब महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक गणेश चिरुटकर यांनी सांगितली. बियाणे येणे सुरू असून, लवकरच वितरणाचेही काम ताबडतोब करीत आहोत, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील एकूण ३५ वितरकांच्या माध्यमातून सबवितरकाकडे बियाण्यांचा पुरवठा करण्याचे नियोजन पूर्णत्वास आले असून, कृषी केंद्रासाठी ६,६३० क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली.

....

नोंदणी अधिक, मिळणार किती?

शेतकऱ्यांनी बीजोत्पादन योजनेत प्रति बॅग १०० रुपये याप्रमाणे नोंदणी शुल्काचा भरणा करीत बियाणे नोंदविले आहे. आता ऐनवेळी बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध असून, नोंदणी केलेल्यांपैकी अर्ध्या बियाण्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जाईल, असे महाबीजचे अधिकारी शेतकऱ्यांना सांगत आहेत. आधीच विलंब होत आहे. त्यात आता बियाणे कमी मिळत असल्याने आम्ही निराश आणि हताश झालो आहोत, अशी कैफियत रवी मलवंडे, दिवाकर मस्की, माधव राऊत, पुंडलिक पलांदूरकर, रामाजी शहारे, मंगेश नवघरे, अनिकेत भोयर, प्रवीण नवघरे, लक्ष्मण चौधरी आदींनी मांडली आहे.

.....

पोहोचता का नाही?

बी-बियाणे, खते बांधापर्यंत पोहोचवून देण्याचे धोरण महाआघाडी शासनाचे आहे. अशातच आता पेरणीचा हंगाम अगदी जवळ असताना अद्याप बियाण्यांचा पत्ता नाही. शिवाय, मागील वर्षापासून महामंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे पोहोचवून देत नाही. शेतकरी स्वत: स्वखर्चातून नागपूर येथील महामंडळाच्या गोदामातून बियाणे घेऊन जातात. हा अधिकचा भुर्दंड शेतकऱ्यांवर बसतो. आतापर्यंत गावात पाेहोचता होत असताना मागील वर्षापासून धोरण बदलविण्याचे कारण काय, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे.