शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

साहेब, घात गेल्यावर बात करणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : साधारणत: महिनाभरापूर्वीच सोयाबीन, धान या पिकांकरिता महाबीज बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आता ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : साधारणत: महिनाभरापूर्वीच सोयाबीन, धान या पिकांकरिता महाबीज बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आता आभाळ गडबड करीत आहे. इकडे पाऊस बरसला की तिकडे शेतकरी पेरते होतील. दिवस कमी. पूर्वमशागतीच्या अखेरच्या टप्प्यात वेळही कमी. अशा अटीतटीच्या नेमक्या वेळीच नोंदणी केलेली बियाणे हातात नाहीत. या संपूर्ण अव्यवस्थेमुळे हतबल होत मोठ्या काकुळतीने ‘साहेब, घात गेल्यावर बात करणार काय?’ असा संतापजनक सवालच शेतकरी महाबीज महामंडळास करताना दिसत आहेत.

महाबीज बीजोत्पादन योजना शासनाचा उपक्रम असल्याने फसवणुकीचा गोरखधंदा अजिबात नसतो. अशी खात्री शेतकऱ्यांना असल्याने असंख्य शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करीत असतात. शिवाय, प्रमाणित बियाणे रास्त दरात उपलब्ध होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा कल महाबीज बियाण्यांकडे दिसून येतो. मागील काही वर्षांत मात्र सोयाबीनबाबत शेतकऱ्यांची उदासीनता दिसून येत आहे. अशातही अनेक शेतकऱ्यांची बीजोत्पादनासाठी नोंदणी झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील एकूण ३२५ शेतकऱ्यांनी महाबीज बीजोत्पादन आरक्षण योजनेत नोंदणी केली आहे. एकूण १,१४४ हेक्टरसाठी ही नोंदणी झाली असून, यामध्ये सोयाबीन ९५८ हेक्टर, धान १४३ तर तूर केवळ ४३ हेक्टरसाठी मागणी झाली असल्याची बाब महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक गणेश चिरुटकर यांनी सांगितली. बियाणे येणे सुरू असून, लवकरच वितरणाचेही काम ताबडतोब करीत आहोत, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील एकूण ३५ वितरकांच्या माध्यमातून सबवितरकाकडे बियाण्यांचा पुरवठा करण्याचे नियोजन पूर्णत्वास आले असून, कृषी केंद्रासाठी ६,६३० क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली.

....

नोंदणी अधिक, मिळणार किती?

शेतकऱ्यांनी बीजोत्पादन योजनेत प्रति बॅग १०० रुपये याप्रमाणे नोंदणी शुल्काचा भरणा करीत बियाणे नोंदविले आहे. आता ऐनवेळी बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध असून, नोंदणी केलेल्यांपैकी अर्ध्या बियाण्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जाईल, असे महाबीजचे अधिकारी शेतकऱ्यांना सांगत आहेत. आधीच विलंब होत आहे. त्यात आता बियाणे कमी मिळत असल्याने आम्ही निराश आणि हताश झालो आहोत, अशी कैफियत रवी मलवंडे, दिवाकर मस्की, माधव राऊत, पुंडलिक पलांदूरकर, रामाजी शहारे, मंगेश नवघरे, अनिकेत भोयर, प्रवीण नवघरे, लक्ष्मण चौधरी आदींनी मांडली आहे.

.....

पोहोचता का नाही?

बी-बियाणे, खते बांधापर्यंत पोहोचवून देण्याचे धोरण महाआघाडी शासनाचे आहे. अशातच आता पेरणीचा हंगाम अगदी जवळ असताना अद्याप बियाण्यांचा पत्ता नाही. शिवाय, मागील वर्षापासून महामंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे पोहोचवून देत नाही. शेतकरी स्वत: स्वखर्चातून नागपूर येथील महामंडळाच्या गोदामातून बियाणे घेऊन जातात. हा अधिकचा भुर्दंड शेतकऱ्यांवर बसतो. आतापर्यंत गावात पाेहोचता होत असताना मागील वर्षापासून धोरण बदलविण्याचे कारण काय, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे.